म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर
‘सत्तारुढ संचालकांनी परराज्यातून केलेल्या दूध खरेदीमध्ये झालेला २४ कोटी रुपयांच्या तोट्याचे काय?, बाजारात चॉपकटरची किंमत १२ हजार रुपये असताना १८ हजार रुपये दराने त्याची दूध उत्पादकांना कशी विक्री केली?, साहित्य खरेदी करताना टेंडर, जाहिरात प्रसिद्ध केली का?’ अशा अनेक प्रश्नांचा भडिमार आमदार सतेज पाटील यांनी ‘गोकुळ’च्या ठरावधारकांच्या समांतर सभेत केला. प्रश्नांना उत्तरे न देता सभा गुंडाळणाऱ्या सत्ताधाऱ्यांचा समांतर सभेत निषेध करण्यात आला. ‘गोकुळ’च्या दूध उत्पादकांच्या हक्कासाठी आणि घामाच्या दामासाठी सभेनंतरही लढा कायम ठेवण्याचा निर्धार यावेळी करण्यात आला.
‘सभा शांततेत पार पाडण्यासाठी, आम्ही व्यक्तिगत टिकेला बगल देत सभासदांच्या हिताचे प्रश्न विचारले. या प्रश्नांची उत्तरे अपेक्षीत होती’, असे सांगून आमदार पाटील म्हणाले, ‘जिल्ह्याची अस्मिता आणि लाखो दूध उत्पादकांच्या आर्थिक उदरनिर्वाहाचा गोकुळ दूधसंघ आता ‘अमूल’च्या आव्हानामुळे संकटात सापडला आहे. अशावेळी कारभारात सुधारणा न केल्यास लाखो उत्पादकांच्या संसाराचा प्रश्न निर्माण होणार आहे. दूध उत्पादकांचे हित लक्षात घेऊनच ‘गोकुळ संघ वाचावा’ अशी आमची भूमिका आहे. ही भूमिका घेऊन ‘वासाचे दूध परत करा’, ‘एकाच व्यक्तीचे २४ टँकर कशासाठी भाड्याने घेतले?, ऑडिट रिपोर्टमध्ये परराज्यातून आणलेल्या दुधामुळे २४ कोटी रुपयांचा तोटा दाखवला आहे. दुधाचे दर वाढणार असताना २४ लाखांची फिल्म कशासाठी छापली?, १२ हजार रुपयांचे चॉपकटर १८ हजारांमध्ये विकून उत्पादकांची फसवणूक का करता?, ‘गोकुळ’चे कोणतेही साहित्य खरेदी करताना टेंडर किंवा जाहिरात का प्रसिद्ध केली जात नाहीत? असे प्रश्न आम्ही उपस्थित केले. मात्र, यातील एकाही प्रश्नाचे उत्तर अध्यक्ष विश्वास पाटील यांनी देण्याऐवजी शहरातील काही लोकांच्या मदतीने अहवालातील सर्व विषयांच्या मंजुरीच्या घोषणा देत सभा गुंडाळली. सत्तारुढ संचालकांच्या या वृत्तीचा आम्ही निषेध करीत आहोत. दूध उत्पादकांच्या हक्काच्या लढाईसाठी यापुढेही लढा कायम ठेवू.’
आमदार पाटील यांनी टँकरच्या वाहतुकीच्या प्रश्नावर टिकेची झोड उठवली. ‘एक किलोमीटर दूध वाहतुकीसाठी एका टँकरला एक रुपये ४२ पैसे भाडे द्यावे लागते. दूध वाहतूकीत एका टँकरमागे ४५ लाख रुपये द्यावे लागत आहेत. असे २४ टँकर कोणाच्या मालकीचे आहेत?, टँकरचे मालक दररोज नऊ वाजता संघात कशासाठी येतात?’ असा मुद्दा उपस्थित करत त्यांनी अप्रत्यक्षरित्या माजी आमदार महाडिक यांना लक्ष केले.
