अ‍ॅपशहर

जिल्हा बँकेने व्यवहार बंद केल्याने हजारो शेतकऱ्यांची गैरसोय

कोल्हापूर जिल्हा मध्यवर्ती बँकेने रिझर्व्ह बँकेच्या आदेशानुसार मंगळवारपासून तालुक्यातील आपल्या सर्वच १३ शाखांमधून नोटा बदलून किंवा भरणा करण्याचे व्यवहार बंद केल्याने ग्राहकांची मोठी गैरसोय झाली.

Maharashtra Times 16 Nov 2016, 3:00 am
चंदगड
महाराष्ट्र टाइम्स.कॉम farmers in problem
जिल्हा बँकेने व्यवहार बंद केल्याने हजारो शेतकऱ्यांची गैरसोय


कोल्हापूर जिल्हा मध्यवर्ती बँकेने रिझर्व्ह बँकेच्या आदेशानुसार मंगळवारपासून तालुक्यातील आपल्या सर्वच १३ शाखांमधून नोटा बदलून किंवा भरणा करण्याचे व्यवहार बंद केल्याने ग्राहकांची मोठी गैरसोय झाली. तालुक्यातील प्रत्येक शेतकऱ्यांचे खाते जिल्हा मध्यवर्ती बँकेत आहे. त्यामुळे व्यवहार बंद केल्याचा सर्वांधिक फटका शेतकऱ्यांना बसला. महिला बचत गट, दूध संस्था व सेवा संस्था यांचीही गैरसोय झाली.

तालुक्यामध्ये चंदगड, हेरे, कानूर खुर्द, अडकूर, हलकर्णी, माणगाव, तुर्केवाडी, कोवाड, म्हाळेवाडी, शिनोळी, कुदनूर, ढोलगरवाडी व तुडये अशा एकूण १३ शाखा कार्यरत आहेत. या शाखांमधून दररोज लाखोंची उलाढाल होते. उसाचे बिल, सोसायटीशी या जिल्हा बँकेच्या शाखा संलग्न असल्यामुळे तालुक्यातील शेतकऱ्यांचे बहुतांश व्यवहार याच ठिकाणी होतात. मात्र रिझर्व्ह बँकेने जिल्हा बँकेला जुन्या नोटा स्विकारण्यास मनाई केल्याने याचा परिणाम ग्रामीण भागातील अर्थकारण ठप्प होण्याची शक्यता आहे. जिल्हा बँकेने मंगळवारी नोटा बदलून किंवा भरणा करण्याचे व्यवहार बंद केल्याने इतर बँकांच्यावर या ग्राहकांचा ताण पडल्याने बँक ऑफ इंडिया, भारतीय स्टेट बँक, देना बँक, बँक ऑफ महाराष्ट्र, युनीयन बँक ऑफ इंडिया, आयसीआयसीय, एचडीएफसी या बँकांच्यावर त्याचा ताण पडला. त्यामुळे या बँकेच्या दारासमोर लांबच-लांब रांगा पहायला मिळाल्या. खासगी बँकातून शंभर रुपयांची रोकड संपल्याने दोन हजार रुपयांच्या नोटा दिल्या गेल्या. त्यासाठीही भली मोठी रांग ग्राहकांना लावावी लागली. दोन हजार रुपयांची नोट स्विकारल्यानंतर अनेकांना ते सुटे करताना दमछाक झाली.

जिल्हा बँकेने व्यवहार बंद केल्याने दूध संस्थेतील व सेवा संस्थेतील सर्वच व्यवहार ठप्प झाले आहेत. त्यामुळे ग्रामीण भागातील शेतकऱ्यांच्या दैंनदिन गरजा भागविण्यासाठी मोठी अडचण झाली. रिझर्व्ह बँकेने जिल्हा बँकेला जुन्या नोटा स्विकारण्यास परवागनी द्यावी व शेतकऱ्यांची गैरसोय टाळावी, अशी मागणी शेतकरी वर्गातून होत आहे.

महत्वाचे लेख

Marathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.
ताज्या बातम्यांसह अपडेट राहण्यासाठी लाइक करा Maharashtra Times फेसबुकपेज