कोल्हापूरः भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी गेल्या पाच वर्षात सार्वजनिक बांधकाम मंत्री असताना केलेल्या रस्ते प्रकल्पांच्या कामाची चौकशी करण्यात येईल, असा गर्भित इशारा ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांनी दिला. जिल्ह्यातील चार रस्ते प्रकल्पांपैकी एकही प्रकल्प पूर्ण झालेला नाही. उलट त्या प्रकल्पाचे कंत्राटदार वर मंत्रालयात आम्हाला वरखर्च करावा लागल्यामुळे कंबरडेच मोडले आहे अशा व्यथा सांगत आहेत, असा आरोप मुश्रीफ यांनी केला.
भाजप प्रदेशाध्यक्ष पाटील यांनी ग्रामविकास विभागावर काही आरोप केले. वास्तविक पाटील यांनी माहितीच्या आधारे जर आपलं वक्तव्य केलं असतं तर मी समजू शकलो असतो. अज्ञानाच्या आधारे, अपुर्या माहितीच्या आधारे त्यांनी जे वक्तव्य केलं आहे. त्यामुळे त्यांनी तात्काळ माफी मागितली पाहिजे, अशी माझी मागणी आहे. जर त्यांनी माफी मागितली नाही तर मी बदनामीचा दावा दाखल करणार आहे, असा इशाराही मुश्रीफ यांनी दिला.
'चंद्रकांतदादा पाटलांनी २ रुपयांना अर्सनिक अल्बम ३० या गोळ्या महाराष्ट्रभर द्याव्यात'
करोना या विषाणूबरोबर संघर्ष करत असताना, ग्रामीण भागामध्ये फार मोठा फैलाव होत असताना आयुष मंत्रालयाने एक परिपत्रक काढले. आयुर्वेदिक व होमिओपॅथिक औषधांचा जर आपण ग्रामीण भागांमध्ये वापर करू शकलो, तर नागरिकांमध्ये प्रतिकार शक्ती वाढेल आणि त्याचा मोठा उपयोग करोना रोखण्यामध्ये होईल. म्हणून राज्य सरकारने निविदा काढून हे औषध खरेदी करायचं आणि ग्रामपंचायतींना वाटायचं ठरवलं. आम्ही निविदा मागवली. निविदा २३ रु म्हणजे ज्याप्रमाणे चंद्रकांत पाटलांनी सांगितले त्याप्रमाणे ती आली. परंतु आम्ही राज्य सरकारने निर्णय घेतला की २३ रुपये हा दर योग्य नाही, वास्तविक आम्ही पाच कोटी लोकांना देणार होतो. हे योग्य नसल्यामुळे आम्ही ते रद्द केलं आणि आपण जिल्हा परिषदांना अधिकार दिले. हे देऊन आमचे जवळजवळ तीन आठवडे होऊन गेले, एका क्षणात आम्ही निर्णय घेतला. हे औषध महागडी आहेत. आपल्याला जिल्हा परिषदांना अधिकार दिले पाहिजेत व आम्ही ते अधिकार जिल्हा परिषदांना दिले आणि ते औषध खरेदी केल्यानंतर राहिलेले ग्रामपंचायतींना ते पैसे खर्च करण्यासाठी देण्याचा निर्णय ग्रामविकास विभागाने घेतला. पाटील यांनी आर्सेनिक अल्बम या गोळ्या दोन रुपयांना घेतल्या हे जे वक्तव्य केलेले आहे. त्यावर चंद्रकांत पाटलांनी तात्काळ माफी मागितली पाहिजे. परंतु, पुण्यात महानगरपालिकाने ह्या गोळ्या खरेदी केल्यां. आता चंद्रकांत पाटलांना मी दुसरी एक सूचना करेन २ रुपयांना जर त्यांना या गोळ्या मिळत असतील तर जिल्हा परिषदांच्या सर्व सी.ओ.ना त्यांना संपर्क साधायला सांगतो. त्यांनी ३५ जिल्हा परिषदांच्या सी.ओ.ना तात्काळ गोळ्या द्यावेत. आम्ही त्यांचे मनःपूर्वक आभार मानू, असं मुश्रीफ म्हणाले.
