गडहिंग्लज
गडहिंग्लज तालुक्यात अत्यंत चुरशीने लढलेल्या ३४ ग्रामपंचायतीचा निकाल मंगळवारी जाहीर झाला. शहरातील पॅव्हेलियन हॉलमध्ये निवडणूक निर्णय अधिकारी राजेश चव्हाण यांच्या मार्गदर्शनाखाली मतमोजणी झाली. पहिल्यांदाच थेट जनतेतून सरपंचपदाची निवड झाल्याने निवडून आलेल्या विजयी सरपंचांची दिवाळी गोड झाली. यानिमित्ताने गटातटात विखुरलेल्या तालुक्यात सर्वच पक्षांना आपल्या अस्तित्वासाठी ‘समझोता एक्स्प्रेस’चा आधार घ्यावा लागला. तालुक्यात पहिल्यांदाच कमळ फुलले तरीही त्यांना अपेक्षित यश मिळाले नाही. मात्र घड्याळाने आपली टिकटिक कायम राखली. यासोबतच शिवसेनेची घोडदौड वाढली असून चार ठिकाणी त्यांनी बाजी मारली.
तालुक्यात सर्वच ठिकाणी सरपंचपदासाठी सर्वाधिक चुरस पाहायला मिळाली. आमदार हसन मुश्रीफ, आमदार संध्यादेवी कुपेकर यांच्यासह डॉ.प्रकाश शहापूरकर, विनायक उर्फ अप्पी पाटील, अॅड.हेमंत कोलेकर, विद्याधर गुरबे, अॅड.श्रीपतराव शिंदे, संग्राम कुपेकर यांची प्रतिष्ठा पणाला लागली होती. यावेळी आमदार मुश्रीफ यांच्या वाट्याला फारसे काही आले नसले तरी आमदार कुपेकर मात्र फायद्यात राहिल्या. नेसरीमध्ये कॉंग्रेसच्या विद्याधर गुरबे यांना सोबत घेऊन भाजपचे अॅड.कोलेकर यांच्याशी केलेली मैत्री त्यांना उपयुक्त ठरली. महागाव ग्रामपंचायतीवर कधीकाळी एकहाती सत्ता असणाऱ्या अप्पी पाटील गटाला यावेळी पुन्हा निसटत्या पराभवाला सामोरे जावे लागले. गेल्या निवडणुकीत पाटील गटाच्या ३५ वर्षाच्या सत्तेला सुरंग लावत पताडे गटाने बाजी मारली होती. यावेळीही ग्रामपंचायत ताब्यात ठेवण्यात पताडे गट यशस्वी ठरला आहे. सरपंचपदासह आठ जागा घेत त्यांनी वर्चस्व सिद्ध केले तर अप्पी पाटील गटाला सात जागांवर समाधान मानावे लागले.
आमदार मुश्रीफ यांच्या मतदारसंघातील व संपूर्ण तालुक्याचे लक्ष लागून राहिलेल्या बड्याचीवाडी ग्रामपंचायतीमध्ये भाजपा-जनता दल युतीने सतरापैकी आठ जागा बिनविरोध करीत आधीच निम्मी लढाई जिंकली होती. मात्र सरपंचपदासाठी येथे सर्वाधिक चुरस पाहायला मिळाली. सतीश कोळेकर यांच्या सरपंचपदासाठी जद-भाजप एकत्र आले होते. नेसरीमध्ये पारंपारिक विरोधक असलेल्या कोलेकर गटाशी सुत जुळवून आमदार संध्यादेवी कुपेकर यांनी पुतणे संग्राम कुपेकर यांना शह दिला. तालुक्यात स्थानिक आघाडीने दहा, राष्ट्रवादी बारा, भाजपा सहा, कॉंग्रेस दोन तर शिवसेनेने चार ठिकाणी सत्ता काबीज केली.
...............
