अ‍ॅपशहर

Kolhapur Flood News : कोल्हापुरला पुन्हा पुराचा धोका; राधानगरीचे दरवाजे उघडणार, पंचगंगा नदी पात्राबाहेर, वाचा अपडेट्स

Kolhapur Rain Update Today : कोल्हापुरात मुसळधार पाऊस सुरू आहे. राधानगरी धरण पाणलोट क्षेत्रामध्ये सध्या अतिवृष्टी सुरू आहे. यामुळे राधानगरी धरणाच्या पाणी पातळीत मोठ्या प्रमाणात वाढ होऊ लागली आहे. राधानगरी धरण सध्या ९५.३३ टक्के भरला असून १६०० क्युसेक्सचा पाण्याचा विसर्ग सध्या विद्युत विमोचन मधून सुरू आहे.

Edited byरेणुका धायबर | महाराष्ट्र टाइम्स.कॉम 9 Aug 2022, 9:05 am
कोल्हापूर : राज्यात सर्वत्र मुसळधार पाऊस सुरू असताना कोल्हापुरातही पाऊसाची संतधार सुरूच आहे. सततच्या मुसळधार पावसामुळे पंचगंगा नदी पाणी पातळीत वाढ सुरूच आहे. सकाळी ८:०० वाजता पंचगंगा पाणी पातळी ३६ फूट ७ इंचावर पोहोचली आहे. तर जिल्ह्यात एकूण ७३ बंधारे पाण्याखालील गेले आहेत.
महाराष्ट्र टाइम्स.कॉम kolhapur flood 2022 news today


कोल्हापूर जिल्ह्यात गेल्या ३ दिवसांपासून मुसळधार पाऊस सुरू आहे. यामुळे जिल्ह्यातील राधानगरी पाणलोट क्षेत्रासह, आजारा, गगनबावडा परिसरात मोठ्या प्रमाणात पाऊस सुरू आहे. परिणामी राधानगरी धरणाच्या पाणी पातळीत ही झपाट्याने वाढ होऊ लागली आहे. राधानगरी धरण सध्या ९५.३३% भरला असून धरणांतून १६०० क्युसेक्सचा विसर्ग सुरू आहे. तर पंचगंगा नदीच्या पाणी पातळीतही झपाट्याने वाढ होत असल्याने प्रशासनही अलर्ट झाली आहे. खबरदारी म्हणून नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे. हवामान खात्याकडून आज जिल्ह्यात मुसळधार पाऊस राहणार असल्याचा इशारा देण्यात आला असल्याने राधानगरी धरणात मोठ्या प्रमाणत पाण्याची आवक सुरू असल्याने धरण १०० % भरल्यास आज दिवसभरात राधानगरी धरणाचे स्वयंचलित दरवाजे उघडण्याची दाट शक्यता आहे.

चंद्रपूर जिल्हाला आज रेड अलर्ट; इरईचे सात दरवाजे उघडले; पुराचा धोका वाढला
पंचगंगा नदी पात्राबाहेर...कोल्हापूर जिल्ह्यात सुरू असलेल्या पावसामुळे पंचगंगा नदी काल दुसऱ्यांदा पात्राबाहेर पडली आहे. आज सकाळी ८ वाजता राजाराम बंधाऱ्याची पाणी पातळी ३६ फूट ६ इंच इतकी आहे. पंचगंगा नदीची इशारा पातळी ३९ फूट व धोका पातळी ४३ फूट आहे. जिल्ह्यात आतापर्यंत ७३ बंधारे पाण्याखाली गेले आहेत. पंचगंगा नदी आपली इशारा पातळी गाठण्यासाठी ३ फूट कमी आहे. यामुळे यंत्रणा सतर्क झाली असून प्रशासनाकडून आपत्कालीन परिस्थिती निर्माण झाल्यास १०७७ या टोल फ्री क्रमांकावर संपर्क साधावा असे आवाहन करण्यात आले आहे.
लेखकाबद्दल
रेणुका धायबर
रेणुका धायबर, महाराष्ट्र टाइम्समध्ये Senior Digital Content Producer आहेत. डिजिटल पत्रकारितेचा आठ वर्षांचा अनुभव आहे. २०१४ पासून पत्रकारीतेत आहेत. झी २४ तास , न्यूज १८ लोकमत, टीव्ही ९ अशा वेबसाइटसाठी त्यांनी काम केले आहे. महाराष्ट्र, राजकारण, गुन्हेगारी, देश, विदेश, स्पेशल बातम्या यासोबत व्यवसाय विषयात त्यांची आवड आहे.... आणखी वाचा

महत्वाचे लेख