मटा ऑनलाइन वृत्त । कोल्हापूर
महाराष्ट्राला हादरवून सोडणाऱ्या कॉ. गोविंद पानसरे हत्या प्रकरणातील संशयित आरोपी समीर गायकवाड याला कोल्हापूरच्या स्थानिक न्यायालयानं सशर्त जामीन मंजूर केला आहे. सुमारे दीड वर्षांहून अधिक काळ पोलिसांच्या ताब्यात असलेल्या गायकवाड याच्या जामीनामुळं या प्रकरणाला कलाटणी मिळण्याची शक्यता आहे.
गोव्यातील 'सनातन संस्थे'चा साधक असलेल्या समीर गायकवाडला पानसरे यांच्या हत्येप्रकरणी सप्टेंबर २०१५ साली अटक करण्यात आली होती. तेव्हापासून त्याची सतत चौकशी सुरू होती. या काळात त्यानं अनेकदा जामिनासाठी अर्जही केला होता. मात्र, प्रत्येक वेळी तो फेटाळण्यात आला. यावेळी मात्र बचाव पक्षानं समीर गायकवाडच्या बाजूनं जोरदार युक्तिवाद केला. सुमारे दोन वर्षांच्या चौकशीनंतरही समीरचा हत्येत थेट सहभाग असल्याचे कोणतेही पुरावे पोलिसांकडं नाहीत. गुन्ह्यातील इतर आरोपींना पकडण्यातही पोलिसांना अपयश आलं आहे, हे बचाव पक्षानं न्यायालयाच्या निदर्शनास आणलं. तपासातील या त्रुटींची गंभीर दखल घेत न्यायालायनं २५ हजार रुपयांच्या वैयक्तिक जातमुचलक्यावर समीर गायकवाडची सुटका केली.
अशा आहेत अटी-शर्ती
>> जामीन काळातील निवासाचा पत्ता देणं बंधनकारक
>> महाराष्ट्र सोडून जाता येणार नाही.
>> दर रविवारी तपास यंत्रणांकडे हजेरी
>> पासपोर्ट पोलिसांकडं जमा करावा लागेल
>> तपासयंत्रणांना सहकार्य करावं लागेल
>> साक्षीदारावर दबाव आणता येणार नाही.
महाराष्ट्राला हादरवून सोडणाऱ्या कॉ. गोविंद पानसरे हत्या प्रकरणातील संशयित आरोपी समीर गायकवाड याला कोल्हापूरच्या स्थानिक न्यायालयानं सशर्त जामीन मंजूर केला आहे. सुमारे दीड वर्षांहून अधिक काळ पोलिसांच्या ताब्यात असलेल्या गायकवाड याच्या जामीनामुळं या प्रकरणाला कलाटणी मिळण्याची शक्यता आहे.
गोव्यातील 'सनातन संस्थे'चा साधक असलेल्या समीर गायकवाडला पानसरे यांच्या हत्येप्रकरणी सप्टेंबर २०१५ साली अटक करण्यात आली होती. तेव्हापासून त्याची सतत चौकशी सुरू होती. या काळात त्यानं अनेकदा जामिनासाठी अर्जही केला होता. मात्र, प्रत्येक वेळी तो फेटाळण्यात आला. यावेळी मात्र बचाव पक्षानं समीर गायकवाडच्या बाजूनं जोरदार युक्तिवाद केला. सुमारे दोन वर्षांच्या चौकशीनंतरही समीरचा हत्येत थेट सहभाग असल्याचे कोणतेही पुरावे पोलिसांकडं नाहीत. गुन्ह्यातील इतर आरोपींना पकडण्यातही पोलिसांना अपयश आलं आहे, हे बचाव पक्षानं न्यायालयाच्या निदर्शनास आणलं. तपासातील या त्रुटींची गंभीर दखल घेत न्यायालायनं २५ हजार रुपयांच्या वैयक्तिक जातमुचलक्यावर समीर गायकवाडची सुटका केली.
अशा आहेत अटी-शर्ती
>> जामीन काळातील निवासाचा पत्ता देणं बंधनकारक
>> महाराष्ट्र सोडून जाता येणार नाही.
>> दर रविवारी तपास यंत्रणांकडे हजेरी
>> पासपोर्ट पोलिसांकडं जमा करावा लागेल
>> तपासयंत्रणांना सहकार्य करावं लागेल
>> साक्षीदारावर दबाव आणता येणार नाही.