मटा ऑनलाइन वृत्त । कोल्हापूर
देवदासी प्रथा नष्ट व्हावी म्हणून आयुष्यभर संघर्ष करणारे ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते व साहित्यिक डॉ. भीमराव गस्ती यांचे आज पहाटे कोल्हापूर येथे निधन झाले. ते ६७ वर्षांचे होते. बेरड समाजाच्या व्यथा, वेदना आणि होणाऱ्या छळाचे चित्रण करणाऱ्या त्यांच्या 'बेरड' या आत्मचरित्राने साहित्यक्षेत्रात खळबळ उडवून दिली होती.
भीमराव गस्ती यांनी देवदासी महिलांचे प्रश्न सोडवण्यासाठी आणि बेरड-रामोशी समाजाच्या विकासासाठी बेळगावमधील यमुनापूर येथे 'उत्थान' ही सामाजिक संस्था सुरू केली. महाराष्ट्र, कर्नाटक, आंध्र प्रदेश आदी राज्यांमध्ये त्यांच्या कामाचा विस्तार होता. 'बेरड' (आत्मकथन) आणि 'आक्रोश' या त्यांच्या पुस्तकांना अनेक पुरस्कार मिळाले. 'सांजवारा' हे त्यांचे पुस्तकही प्रसिद्ध आहे. पुण्यातील ज्ञान प्रबोधिनी आणि स्व-रूपवर्धिनी या संस्थांशी त्यांचे घनिष्ठ संबंध होते. भटके विमुक्त विकास प्रतिष्ठान या संस्थेचे ते अनेक वर्षे उपाध्यक्ष होते.
गस्ती मूळचे बेळगावजवळच्या यमनापूरचे रहिवाशी. अंधश्रध्दा आणि रुढी- परंपरांनी जखडलेल्या बेडर समाजात जन्मलेल्या डॉ. गस्ती यांनी गावच्या शाळेतच प्राथमिक आणि माध्यमिक शिक्षण घेतले. पुढे एम. एस्सी. इलेक्ट्रॉनिक्स ही पदव्युत्तर पदवी मिळवल्यावर रशियाची राजधानी मॉस्कोच्या पेट्रिक लुमुंबा विद्यापीठातून याच विषयाची डॉक्टरेटही संपादन केली. हैद्राबाद येथील डी. आर. डी. ओ. मध्ये त्यांना ज्येष्ठ शास्त्रज्ञाची नोकरीही मिळाली होती.
सुट्टीत गावी परतल्यावर बेळगावजवळच्या सुतकट्टी घाटात झालेल्या दरोड्याच्या गुन्ह्यात, त्या परिसरातल्या बेरड समाजातल्या वीस निरपराध्यांना कर्नाटक पोलिसांनी अटक केली. त्यांचा अनन्वित छळ केला. या अन्यायाने पेटून उठलेल्या गस्तींनी न्यायासाठी झुंज दिली. मोर्चे काढले, आंदोलने केली. या घटनेने त्यांचे जीवनच बदललले. त्यांनी बेरड समाजाच्या उन्नतीसाठी वाहून घेतले. निपाणीस त्यांनी १८० मुलींसाठी वसतीगृह सुरु केले. देवदासीच्या प्रथेचे निर्मूलन व्हावे यासाठी सामाजिक प्रबोधनाची चळवळ सुरु केली. शेकडो देवदासींचे विवाह केले. त्यांच्या २५ / ३० वर्षांच्या प्रदीर्घ प्रयत्नामुळे देवदासींच्या मुली आता शिक्षण घेऊन शिक्षिका, प्राध्यापिका, तहसीलदार झालेल्या आहेत. ते अखिल भारतीय बेरड रामोशी सेवा समितीचे अध्यक्ष होते.
बेरड जमातीत जन्म घेतलेल्या गस्तींचं 'बेरड' हे अतिशय प्रांजळ आत्मकथन. बेरड जमातीच्या रुढी,परंपरा, वेदना,समस्या वाचताना समाजाची एक वेगळीच बाजू आपल्याला दिसते. त्यांच्या या पुस्तकाला महाराष्ट्र आणि कर्नाटक राज्य साहित्य पुरस्काराबरोबरच अन्य सात पुरस्कार मिळाले आहेत.
गस्ती यांना मिळालेले पुरस्कार
> कै. बापूसाहेब विधे वाड.मय पुरस्कार (रत्नागिरी) मे १९८९.
> रत्नाप्पा कुंभार साहित्य पुरस्कार(कोल्हापूर) जून १९८९.
> डॉ. अरुण लिमये पुरस्कार, जुलै १९८९.
> पंचगंगा सहकारी साखर कारखाना साहित्य पुरस्कार, सप्टेंबर १९८९.
> मुंबई मराठी साहित्य संघातर्फे बा.सी.मर्ढेकर साहित्य पुरस्कार, जानेवारी १९९०.
> कर्नाटक राज्य साहित्य पुरस्कार, मार्च १९९०
> महाराष्ट्र राज्य साहित्य पुरस्कार, नोव्हेंबर १९९०.
> मुकादम साहित्य पुरस्कार(कराड) जानेवारी १९९१.
> समता साहित्य पुरस्कार(बेळगाव) मार्च १९९१.
