अ‍ॅपशहर

Farmers Protest: 'हिंमत असेल तर बांधावर जा, शेतकरी पायातलं काढून तुम्हाला सांगतील'

कृषी कायद्यात बदल होणार नाही असं वक्तव्य करणारे भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांच्यावर गृहराज्यमंत्री सतेज पाटील व ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ (Hasan Mushrif) यांनी टीकेची झोड उठवली आहे. (Satej Patil takes a jibe at Chandrakant Patil)

Authored byगुरुबाळ माळी | महाराष्ट्र टाइम्स.कॉम 8 Dec 2020, 7:38 am
कोल्हापूर: कृषी कायदा बदलणार नाही, अशी घोषणा करणारे चंद्रकांत पाटील देशाचे पंतप्रधान आहेत की कृषिमंत्री? असा सवाल करतानाच, ते मुद्दाम आगीत तेल ओतत आहेत, असा आरोप राज्याचे ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांनी केला. दरम्यान, हिंमत असेल तर बांधावर जा, शेतकरी पायातलं काढून तुम्हाला सांगेल,' असा सणसणीत टोला गृहराज्यमंत्री सतेज पाटील (Satej Patil) यांनी मारला. (Hasan Mushrif takes a jibe at Chandrakant Patil)
महाराष्ट्र टाइम्स.कॉम Chandrakant Patil-Satej Patil


वाचा: उद्या भारत बंद! शिवसेनेचं राज्यातील जनेतला 'हे' आवाहन

भाजप सरकारने मंजूर केलेल्या कृषी विधेयकास विरोध करण्यासाठी व दिल्लीत शेतकऱ्यांनी सुरू केलेल्या आंदोलनास पाठिंबा देण्यासाठी मंगळवारी भारत बंदची हाक देण्यात आली आहे. या बंदला महाविकास आघाडीचा पाठिंबा असल्याचे सांगून मंत्री मुश्रीफ म्हणाले, 'राज्यातील जनतेने अत्यावश्यक सेवा वगळून कडकडीत बंद पाळावा. हा बंद शांततेत पार पाडण्याचे आवाहन करत ते म्हणाले, महाराष्ट्रात आंदोलनाला तीव्रता नाही असा आरोप माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केला आहे, पण, मुळात महाराष्ट्रात उसाला एफआरपी आहे, कापूस, तूर व इतर उत्पादनांना हमीभाव आहे आणि या संदर्भातील कायदे शरद पवार कृषिमंत्री असताना केलेले आहेत.'

वाचा: उद्धव ठाकरे मुख्यमंत्री झाले तरीही...

पालकमंत्री व गृहराज्यमंत्री सतेज पाटील म्हणाले, या बंदला पाठिंबा देण्यासाठी सर्वांनी उद्या आपल्या घरासमोर काळा झेंडा लावा. माझा काय संबंध असे न म्हणता प्रत्येकाने बंदमध्ये सहभागी व्हावे. ते म्हणाले, हा कायदा बदलणार नाही अशी भूमिका भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी मांडली आहे . याचा अर्थ भाजप शेतकऱ्यांच्या विरोधात आहे हे स्पष्ट होते. त्यांच्यात हिंमत असेल तर त्यांनी बांधावर जाऊन शेतकऱ्यांना हे सांगावे. मग शेतकरी पायातील काढून त्यांना हा कायदा चुकीचा कसा आहे हे सांगतील असा टोलाही त्यांनी मारला.

वाचा: ही मोदी सरकारच्या कर्माची फळे आहेत; शिवसेनेचा हल्लाबोल

महत्वाचे लेख

Marathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.
ताज्या बातम्यांसह अपडेट राहण्यासाठी लाइक करा Maharashtra Times फेसबुकपेज