म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर
हंगाम सुरू झाल्यानंतर जिल्ह्यातील २१ साखर कारखान्यांमध्ये गाळप झालेल्या उसाच्या बिलापोटी शेतकऱ्यांना १९८ कोटी ३२ लाख रुपये कारखान्यांना द्यावे लागणार आहेत. त्यातील काही कारखान्यांकडून ही बिले बँकांकडे जमा केली जात असली तरी त्याच्या रकमा शेतकऱ्यांच्या हातात पडत नसल्याची परिस्थिती आहे. त्यामुळे पैसे जमा होऊनसुद्धा ते हातात कसे मिळणार याबाबतची कोंडी कायम आहे.
३० नोव्हेंबरपर्यंत जिल्ह्यात ८ लाख ७ हजार १६५ मेट्रिक टन ऊस गाळप झाला आहे. या कारखान्यांत बिद्री कारखान्याची एफआरपी रक्कम २६९९ रुपये इतकी सर्वाधिक आहे. सांगली जिल्ह्यात सर्वाधिक एफआरपी २७१९ रुपये हुतात्मा किसन अहिर कारखान्याची आहे. सांगली जिल्ह्यात ५० कोटी ३७ लाख रुपये ऊस बिलापोटी द्यावे लागणार आहेत.
पाच नोव्हेंबरपासून हंगाम सुरू झाल्यानंतर जिल्ह्यातील २१ साखर कारखाने सुरू झाले. गाळप झालेल्या उसाची बिले १५ दिवसात देणे गरजेचे आहे. त्यानुसार कारखान्यांनी गाळप केलेल्या उसाची एफआरपीप्रमाणे बिले तयार करण्यास सुरुवात केली. ३० नोव्हेंबरपर्यंतच्या गाळपाची बिले कारखान्यांनी बँकांत जमा करण्यास सुरुवात केली आहेत. काही कारखान्यांची बिले अजूनही बँकेत जमा होत आहेत. मात्र त्या बिलांची रक्कम भागवण्यासाठी बँकांकडे रोकड नसल्याने त्याचे पैसे शेतकऱ्यांना मिळत नाहीत. जिल्ह्यातील २१ कारखान्यांमध्ये ३० नोव्हेंबरपर्यंत ८ लाख ७ हजार १६५ मेट्रिक टन गाळप झाले आहे. सांगलीतील १८ कारखान्यांमधून २ लाख ७ हजार २६० मेट्रिक टन ऊस गाळप करण्यात आला आहे.
वारणा कारखान्याला २९ कोटी २४ लाख रुपये बिल द्यावे लागणार असून त्यापैकी ३ कोटी ७१ लाख रुपये दिले आहेत. त्यापाठोपाठ जवाहर कारखान्यानाला २० कोटी ९७ लाखांची बिले द्यावी लागणार आहेत. सांगली जिल्ह्यात हुतात्मा कारखान्याला १० कोटी ८७ लाख रुपयांचे बिल द्यावे लागणार आहेत. पहिल्या टप्प्यात मोठ्या प्रमाणात ऊस गाळप होण्यास सुरुवात झाली असली तरी नवीन लावण करण्यासाठी अनेक शेतकऱ्यांची कोंडी होत आहे. बिले जमा होत असली तरी बँकेतून ते पैसे मिळत नसल्याने लावणीच्या खर्चाचे गणित कसे सोडवायचे या चिंतेत शेतकरी आहेत. काहींनी राष्ट्रीयीकृत बँकांकडे पैसे वर्ग करण्यास सुरुवात केली असली तरी तिथेही कमी पैसे मिळत असल्याने शेतकऱ्यांच्या त्रासात भरच पडली आहे. ऊस बिलाची रक्कम शेतकऱ्यांना मिळाली तर शेतीच्या पुढील कामांना वेग येणार आहे.
