पानसरे हत्या प्रकरणातील दुचाकी, शस्त्राचा अद्याप शोध नाही
Uddhav.Godase@timesgroup.com
Tweet : @Uddhavg_MT
कोल्हापूर ः कॉम्रेड गोविंद पानसरे यांच्या हत्येला दोन वर्षे उलटली. विविध पुरोगामी संघटनांनी रस्त्यावर उतरून हल्लेखोरांसह सूत्रधारांना गजाआड करण्याची मागणी केली. अतिशय संवेदनशील गुन्ह्यात तपासाच्या पातळीवर मात्र दोन वर्षांनंतरही अनेक प्रश्न अनुत्तरित आहेत. दोघा संशयितांच्या अटकेनंतरही गुन्ह्यातील शस्त्र आणि दुचाकी पोलिसांना सापडली नाही, त्यामुळे तपास नेमका कोणत्या दिशेने सुरू आहे, याबाबत शंका उपस्थित केली जात आहे.
१६ फेब्रुवारी, २०१५ रोजी पानसरे यांच्यावर दोघा संशयितांनी गोळ्या झाडल्यानंतर २० फेब्रुवारीला मुंबईत उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला. या घटनेने पोलिसांना आव्हान दिले. मात्र, दोन वर्षे उलटली तरीही पोलिसांना हे आव्हान पेलवता आले नाही. राज्य सरकारने एसआयटीची निर्मिती केल्यानंतर समीर गायकवाड हा पहिला संशयित पोलिसांनी ताब्यात घेतला.
समीरवर आरोपपत्र दाखल केले आहे, तर सीबीआयच्या ताब्यातून दुसरा संशयित डॉ. वीरेंद्रसिंह तावडे यालाही अटक केली. दोघांवर आरोपपत्र दाखल झाले, पण आरोपनिश्चिती अद्याप होऊ शकली नाही. तपास यंत्रणांनी गांभीर्याने तपास करावा आणि सूत्रधारांनाही अटक करावी यासाठी पानसरे कुटुंबीयांनी मुंबई उच्च न्यायालयात धाव घेतली आहे.
हल्ला झाल्यापासून पोलिस गुन्ह्यातील शस्त्र आणि दुचाकीचा शोध घेत आहेत. विविध तपास यंत्रणांसह आसपासच्या राज्यांतील पोलिसांचीही मदत घेतली जात आहे, तरीही एसआयटीला गुन्ह्यातील दुचाकीसह शस्त्र मिळाले नाही. जोपर्यंत या दोन वस्तू मिळत नाहीत, तोपर्यंत तपास पुढे सरकणार नाही, याची एसआयटीलाही जाणीव असली तरी तपासातील गांभीर्य तसे दिसत नाही. पोलिसांनी गांभीर्याने तपास करावा यासाठी पुरोगामी संघटनांनी दबाव तंत्राचा अवलंब केला आहे.
बॅलेस्टिक रिपोर्टचे काय?
गुन्ह्यातील गोळी आणि पुंगळ्यांचा बॅलेस्टिक रिपोर्ट मिळवण्यासाठी सीबीआयने त्या स्कॉटलंड यार्ड पोलिसांकडे पाठवल्या होत्या. सहा महिन्यांनी या गोळ्या तपास अहवालाविनाच परत आल्याचे सीबीआयने न्यायालयाने सांगितले. जर परदेशात या पुंगळ्यांची तपासणी होणारच नव्हती, तर साबीआयने वेळ घालवण्यासाठीच त्या पाठवल्या होत्या काय? असा संतप्त सवाल पानसरे कुटुंबीयांनी उपस्थित केला आहे.
फरार आरोपींचे काय?
एसआयटीने आरोपपत्रात मडगाव बॉम्बस्फोटातील आरोपी सारंग आकोळकर आणि विनय पवार यांचाही उल्लेख केला आहे. राष्ट्रीय तपास एजन्सीने त्यांना फरार घोषित केले आहेत. एसआयटीलाही आकोळकर आणि पवार यांचा सुगावा लागलेला नाही. त्यांच्यापैकी हल्लेखोर कोण आणि सूत्रधार कोण याबाबतही काही उलगडा झालेला नाही.