माजी जिल्हा परिषद सदस्य बाबासाहेब देवकर म्हणाले, ‘संचालक अरुण नरके यांनी भाषणा दरम्यान उपस्थित केलेल्या मुद्यांना आमदार पाटील यांनी उत्तरे दिली. पण पाटील यांनी उपस्थित केलेल्या प्रश्नांना उत्तरे देण्याऐवजी सभा गुंडाळली. चर्चा होऊ दिली नाही. दूध उत्पादकांना तोट्यात घालण्याचा प्रयत्न कोणाच्या नेतृत्वाखाली केला जात आहे?, असा प्रश्न उपस्थित होतो.’
राजू सूर्यवंशी यांनी, ‘दूध संस्थेच्या सर्व संचालकांना पंचवार्षिक निवडणुकीत मतदान करण्याचा ठराव करावा’ अशी मागणी केली. कागल पंचायत समितीचे माजी उपसभापती भूषण पाटील, विजयसिंह मोरे, जिल्हा परिषदचे उपाध्यक्ष शशिकांत खोत, सदस्य बाबासाहेब माळी, करवीर पंचायत समितीचे सदस्य किरण पाटील, काँग्रेसच्या महिला जिल्हाध्यक्षा अंजना रेडेकर, शामराव देसाई, मधुकर देसाई, बाजार समितीचे उपसभापती विलास साठे, जिल्हा बँकेचे संचालक सर्जेराव पाटील, करवीर पंचायत समितीच्या सभापती स्मीता गवळी, प्रदीप पाटील, कुंभी कारखान्याचे संचालक किशोर पाटील, विद्याधर गोरबे उपस्थित होते. तत्पूर्वी सकाळी ड्रीमवर्ल्ड वॉटरपार्क येथे झालेल्या सभेस महापौर अश्विनी रामाणे, नगरसेवक डॉ. संदीप नेजदार आदी उपस्थित होते.
‘सत्तारुढ संचालकांनी परराज्यातून केलेल्या दूध खरेदीमध्ये झालेला २४ कोटी रुपयांच्या तोट्याचे काय?, बाजारात चॉपकटरची किंमत १२ हजार रुपये असताना १८ हजार रुपये दराने त्याची दूध उत्पादकांना कशी विक्री केली?, साहित्य खरेदी करताना टेंडर, जाहिरात प्रसिद्ध केली का?’ अशा अनेक प्रश्नांचा भडिमार आमदार सतेज पाटील यांनी ‘गोकुळ’च्या ठरावधारकांच्या समांतर सभेत केला. प्रश्नांना उत्तरे न देता सभा गुंडाळणाऱ्या सत्ताधाऱ्यांचा समांतर सभेत निषेध करण्यात आला. ‘गोकुळ’च्या दूध उत्पादकांच्या हक्कासाठी आणि घामाच्या दामासाठी सभेनंतरही लढा कायम ठेवण्याचा निर्धार यावेळी करण्यात आला.