सध्याची सर्वाधिक बिले
वारणा कारखाना २९ कोटी २४ लाख
जवाहर २० कोटी ९७ लाख
दत्त शिरोळ १३ कोटी ७२ लाख
दालमिया १२ कोटी ५३ लाख
कुंभी ११ कोटी
पंचगंगा १० कोटी ५६ लाख
डी. वाय. पाटील ११ कोटी ३९ लाख
गुरुदत्त शुगर्स ११ कोटी ३ लाख
हंगाम सुरू झाल्यानंतर जिल्ह्यातील २१ साखर कारखान्यांमध्ये गाळप झालेल्या उसाच्या बिलापोटी शेतकऱ्यांना १९८ कोटी ३२ लाख रुपये कारखान्यांना द्यावे लागणार आहेत. त्यातील काही कारखान्यांकडून ही बिले बँकांकडे जमा केली जात असली तरी त्याच्या रकमा शेतकऱ्यांच्या हातात पडत नसल्याची परिस्थिती आहे. त्यामुळे पैसे जमा होऊनसुद्धा ते हातात कसे मिळणार याबाबतची कोंडी कायम आहे.
३० नोव्हेंबरपर्यंत जिल्ह्यात ८ लाख ७ हजार १६५ मेट्रिक टन ऊस गाळप झाला आहे. या कारखान्यांत बिद्री कारखान्याची एफआरपी रक्कम २६९९ रुपये इतकी सर्वाधिक आहे. सांगली जिल्ह्यात सर्वाधिक एफआरपी २७१९ रुपये हुतात्मा किसन अहिर कारखान्याची आहे. सांगली जिल्ह्यात ५० कोटी ३७ लाख रुपये ऊस बिलापोटी द्यावे लागणार आहेत.
पाच नोव्हेंबरपासून हंगाम सुरू झाल्यानंतर जिल्ह्यातील २१ साखर कारखाने सुरू झाले. गाळप झालेल्या उसाची बिले १५ दिवसात देणे गरजेचे आहे. त्यानुसार कारखान्यांनी गाळप केलेल्या उसाची एफआरपीप्रमाणे बिले तयार करण्यास सुरुवात केली. ३० नोव्हेंबरपर्यंतच्या गाळपाची बिले कारखान्यांनी बँकांत जमा करण्यास सुरुवात केली आहेत. काही कारखान्यांची बिले अजूनही बँकेत जमा होत आहेत. मात्र त्या बिलांची रक्कम भागवण्यासाठी बँकांकडे रोकड नसल्याने त्याचे पैसे शेतकऱ्यांना मिळत नाहीत. जिल्ह्यातील २१ कारखान्यांमध्ये ३० नोव्हेंबरपर्यंत ८ लाख ७ हजार १६५ मेट्रिक टन गाळप झाले आहे. सांगलीतील १८ कारखान्यांमधून २ लाख ७ हजार २६० मेट्रिक टन ऊस गाळप करण्यात आला आहे.
वारणा कारखान्याला २९ कोटी २४ लाख रुपये बिल द्यावे लागणार असून त्यापैकी ३ कोटी ७१ लाख रुपये दिले आहेत. त्यापाठोपाठ जवाहर कारखान्यानाला २० कोटी ९७ लाखांची बिले द्यावी लागणार आहेत. सांगली जिल्ह्यात हुतात्मा कारखान्याला १० कोटी ८७ लाख रुपयांचे बिल द्यावे लागणार आहेत. पहिल्या टप्प्यात मोठ्या प्रमाणात ऊस गाळप होण्यास सुरुवात झाली असली तरी नवीन लावण करण्यासाठी अनेक शेतकऱ्यांची कोंडी होत आहे. बिले जमा होत असली तरी बँकेतून ते पैसे मिळत नसल्याने लावणीच्या खर्चाचे गणित कसे सोडवायचे या चिंतेत शेतकरी आहेत. काहींनी राष्ट्रीयीकृत बँकांकडे पैसे वर्ग करण्यास सुरुवात केली असली तरी तिथेही कमी पैसे मिळत असल्याने शेतकऱ्यांच्या त्रासात भरच पडली आहे. ऊस बिलाची रक्कम शेतकऱ्यांना मिळाली तर शेतीच्या पुढील कामांना वेग येणार आहे.
सध्याची सर्वाधिक बिले
वारणा कारखाना २९ कोटी २४ लाख
जवाहर २० कोटी ९७ लाख
दत्त शिरोळ १३ कोटी ७२ लाख
दालमिया १२ कोटी ५३ लाख
कुंभी ११ कोटी
पंचगंगा १० कोटी ५६ लाख
डी. वाय. पाटील ११ कोटी ३९ लाख
गुरुदत्त शुगर्स ११ कोटी ३ लाख