मटा ऑनलाइन वृत्त । कोल्हापूर
देशाच्या स्वातंत्र्यानंतरच्या ७७ वर्षांत दलित व आदिवासी समाजानं मोठ्या प्रमाणावर सवलती घेतल्या. पण, मोठा समाज अजूनही आहे तिथंच आहे. अशा मागे राहिलेल्यांना पुढं आणायची जबाबदारी प्रत्येकाची आहे. त्यामुळं ज्यांची प्रगती झाली आहे. त्यांनी आरक्षण सोडून देण्याचा विचार करावा,' असं आवाहन राज्याचे महसूलमंत्री चंद्रकांत पाटील यांनी आज केलं.
राज्य सरकारच्या समाज कल्याण विभागाच्या वतीने डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या १२५ व्या जयंतीच्या निमित्त बुधवारी कोल्हापुरात डॉ. बाबासाहेब आंबेडकर समाज उत्थान पुरस्कार व शाहू फुले आंबेडकर पुरस्कारांचे वितरण झाले. त्यावेळी ते बोलत होते. 'माझी प्रगती झाली असेल. पत्नीही नोकरी करत असले आणि सर्वकाही व्यवस्थित चाललं असेल, तर आरक्षण कशाला घेऊ? असा विचार प्रत्येकानं केल्यास सरकारी योजनांचा लाभ गरजूंना मिळेल. मागे राहिलेला माणूस पुढं येईल, असं पाटील म्हणाले.
देशाच्या स्वातंत्र्यानंतरच्या ७७ वर्षांत दलित व आदिवासी समाजानं मोठ्या प्रमाणावर सवलती घेतल्या. पण, मोठा समाज अजूनही आहे तिथंच आहे. अशा मागे राहिलेल्यांना पुढं आणायची जबाबदारी प्रत्येकाची आहे. त्यामुळं ज्यांची प्रगती झाली आहे. त्यांनी आरक्षण सोडून देण्याचा विचार करावा,' असं आवाहन राज्याचे महसूलमंत्री चंद्रकांत पाटील यांनी आज केलं.
राज्य सरकारच्या समाज कल्याण विभागाच्या वतीने डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या १२५ व्या जयंतीच्या निमित्त बुधवारी कोल्हापुरात डॉ. बाबासाहेब आंबेडकर समाज उत्थान पुरस्कार व शाहू फुले आंबेडकर पुरस्कारांचे वितरण झाले. त्यावेळी ते बोलत होते. 'माझी प्रगती झाली असेल. पत्नीही नोकरी करत असले आणि सर्वकाही व्यवस्थित चाललं असेल, तर आरक्षण कशाला घेऊ? असा विचार प्रत्येकानं केल्यास सरकारी योजनांचा लाभ गरजूंना मिळेल. मागे राहिलेला माणूस पुढं येईल, असं पाटील म्हणाले.