एकही बदली नाही उलट भाजपने आणलेल्या लोकांना घेऊनच आम्ही काम करतोय
एकही बदली नाही उलट भाजपने आणलेल्या लोकांना घेऊनच आम्ही काम करतोय, असं मुश्रीफ म्हणाले. करोना असल्यामुळे बदल्या रद्द केल्या होत्या. आता त्या बदल्या का केल्या. आम्ही सत्तेवर येऊन पाच-सात महिने झाले. एक शिपाईसुद्धा आम्ही बदली केला नाही. भाजपच्या काळात आणलेले सगळे लोक घेऊन आम्ही काम करतोय. आम्ही कधीही बदल्यांचा अट्टाहास केला नाही. परंतु भाजपच्या काळामध्ये बांधकाम विभागामध्ये, जलसंपदा विभागामध्ये व इतर विभागांमध्ये झालेल्या बदल्यांचे दर बघितल्यानंतर आजही खमंग मनानं अधिकारी त्याबदल्या बद्दल चर्चा करीत आहेत, असा टोला मुश्रीफ यांनी पाटील यांना लगावला.
कोल्हापूर जिल्ह्यात आपण ४ कोटीहून अधिक खर्च करून हॅड्री ॲल्युमिनियमचे रस्ते प्रकल्प घेतले. चारही पूर्ण झालेले नाहीत. त्या कंत्राटदारांच्या मी अनेकदा बैठका घेतल्या. त्यामध्ये माझ्या मतदारसंघातला लिंगनूर ते दाजीपूर रस्ता आहे. ते कॉन्ट्रॅक्टर म्हणत आहेत. आमचा मंत्रालयात वरखर्च एवढा केला आहे. आमचे कंबरडेच मोडले आहे. म्हणून बांधकाम खात्याचे मंत्री अशोक चव्हाण यांना आपण विनंती करणार आहोत. राज्यभरातील अशा रस्त्यांची चौकशी झाली पाहिजे. गेल्या वेळी बदल्यांची चौकशी झालेली आहे. जे खमंग मनानं अधिकारी चर्चा करता येत त्याचीही चौकशी झाली पाहिजे, असं मुश्री म्हणाले.
चंद्रकांत पाटील यांनी स्वतःचं हसू करून घेतलं
वित्त आयोग ही नरेंद्र मोदींची न्हवे स्वर्गीय राजीव गांधींची योजना आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी डायरेक्ट ग्रामपंचायतींना वित्त आयोगातून पैसा पाठवण्याचे धोरण केलं. किती हास्यास्पद विधान करतात चंद्रकांत पाटील, असा चिमटा मुश्रीफ यांनी काढला. वर्ष २०१० ते १५ हा १३ वा वित्त आयोग. सन २०१० मध्ये देशामध्ये काँग्रेस आघाडीचे सरकार होते. त्या काळात हा निर्णय घेण्यात आला. थेट पैसे ग्रामपंचायतींना द्यायला पाहिजेत, ही योजना दिवंगत पंतप्रधान राजीव गांधी यांची होती. कृपया याची त्यांनी ज्ञानामध्ये भर घालून घ्यावी अशी त्यांना विनंती आहे, असं हसन मुश्रीफ म्हणाले.
भाजप प्रदेशाध्यक्ष पाटील यांनी ग्रामविकास विभागावर काही आरोप केले. वास्तविक पाटील यांनी माहितीच्या आधारे जर आपलं वक्तव्य केलं असतं तर मी समजू शकलो असतो. अज्ञानाच्या आधारे, अपुर्या माहितीच्या आधारे त्यांनी जे वक्तव्य केलं आहे. त्यामुळे त्यांनी तात्काळ माफी मागितली पाहिजे, अशी माझी मागणी आहे. जर त्यांनी माफी मागितली नाही तर मी बदनामीचा दावा दाखल करणार आहे, असा इशाराही मुश्रीफ यांनी दिला.