‘सभा शांततेत पार पाडण्यासाठी, आम्ही व्यक्तिगत टिकेला बगल देत सभासदांच्या हिताचे प्रश्न विचारले. या प्रश्नांची उत्तरे अपेक्षीत होती’, असे सांगून आमदार पाटील म्हणाले, ‘जिल्ह्याची अस्मिता आणि लाखो दूध उत्पादकांच्या आर्थिक उदरनिर्वाहाचा गोकुळ दूधसंघ आता ‘अमूल’च्या आव्हानामुळे संकटात सापडला आहे. अशावेळी कारभारात सुधारणा न केल्यास लाखो उत्पादकांच्या संसाराचा प्रश्न निर्माण होणार आहे. दूध उत्पादकांचे हित लक्षात घेऊनच ‘गोकुळ संघ वाचावा’ अशी आमची भूमिका आहे. ही भूमिका घेऊन ‘वासाचे दूध परत करा’, ‘एकाच व्यक्तीचे २४ टँकर कशासाठी भाड्याने घेतले?, ऑडिट रिपोर्टमध्ये परराज्यातून आणलेल्या दुधामुळे २४ कोटी रुपयांचा तोटा दाखवला आहे. दुधाचे दर वाढणार असताना २४ लाखांची फिल्म कशासाठी छापली?, १२ हजार रुपयांचे चॉपकटर १८ हजारांमध्ये विकून उत्पादकांची फसवणूक का करता?, ‘गोकुळ’चे कोणतेही साहित्य खरेदी करताना टेंडर किंवा जाहिरात का प्रसिद्ध केली जात नाहीत? असे प्रश्न आम्ही उपस्थित केले. मात्र, यातील एकाही प्रश्नाचे उत्तर अध्यक्ष विश्वास पाटील यांनी देण्याऐवजी शहरातील काही लोकांच्या मदतीने अहवालातील सर्व विषयांच्या मंजुरीच्या घोषणा देत सभा गुंडाळली. सत्तारुढ संचालकांच्या या वृत्तीचा आम्ही निषेध करीत आहोत. दूध उत्पादकांच्या हक्काच्या लढाईसाठी यापुढेही लढा कायम ठेवू.’
आमदार पाटील यांनी टँकरच्या वाहतुकीच्या प्रश्नावर टिकेची झोड उठवली. ‘एक किलोमीटर दूध वाहतुकीसाठी एका टँकरला एक रुपये ४२ पैसे भाडे द्यावे लागते. दूध वाहतूकीत एका टँकरमागे ४५ लाख रुपये द्यावे लागत आहेत. असे २४ टँकर कोणाच्या मालकीचे आहेत?, टँकरचे मालक दररोज नऊ वाजता संघात कशासाठी येतात?’ असा मुद्दा उपस्थित करत त्यांनी अप्रत्यक्षरित्या माजी आमदार महाडिक यांना लक्ष केले.
माजी जिल्हा परिषद सदस्य बाबासाहेब देवकर म्हणाले, ‘संचालक अरुण नरके यांनी भाषणा दरम्यान उपस्थित केलेल्या मुद्यांना आमदार पाटील यांनी उत्तरे दिली. पण पाटील यांनी उपस्थित केलेल्या प्रश्नांना उत्तरे देण्याऐवजी सभा गुंडाळली. चर्चा होऊ दिली नाही. दूध उत्पादकांना तोट्यात घालण्याचा प्रयत्न कोणाच्या नेतृत्वाखाली केला जात आहे?, असा प्रश्न उपस्थित होतो.’
राजू सूर्यवंशी यांनी, ‘दूध संस्थेच्या सर्व संचालकांना पंचवार्षिक निवडणुकीत मतदान करण्याचा ठराव करावा’ अशी मागणी केली. कागल पंचायत समितीचे माजी उपसभापती भूषण पाटील, विजयसिंह मोरे, जिल्हा परिषदचे उपाध्यक्ष शशिकांत खोत, सदस्य बाबासाहेब माळी, करवीर पंचायत समितीचे सदस्य किरण पाटील, काँग्रेसच्या महिला जिल्हाध्यक्षा अंजना रेडेकर, शामराव देसाई, मधुकर देसाई, बाजार समितीचे उपसभापती विलास साठे, जिल्हा बँकेचे संचालक सर्जेराव पाटील, करवीर पंचायत समितीच्या सभापती स्मीता गवळी, प्रदीप पाटील, कुंभी कारखान्याचे संचालक किशोर पाटील, विद्याधर गोरबे उपस्थित होते. तत्पूर्वी सकाळी ड्रीमवर्ल्ड वॉटरपार्क येथे झालेल्या सभेस महापौर अश्विनी रामाणे, नगरसेवक डॉ. संदीप नेजदार आदी उपस्थित होते.