म. टा प्रतिनिधी, कोल्हापूर
‘हद्दवाढीवरून सध्या समर्थक आणि विरोधक आमनेसामने उभे आहेत. आता हद्दवाढ समर्थक आणि विरोधक अशा दोघांना मान्य होईल, असा तोडगा ३० ऑगस्टच्या बैठकीत निघणार आहे. मुख्यमंत्री स्वतःच हा निर्णय जाहीर करतील. त्यामुळे त्यावर भाष्य करणार नाही,’ असे पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी यावेळी स्पष्ट केले.
पाटील यांनी कोल्हापुरातील काहींच्या विरोधी मानसिकतेवरही भाष्य केले. ‘कोल्हापूरला विकासाच्या मुख्य प्रवाहात आणण्यासाठी सरकारी पातळीवर प्रयत्न सुरू असताना प्रत्येक ठिकाणी आंदोलनाच्या माध्यमातून अडथळे आणले जात आहेत. मग ती हद्दवाढ असो किंवा शिवाजी पुलाचा प्रश्न. प्रत्येक ठिकाणी मतांवर डोळा ठेवून राजकारण सुरू आहे,’ असा आरोप त्यांनी यावेळी केला
आयुक्तांचे अंबाबाईला साकडे
सततच्या आंदोलनामुळे प्रशासनासमोर अडचणी निर्माण होतात. महापालिकेवर रोज एक आंदोलन असते. बेकायदेशीर केबीन काढली तरी आंदोलने होतात. मग रस्ते रुंद कसे होणार’ प्रत्यक्ष काम करण्यापेक्षा आंदोलनाला सामोरे जाण्यातच आयुक्तांचा वेळ जातो. आयुक्त पी. शिवशंकर रोज करवीरनिवासिनी अंबाबाईला बदली करण्याचे साकडे घालत आहेत, अशी टिप्पणी पालकमंत्र्यांनी करताच आयुक्तांसह सर्वांनाच हसून दाद दिली.
तोंड दाबून बुक्क्यांचा मार
अनेकदा आंदोलकांना फटकारल्यामुळे माझ्यावर टीका झाली. महाडमध्ये सावित्री नदीत बस कोसळण्याच्या दुर्घटनेपासून तोंड दाबून बुक्क्याचा मार सहन करत आहे. मात्र, मी निराशावादी नाही. समस्येतून मार्ग काढत विकासाच्या मुख्य प्रवाहात शहराला आणण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत. फक्त लोकांनी मानसिकता बदलावी, असे आवाहन पाटील यांनी केले.
‘हद्दवाढीवरून सध्या समर्थक आणि विरोधक आमनेसामने उभे आहेत. आता हद्दवाढ समर्थक आणि विरोधक अशा दोघांना मान्य होईल, असा तोडगा ३० ऑगस्टच्या बैठकीत निघणार आहे. मुख्यमंत्री स्वतःच हा निर्णय जाहीर करतील. त्यामुळे त्यावर भाष्य करणार नाही,’ असे पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी यावेळी स्पष्ट केले.
पाटील यांनी कोल्हापुरातील काहींच्या विरोधी मानसिकतेवरही भाष्य केले. ‘कोल्हापूरला विकासाच्या मुख्य प्रवाहात आणण्यासाठी सरकारी पातळीवर प्रयत्न सुरू असताना प्रत्येक ठिकाणी आंदोलनाच्या माध्यमातून अडथळे आणले जात आहेत. मग ती हद्दवाढ असो किंवा शिवाजी पुलाचा प्रश्न. प्रत्येक ठिकाणी मतांवर डोळा ठेवून राजकारण सुरू आहे,’ असा आरोप त्यांनी यावेळी केला
आयुक्तांचे अंबाबाईला साकडे
सततच्या आंदोलनामुळे प्रशासनासमोर अडचणी निर्माण होतात. महापालिकेवर रोज एक आंदोलन असते. बेकायदेशीर केबीन काढली तरी आंदोलने होतात. मग रस्ते रुंद कसे होणार’ प्रत्यक्ष काम करण्यापेक्षा आंदोलनाला सामोरे जाण्यातच आयुक्तांचा वेळ जातो. आयुक्त पी. शिवशंकर रोज करवीरनिवासिनी अंबाबाईला बदली करण्याचे साकडे घालत आहेत, अशी टिप्पणी पालकमंत्र्यांनी करताच आयुक्तांसह सर्वांनाच हसून दाद दिली.
तोंड दाबून बुक्क्यांचा मार
अनेकदा आंदोलकांना फटकारल्यामुळे माझ्यावर टीका झाली. महाडमध्ये सावित्री नदीत बस कोसळण्याच्या दुर्घटनेपासून तोंड दाबून बुक्क्याचा मार सहन करत आहे. मात्र, मी निराशावादी नाही. समस्येतून मार्ग काढत विकासाच्या मुख्य प्रवाहात शहराला आणण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत. फक्त लोकांनी मानसिकता बदलावी, असे आवाहन पाटील यांनी केले.