चौकट
विजयी सरपंच
ज्योत्स्ना पताडे (महागाव), दिनकर वळतकर (तावरेवाडी), सुजाता कंकणवाडी (हिटणी), उर्मिला पाटील (हरळीखुर्द), भारत झळके (येणेचवंडी), मारुती पाटील (सरोळी), शेवंता कांबळे (काळामावाडी), मीना सुतार (वैरागवाडी), उत्तम नाईक (डोणेवाडी), जितेंद्र रेडेकर (हिडदुग्गी), लता पाटील (हडलगे), भरमू जाधव (बिद्रेवाडी), चंद्रकांत कांबळे (कडाल), सविता कांबळे (कवळीकट्टी), तुकाराम पाटील (जखेवाडी), सचिन कांबळे (कुंबळहाळ), चाळोबा गावडे (यमेहट्टी), सुरज जाधव (बटकणगले), रेखा जाधव (कौलगे), कृष्णा नाईक (कुमरी), रोहिणी पाटील (बेकनाळ), बसवराज हिरेमठ (भडगाव), संजय बटकडली (कडगाव), प्रवीण माळी (करंबळी), बी.जी.स्वामी (मुगळी), सुरेखा चौगुले (खमलेट्टी), अप्पाजी शिखरे (शिप्पूर तर्फ नेसरी), आशिष साखरे (नेसरी), शांता कदम (हसूर सासगिरी), प्रकाश गुरव (सांबरे), अव्वाक्का नाईक (कडलगे), सतीश कोळेकर (बड्याचीवाडी), संजय कांबळे (हसूरवाडी) व मालूताई भारती (तारेवाडी).
....................
चौकट
नेसरीत फेरमतमोजणी
अधिकृत निवडणूक निकाल घोषित होण्यापूर्वीच पक्षाच्या मतमोजणी प्रतिनिधींनी अतिउत्साहाच्या भरात चुकीची माहिती दिल्याने नेसरी येथील पराभूत उमेदवाराने मिरवणूक सुरु केली. मात्र पाठोपाठ अधिकृत निकाल जाहीर होताच गोंधळलेल्या कार्यकर्त्यांनी मतमोजणीच्या ठिकाणी धाव घेत निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांच्या अंगावर धावून जाण्याचा प्रयत्न केला. यावेळी प्रचंड वादावादी झाली. शेवटी फेरमतमोजणी घेतली असता अधिकृत निकाल कायम राहिला.
गडहिंग्लज तालुक्यात अत्यंत चुरशीने लढलेल्या ३४ ग्रामपंचायतीचा निकाल मंगळवारी जाहीर झाला. शहरातील पॅव्हेलियन हॉलमध्ये निवडणूक निर्णय अधिकारी राजेश चव्हाण यांच्या मार्गदर्शनाखाली मतमोजणी झाली. पहिल्यांदाच थेट जनतेतून सरपंचपदाची निवड झाल्याने निवडून आलेल्या विजयी सरपंचांची दिवाळी गोड झाली. यानिमित्ताने गटातटात विखुरलेल्या तालुक्यात सर्वच पक्षांना आपल्या अस्तित्वासाठी ‘समझोता एक्स्प्रेस’चा आधार घ्यावा लागला. तालुक्यात पहिल्यांदाच कमळ फुलले तरीही त्यांना अपेक्षित यश मिळाले नाही. मात्र घड्याळाने आपली टिकटिक कायम राखली. यासोबतच शिवसेनेची घोडदौड वाढली असून चार ठिकाणी त्यांनी बाजी मारली.
तालुक्यात सर्वच ठिकाणी सरपंचपदासाठी सर्वाधिक चुरस पाहायला मिळाली. आमदार हसन मुश्रीफ, आमदार संध्यादेवी कुपेकर यांच्यासह डॉ.प्रकाश शहापूरकर, विनायक उर्फ अप्पी पाटील, अॅड.हेमंत कोलेकर, विद्याधर गुरबे, अॅड.श्रीपतराव शिंदे, संग्राम कुपेकर यांची प्रतिष्ठा पणाला लागली होती. यावेळी आमदार मुश्रीफ यांच्या वाट्याला फारसे काही आले नसले तरी आमदार कुपेकर मात्र फायद्यात राहिल्या. नेसरीमध्ये कॉंग्रेसच्या विद्याधर गुरबे यांना सोबत घेऊन भाजपचे अॅड.कोलेकर यांच्याशी केलेली मैत्री त्यांना उपयुक्त ठरली. महागाव ग्रामपंचायतीवर कधीकाळी एकहाती सत्ता असणाऱ्या अप्पी पाटील गटाला यावेळी पुन्हा निसटत्या पराभवाला सामोरे जावे लागले. गेल्या निवडणुकीत पाटील गटाच्या ३५ वर्षाच्या सत्तेला सुरंग लावत पताडे गटाने बाजी मारली होती. यावेळीही ग्रामपंचायत ताब्यात ठेवण्यात पताडे गट यशस्वी ठरला आहे. सरपंचपदासह आठ जागा घेत त्यांनी वर्चस्व सिद्ध केले तर अप्पी पाटील गटाला सात जागांवर समाधान मानावे लागले.