'चंद्रकांतदादा पाटलांनी २ रुपयांना अर्सनिक अल्बम ३० या गोळ्या महाराष्ट्रभर द्याव्यात'
करोना या विषाणूबरोबर संघर्ष करत असताना, ग्रामीण भागामध्ये फार मोठा फैलाव होत असताना आयुष मंत्रालयाने एक परिपत्रक काढले. आयुर्वेदिक व होमिओपॅथिक औषधांचा जर आपण ग्रामीण भागांमध्ये वापर करू शकलो, तर नागरिकांमध्ये प्रतिकार शक्ती वाढेल आणि त्याचा मोठा उपयोग करोना रोखण्यामध्ये होईल. म्हणून राज्य सरकारने निविदा काढून हे औषध खरेदी करायचं आणि ग्रामपंचायतींना वाटायचं ठरवलं. आम्ही निविदा मागवली. निविदा २३ रु म्हणजे ज्याप्रमाणे चंद्रकांत पाटलांनी सांगितले त्याप्रमाणे ती आली. परंतु आम्ही राज्य सरकारने निर्णय घेतला की २३ रुपये हा दर योग्य नाही, वास्तविक आम्ही पाच कोटी लोकांना देणार होतो. हे योग्य नसल्यामुळे आम्ही ते रद्द केलं आणि आपण जिल्हा परिषदांना अधिकार दिले. हे देऊन आमचे जवळजवळ तीन आठवडे होऊन गेले, एका क्षणात आम्ही निर्णय घेतला. हे औषध महागडी आहेत. आपल्याला जिल्हा परिषदांना अधिकार दिले पाहिजेत व आम्ही ते अधिकार जिल्हा परिषदांना दिले आणि ते औषध खरेदी केल्यानंतर राहिलेले ग्रामपंचायतींना ते पैसे खर्च करण्यासाठी देण्याचा निर्णय ग्रामविकास विभागाने घेतला. पाटील यांनी आर्सेनिक अल्बम या गोळ्या दोन रुपयांना घेतल्या हे जे वक्तव्य केलेले आहे. त्यावर चंद्रकांत पाटलांनी तात्काळ माफी मागितली पाहिजे. परंतु, पुण्यात महानगरपालिकाने ह्या गोळ्या खरेदी केल्यां. आता चंद्रकांत पाटलांना मी दुसरी एक सूचना करेन २ रुपयांना जर त्यांना या गोळ्या मिळत असतील तर जिल्हा परिषदांच्या सर्व सी.ओ.ना त्यांना संपर्क साधायला सांगतो. त्यांनी ३५ जिल्हा परिषदांच्या सी.ओ.ना तात्काळ गोळ्या द्यावेत. आम्ही त्यांचे मनःपूर्वक आभार मानू, असं मुश्रीफ म्हणाले.
एकही बदली नाही उलट भाजपने आणलेल्या लोकांना घेऊनच आम्ही काम करतोय
एकही बदली नाही उलट भाजपने आणलेल्या लोकांना घेऊनच आम्ही काम करतोय, असं मुश्रीफ म्हणाले. करोना असल्यामुळे बदल्या रद्द केल्या होत्या. आता त्या बदल्या का केल्या. आम्ही सत्तेवर येऊन पाच-सात महिने झाले. एक शिपाईसुद्धा आम्ही बदली केला नाही. भाजपच्या काळात आणलेले सगळे लोक घेऊन आम्ही काम करतोय. आम्ही कधीही बदल्यांचा अट्टाहास केला नाही. परंतु भाजपच्या काळामध्ये बांधकाम विभागामध्ये, जलसंपदा विभागामध्ये व इतर विभागांमध्ये झालेल्या बदल्यांचे दर बघितल्यानंतर आजही खमंग मनानं अधिकारी त्याबदल्या बद्दल चर्चा करीत आहेत, असा टोला मुश्रीफ यांनी पाटील यांना लगावला.
कोल्हापूर जिल्ह्यात आपण ४ कोटीहून अधिक खर्च करून हॅड्री ॲल्युमिनियमचे रस्ते प्रकल्प घेतले. चारही पूर्ण झालेले नाहीत. त्या कंत्राटदारांच्या मी अनेकदा बैठका घेतल्या. त्यामध्ये माझ्या मतदारसंघातला लिंगनूर ते दाजीपूर रस्ता आहे. ते कॉन्ट्रॅक्टर म्हणत आहेत. आमचा मंत्रालयात वरखर्च एवढा केला आहे. आमचे कंबरडेच मोडले आहे. म्हणून बांधकाम खात्याचे मंत्री अशोक चव्हाण यांना आपण विनंती करणार आहोत. राज्यभरातील अशा रस्त्यांची चौकशी झाली पाहिजे. गेल्या वेळी बदल्यांची चौकशी झालेली आहे. जे खमंग मनानं अधिकारी चर्चा करता येत त्याचीही चौकशी झाली पाहिजे, असं मुश्री म्हणाले.
चंद्रकांत पाटील यांनी स्वतःचं हसू करून घेतलं
वित्त आयोग ही नरेंद्र मोदींची न्हवे स्वर्गीय राजीव गांधींची योजना आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी डायरेक्ट ग्रामपंचायतींना वित्त आयोगातून पैसा पाठवण्याचे धोरण केलं. किती हास्यास्पद विधान करतात चंद्रकांत पाटील, असा चिमटा मुश्रीफ यांनी काढला. वर्ष २०१० ते १५ हा १३ वा वित्त आयोग. सन २०१० मध्ये देशामध्ये काँग्रेस आघाडीचे सरकार होते. त्या काळात हा निर्णय घेण्यात आला. थेट पैसे ग्रामपंचायतींना द्यायला पाहिजेत, ही योजना दिवंगत पंतप्रधान राजीव गांधी यांची होती. कृपया याची त्यांनी ज्ञानामध्ये भर घालून घ्यावी अशी त्यांना विनंती आहे, असं हसन मुश्रीफ म्हणाले.