म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर: मराठा समाजापाठोपाठ आरक्षणाच्या मागणीसाठी आता राज्यातील धनगर समाजही आक्रमक झाला आहे. या समाजाच्या आरक्षणप्रश्नावर सरकार निर्णय घेत नसल्याच्या पार्श्वभूमीवर आंदोलनाची पुढील दिशा ठरविण्यासाठी दोन ऑक्टोबरला कोल्हापुरात गोलमेज परिषद घेण्यात येणार आहे.
धनगर समाजातील विविध संघटनांच्या वतीने घेण्यात आलेल्या पत्रकार परिषदेत निमंत्रक संदीप कारंडे यांनी भूमिका मांडली. ते म्हणाले, केंद्र व राज्य सरकार गेले अनेक महिने धनगर समाजाची फसवणूक करत आहे. लोकसभेत या समाजाचा एकही प्रतिनिधी नाही. त्यामुळे समाजाचे प्रश्न संसदेत मांडले जात नसल्याने आमचे प्रश्न जैसे थे राहिले आहेत. यामुळे आता केंद्र सरकारने केवळ आश्वासन न देता आरक्षणाची अमंलबजावणी करण्याची वेळ आली आहे.
जत तालुका दुष्काळमुक्त करण्याची किल्ली कर्नाटकच्या हाती, आमदाराने केली 'ही' मागणी
कारंडे यांनी सांगितले की, दोन्ही सरकारकडून समाजाची फसवणूक होत असल्याच्या पार्श्वभूमीवर आता समाज आक्रमक होणार आहे. आंदोलनाची पुढील दिशा ठरविण्यासाठी दोन ऑक्टोबरला गोलमेज परिषद घेण्यात येणार आहे. अक्षता मंगल कार्यालयात होणाऱ्या या परिषदेत राज्यातील विविध संघटनांचे प्रतिनिधी सहभागी होणार आहेत. यापुढची लढाई तीव्र करण्याबाबत या परिषदेत निर्णय घेण्यात येईल. आरक्षणासह समाजाचे इतर काही प्रश्न असून त्याची देखील चर्चा यावेळी करण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले.
MNS मनसेने निर्बंध झुगारले; पाहा करोनाकाळातील सर्वात मोठा मोर्चा!
धनगर समाजातील विविध संघटनांच्या वतीने घेण्यात आलेल्या पत्रकार परिषदेत निमंत्रक संदीप कारंडे यांनी भूमिका मांडली. ते म्हणाले, केंद्र व राज्य सरकार गेले अनेक महिने धनगर समाजाची फसवणूक करत आहे. लोकसभेत या समाजाचा एकही प्रतिनिधी नाही. त्यामुळे समाजाचे प्रश्न संसदेत मांडले जात नसल्याने आमचे प्रश्न जैसे थे राहिले आहेत. यामुळे आता केंद्र सरकारने केवळ आश्वासन न देता आरक्षणाची अमंलबजावणी करण्याची वेळ आली आहे.
जत तालुका दुष्काळमुक्त करण्याची किल्ली कर्नाटकच्या हाती, आमदाराने केली 'ही' मागणी
कारंडे यांनी सांगितले की, दोन्ही सरकारकडून समाजाची फसवणूक होत असल्याच्या पार्श्वभूमीवर आता समाज आक्रमक होणार आहे. आंदोलनाची पुढील दिशा ठरविण्यासाठी दोन ऑक्टोबरला गोलमेज परिषद घेण्यात येणार आहे. अक्षता मंगल कार्यालयात होणाऱ्या या परिषदेत राज्यातील विविध संघटनांचे प्रतिनिधी सहभागी होणार आहेत. यापुढची लढाई तीव्र करण्याबाबत या परिषदेत निर्णय घेण्यात येईल. आरक्षणासह समाजाचे इतर काही प्रश्न असून त्याची देखील चर्चा यावेळी करण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले.
MNS मनसेने निर्बंध झुगारले; पाहा करोनाकाळातील सर्वात मोठा मोर्चा!