रोजगार निर्मितीत सरकार अपयशी : ज्योतिरादित्य शिंदे
गेल्या पाच वर्षात देशात २२०५ उद्योग बंद पडले. लाखो तरुण बेरोजगार होत आहेत. नव्याने रोजगार निर्माण करण्यात सरकार अपयशी ठरले आहे,' अशी टीका खासदार जोतिरादित्य शिंदे यांनी केली. कोल्हापूर दक्षिण मतदार संघातील काँग्रेस पक्षाचे उमेदवार ऋतुराज पाटील यांच्या प्रचारार्थ आयोजित केलेल्या 'युथ कनेक्ट' कार्यक्रमात ते बोलत होते.
महाराष्ट्र टाइम्स.कॉम 18 Oct 2019, 3:03 pm
मटा. प्रतिनिधी, कोल्हापूर
गेल्या पाच वर्षात देशात २२०५ उद्योग बंद पडले. लाखो तरुण बेरोजगार होत आहेत. नव्याने रोजगार निर्माण करण्यात सरकार अपयशी ठरले आहे,' अशी टीका काँग्रेसचे खासदार जोतिरादित्य शिंदे यांनी केली. कोल्हापूर दक्षिण मतदार संघातील काँग्रेस पक्षाचे उमेदवार ऋतुराज पाटील यांच्या प्रचारार्थ आयोजित केलेल्या 'युथ कनेक्ट' कार्यक्रमात ते बोलत होते.
हॉटेल सयाजी येथे शिंदे यांचा युथ कनेक्ट हा कार्यक्रम झाला. या कार्यक्रमात तरुणांशी संवाद साधताना त्यांनी राज्य आणि केंद्र सरकारच्या चुकीच्या धोरणांवर टीका केली. 'गेल्या पाच वर्षात देशातील २२०५ उद्योग बंद पडले. अनेक नामांकित कंपन्या, कारखाने बंद होत आहेत. लाखो तरुणांचा रोजगार जात आहे. सरकारच्या फसलेल्या धोरणांमुळे बेरोजगारीचे संकट गंभीर होण्याचा धोका आहे. रोजगार निर्मितीत सरकार अपयशी ठरले. नोकऱ्यांची नवीन संधी निर्माण करणारे सरकार गरजेचे आहे', असं शिंदे म्हणाले.
गेल्या पाच वर्षांत महाराष्ट्रात सर्वाधिक कंपन्या बंद पडल्या: मनमोहन
राज्य सरकारने पाठ्यपुस्तकातून छत्रपती शिवाजी महाराजांवरील वगळलेल्या पाठाबद्दल बोलताना ते म्हणाले, 'इतिहास आणि वर्तमान यातून उज्ज्वल भविष्य निर्माण होते. छत्रपती शिवाजी महाराजांच्या रुपाने देशातील सर्वात मोठ्या योद्ध्याची गौरवशाली परंपरा महाराष्ट्राला लाभली आहे. हा इतिहास जपल्यास चांगले भविष्य घडवता येईल. शिवाजी महाराजांचे विचार संपूर्ण देशासाठी प्रेरणादायी आहेत. त्यांच्या विचारांचे अनुकरण करण्याची गरज असताना सरकार चुकीच्या पद्धतीने शालेय पाठ्यपुस्तकातून त्यांच्यावरील पाठ काढून टाकत आहे.'
गेल्या पाच वर्षात देशात २२०५ उद्योग बंद पडले. लाखो तरुण बेरोजगार होत आहेत. नव्याने रोजगार निर्माण करण्यात सरकार अपयशी ठरले आहे,' अशी टीका काँग्रेसचे खासदार जोतिरादित्य शिंदे यांनी केली. कोल्हापूर दक्षिण मतदार संघातील काँग्रेस पक्षाचे उमेदवार ऋतुराज पाटील यांच्या प्रचारार्थ आयोजित केलेल्या 'युथ कनेक्ट' कार्यक्रमात ते बोलत होते.
हॉटेल सयाजी येथे शिंदे यांचा युथ कनेक्ट हा कार्यक्रम झाला. या कार्यक्रमात तरुणांशी संवाद साधताना त्यांनी राज्य आणि केंद्र सरकारच्या चुकीच्या धोरणांवर टीका केली. 'गेल्या पाच वर्षात देशातील २२०५ उद्योग बंद पडले. अनेक नामांकित कंपन्या, कारखाने बंद होत आहेत. लाखो तरुणांचा रोजगार जात आहे. सरकारच्या फसलेल्या धोरणांमुळे बेरोजगारीचे संकट गंभीर होण्याचा धोका आहे. रोजगार निर्मितीत सरकार अपयशी ठरले. नोकऱ्यांची नवीन संधी निर्माण करणारे सरकार गरजेचे आहे', असं शिंदे म्हणाले.
गेल्या पाच वर्षांत महाराष्ट्रात सर्वाधिक कंपन्या बंद पडल्या: मनमोहन
राज्य सरकारने पाठ्यपुस्तकातून छत्रपती शिवाजी महाराजांवरील वगळलेल्या पाठाबद्दल बोलताना ते म्हणाले, 'इतिहास आणि वर्तमान यातून उज्ज्वल भविष्य निर्माण होते. छत्रपती शिवाजी महाराजांच्या रुपाने देशातील सर्वात मोठ्या योद्ध्याची गौरवशाली परंपरा महाराष्ट्राला लाभली आहे. हा इतिहास जपल्यास चांगले भविष्य घडवता येईल. शिवाजी महाराजांचे विचार संपूर्ण देशासाठी प्रेरणादायी आहेत. त्यांच्या विचारांचे अनुकरण करण्याची गरज असताना सरकार चुकीच्या पद्धतीने शालेय पाठ्यपुस्तकातून त्यांच्यावरील पाठ काढून टाकत आहे.'