आमदार मुश्रीफ यांच्या मतदारसंघातील व संपूर्ण तालुक्याचे लक्ष लागून राहिलेल्या बड्याचीवाडी ग्रामपंचायतीमध्ये भाजपा-जनता दल युतीने सतरापैकी आठ जागा बिनविरोध करीत आधीच निम्मी लढाई जिंकली होती. मात्र सरपंचपदासाठी येथे सर्वाधिक चुरस पाहायला मिळाली. सतीश कोळेकर यांच्या सरपंचपदासाठी जद-भाजप एकत्र आले होते. नेसरीमध्ये पारंपारिक विरोधक असलेल्या कोलेकर गटाशी सुत जुळवून आमदार संध्यादेवी कुपेकर यांनी पुतणे संग्राम कुपेकर यांना शह दिला. तालुक्यात स्थानिक आघाडीने दहा, राष्ट्रवादी बारा, भाजपा सहा, कॉंग्रेस दोन तर शिवसेनेने चार ठिकाणी सत्ता काबीज केली.
...............
चौकट
विजयी सरपंच
ज्योत्स्ना पताडे (महागाव), दिनकर वळतकर (तावरेवाडी), सुजाता कंकणवाडी (हिटणी), उर्मिला पाटील (हरळीखुर्द), भारत झळके (येणेचवंडी), मारुती पाटील (सरोळी), शेवंता कांबळे (काळामावाडी), मीना सुतार (वैरागवाडी), उत्तम नाईक (डोणेवाडी), जितेंद्र रेडेकर (हिडदुग्गी), लता पाटील (हडलगे), भरमू जाधव (बिद्रेवाडी), चंद्रकांत कांबळे (कडाल), सविता कांबळे (कवळीकट्टी), तुकाराम पाटील (जखेवाडी), सचिन कांबळे (कुंबळहाळ), चाळोबा गावडे (यमेहट्टी), सुरज जाधव (बटकणगले), रेखा जाधव (कौलगे), कृष्णा नाईक (कुमरी), रोहिणी पाटील (बेकनाळ), बसवराज हिरेमठ (भडगाव), संजय बटकडली (कडगाव), प्रवीण माळी (करंबळी), बी.जी.स्वामी (मुगळी), सुरेखा चौगुले (खमलेट्टी), अप्पाजी शिखरे (शिप्पूर तर्फ नेसरी), आशिष साखरे (नेसरी), शांता कदम (हसूर सासगिरी), प्रकाश गुरव (सांबरे), अव्वाक्का नाईक (कडलगे), सतीश कोळेकर (बड्याचीवाडी), संजय कांबळे (हसूरवाडी) व मालूताई भारती (तारेवाडी).
....................
चौकट
नेसरीत फेरमतमोजणी
अधिकृत निवडणूक निकाल घोषित होण्यापूर्वीच पक्षाच्या मतमोजणी प्रतिनिधींनी अतिउत्साहाच्या भरात चुकीची माहिती दिल्याने नेसरी येथील पराभूत उमेदवाराने मिरवणूक सुरु केली. मात्र पाठोपाठ अधिकृत निकाल जाहीर होताच गोंधळलेल्या कार्यकर्त्यांनी मतमोजणीच्या ठिकाणी धाव घेत निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांच्या अंगावर धावून जाण्याचा प्रयत्न केला. यावेळी प्रचंड वादावादी झाली. शेवटी फेरमतमोजणी घेतली असता अधिकृत निकाल कायम राहिला.