Uddhav.Godase@timesgroup.com
Tweet : @Uddhavg_MT
कोल्हापूर ः कॉम्रेड गोविंद पानसरे यांच्या हत्येला दोन वर्षे उलटली. विविध पुरोगामी संघटनांनी रस्त्यावर उतरून हल्लेखोरांसह सूत्रधारांना गजाआड करण्याची मागणी केली. अतिशय संवेदनशील गुन्ह्यात तपासाच्या पातळीवर मात्र दोन वर्षांनंतरही अनेक प्रश्न अनुत्तरित आहेत. दोघा संशयितांच्या अटकेनंतरही गुन्ह्यातील शस्त्र आणि दुचाकी पोलिसांना सापडली नाही, त्यामुळे तपास नेमका कोणत्या दिशेने सुरू आहे, याबाबत शंका उपस्थित केली जात आहे.
१६ फेब्रुवारी, २०१५ रोजी पानसरे यांच्यावर दोघा संशयितांनी गोळ्या झाडल्यानंतर २० फेब्रुवारीला मुंबईत उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला. या घटनेने पोलिसांना आव्हान दिले. मात्र, दोन वर्षे उलटली तरीही पोलिसांना हे आव्हान पेलवता आले नाही. राज्य सरकारने एसआयटीची निर्मिती केल्यानंतर समीर गायकवाड हा पहिला संशयित पोलिसांनी ताब्यात घेतला.
समीरवर आरोपपत्र दाखल केले आहे, तर सीबीआयच्या ताब्यातून दुसरा संशयित डॉ. वीरेंद्रसिंह तावडे यालाही अटक केली. दोघांवर आरोपपत्र दाखल झाले, पण आरोपनिश्चिती अद्याप होऊ शकली नाही. तपास यंत्रणांनी गांभीर्याने तपास करावा आणि सूत्रधारांनाही अटक करावी यासाठी पानसरे कुटुंबीयांनी मुंबई उच्च न्यायालयात धाव घेतली आहे.
हल्ला झाल्यापासून पोलिस गुन्ह्यातील शस्त्र आणि दुचाकीचा शोध घेत आहेत. विविध तपास यंत्रणांसह आसपासच्या राज्यांतील पोलिसांचीही मदत घेतली जात आहे, तरीही एसआयटीला गुन्ह्यातील दुचाकीसह शस्त्र मिळाले नाही. जोपर्यंत या दोन वस्तू मिळत नाहीत, तोपर्यंत तपास पुढे सरकणार नाही, याची एसआयटीलाही जाणीव असली तरी तपासातील गांभीर्य तसे दिसत नाही. पोलिसांनी गांभीर्याने तपास करावा यासाठी पुरोगामी संघटनांनी दबाव तंत्राचा अवलंब केला आहे.
बॅलेस्टिक रिपोर्टचे काय?
गुन्ह्यातील गोळी आणि पुंगळ्यांचा बॅलेस्टिक रिपोर्ट मिळवण्यासाठी सीबीआयने त्या स्कॉटलंड यार्ड पोलिसांकडे पाठवल्या होत्या. सहा महिन्यांनी या गोळ्या तपास अहवालाविनाच परत आल्याचे सीबीआयने न्यायालयाने सांगितले. जर परदेशात या पुंगळ्यांची तपासणी होणारच नव्हती, तर साबीआयने वेळ घालवण्यासाठीच त्या पाठवल्या होत्या काय? असा संतप्त सवाल पानसरे कुटुंबीयांनी उपस्थित केला आहे.
फरार आरोपींचे काय?
एसआयटीने आरोपपत्रात मडगाव बॉम्बस्फोटातील आरोपी सारंग आकोळकर आणि विनय पवार यांचाही उल्लेख केला आहे. राष्ट्रीय तपास एजन्सीने त्यांना फरार घोषित केले आहेत. एसआयटीलाही आकोळकर आणि पवार यांचा सुगावा लागलेला नाही. त्यांच्यापैकी हल्लेखोर कोण आणि सूत्रधार कोण याबाबतही काही उलगडा झालेला नाही.