देवदासी प्रथा नष्ट व्हावी म्हणून आयुष्यभर संघर्ष करणारे ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते व साहित्यिक डॉ. भीमराव गस्ती यांचे आज पहाटे कोल्हापूर येथे निधन झाले. ते ६७ वर्षांचे होते. बेरड समाजाच्या व्यथा, वेदना आणि होणाऱ्या छळाचे चित्रण करणाऱ्या त्यांच्या 'बेरड' या आत्मचरित्राने साहित्यक्षेत्रात खळबळ उडवून दिली होती.
भीमराव गस्ती यांनी देवदासी महिलांचे प्रश्न सोडवण्यासाठी आणि बेरड-रामोशी समाजाच्या विकासासाठी बेळगावमधील यमुनापूर येथे 'उत्थान' ही सामाजिक संस्था सुरू केली. महाराष्ट्र, कर्नाटक, आंध्र प्रदेश आदी राज्यांमध्ये त्यांच्या कामाचा विस्तार होता. 'बेरड' (आत्मकथन) आणि 'आक्रोश' या त्यांच्या पुस्तकांना अनेक पुरस्कार मिळाले. 'सांजवारा' हे त्यांचे पुस्तकही प्रसिद्ध आहे. पुण्यातील ज्ञान प्रबोधिनी आणि स्व-रूपवर्धिनी या संस्थांशी त्यांचे घनिष्ठ संबंध होते. भटके विमुक्त विकास प्रतिष्ठान या संस्थेचे ते अनेक वर्षे उपाध्यक्ष होते.
गस्ती मूळचे बेळगावजवळच्या यमनापूरचे रहिवाशी. अंधश्रध्दा आणि रुढी- परंपरांनी जखडलेल्या बेडर समाजात जन्मलेल्या डॉ. गस्ती यांनी गावच्या शाळेतच प्राथमिक आणि माध्यमिक शिक्षण घेतले. पुढे एम. एस्सी. इलेक्ट्रॉनिक्स ही पदव्युत्तर पदवी मिळवल्यावर रशियाची राजधानी मॉस्कोच्या पेट्रिक लुमुंबा विद्यापीठातून याच विषयाची डॉक्टरेटही संपादन केली. हैद्राबाद येथील डी. आर. डी. ओ. मध्ये त्यांना ज्येष्ठ शास्त्रज्ञाची नोकरीही मिळाली होती.
सुट्टीत गावी परतल्यावर बेळगावजवळच्या सुतकट्टी घाटात झालेल्या दरोड्याच्या गुन्ह्यात, त्या परिसरातल्या बेरड समाजातल्या वीस निरपराध्यांना कर्नाटक पोलिसांनी अटक केली. त्यांचा अनन्वित छळ केला. या अन्यायाने पेटून उठलेल्या गस्तींनी न्यायासाठी झुंज दिली. मोर्चे काढले, आंदोलने केली. या घटनेने त्यांचे जीवनच बदललले. त्यांनी बेरड समाजाच्या उन्नतीसाठी वाहून घेतले. निपाणीस त्यांनी १८० मुलींसाठी वसतीगृह सुरु केले. देवदासीच्या प्रथेचे निर्मूलन व्हावे यासाठी सामाजिक प्रबोधनाची चळवळ सुरु केली. शेकडो देवदासींचे विवाह केले. त्यांच्या २५ / ३० वर्षांच्या प्रदीर्घ प्रयत्नामुळे देवदासींच्या मुली आता शिक्षण घेऊन शिक्षिका, प्राध्यापिका, तहसीलदार झालेल्या आहेत. ते अखिल भारतीय बेरड रामोशी सेवा समितीचे अध्यक्ष होते.
बेरड जमातीत जन्म घेतलेल्या गस्तींचं 'बेरड' हे अतिशय प्रांजळ आत्मकथन. बेरड जमातीच्या रुढी,परंपरा, वेदना,समस्या वाचताना समाजाची एक वेगळीच बाजू आपल्याला दिसते. त्यांच्या या पुस्तकाला महाराष्ट्र आणि कर्नाटक राज्य साहित्य पुरस्काराबरोबरच अन्य सात पुरस्कार मिळाले आहेत.
गस्ती यांना मिळालेले पुरस्कार
> कै. बापूसाहेब विधे वाड.मय पुरस्कार (रत्नागिरी) मे १९८९.
> रत्नाप्पा कुंभार साहित्य पुरस्कार(कोल्हापूर) जून १९८९.
> डॉ. अरुण लिमये पुरस्कार, जुलै १९८९.
> पंचगंगा सहकारी साखर कारखाना साहित्य पुरस्कार, सप्टेंबर १९८९.
> मुंबई मराठी साहित्य संघातर्फे बा.सी.मर्ढेकर साहित्य पुरस्कार, जानेवारी १९९०.
> कर्नाटक राज्य साहित्य पुरस्कार, मार्च १९९०
> महाराष्ट्र राज्य साहित्य पुरस्कार, नोव्हेंबर १९९०.
> मुकादम साहित्य पुरस्कार(कराड) जानेवारी १९९१.
> समता साहित्य पुरस्कार(बेळगाव) मार्च १९९१.