अ‍ॅपशहर

पावसाने सांगली जिल्ह्यातील १२३ गावांना फटका, ९ जणांचा मृत्यू

सांगली जिल्ह्याला अतिवृष्टीचा जबर तडाखा बसला. शेतकऱ्यांचे अतोनात नुकसान झाले आहे. जिल्ह्याचे पालकमंत्री जयंत पाटील यांनी नुकसानीचा आढावा घेतला. पावसामुळे सांगली जिल्ह्यात ९ जणांचा मृत्यू झाला आहे.

महाराष्ट्र टाइम्स 18 Oct 2020, 4:39 am
म. टा. प्रतिनिधी, सांगली: गेल्या आठवडाभरात झालेल्या अतिवृष्टीचा सांगली जिल्ह्यात १२३ गावांना फटका बसला. यात ८४० घरांची पडझड झाली असून, ९ जणांचा मृत्यू झाला. पूर आणि विजा पडून २८ जनावरे दगावली आहेत.८२७६ हेक्‍टर जमिनीवरील पिकांचे नुकसान झाल्याने पंचनामे सुरू केले आहेत, अशी माहिती पालकमंत्री जयंत पाटील यांनी दिली. मंत्री पाटील यांनी शनिवारी पिकांच्या नुकसानीचा आढावा घेतला.
महाराष्ट्र टाइम्स.कॉम sangli rain jayant patil
पावसाने सांगली जिल्ह्यातील १२३ गावांना फटका, ९ जणांचा मृत्यू


जिल्ह्यात अतिवृष्टी झाल्यामुळे शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे. शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन पिकांच्या नुकसानीचे तात्काळ पंचनामे करून प्रस्ताव सादर करावेत. कोणीही नुकसानग्रस्त शेतकरी पंचनाम्यापासून वंचित राहू नये याची खबरदारी घ्यावी, असे निर्देश जलसंपदा मंत्री तथा पालकमंत्री जयंत पाटील यांनी दिले. जिल्हाधिकारी कार्यालयात आयोजित आढावा बैठकीत ते बोलत होते. ते म्हणाले, 'अतिवृष्टीमुळे काही घरांची अंशत: अथवा पूर्णत: पडझड झाली आहे. त्यांचे पंचनामेही तात्काळ करावेत. मयत व्यक्ती व मृत जनावरे याबाबत मदत मिळण्यासाठी आवश्यक कार्यवाही करावी. सामान्य वाहतूक सुरळीत ठेवण्यासाठी खचलेले रस्ते, पूल याबाबत लहान स्वरूपाची कामे आहेत त्याची तात्काळ दुरूस्ती सुरू करावी. विमा कंपन्यानी सकारात्मक दृष्टीकोन ठेवून शेतकऱ्यांना मदत करावी. यावेळी कृषी राज्यमंत्री डॉ. विश्वजीत कदम, आमदार डॉ. सुरेश खाडे, आमदार अनिल बाबर, जिल्हाधिकारी डॉ. अभिजीत चौधरी, आदी उपस्थित होते.

उदे ग अंबे उदे... कोल्हापुरच्या अंबाबाईची कुंडलिनी स्वरूपात अलंकार पूजा

तीन दिवसात प्रकरण मिटवा!; अजित पवारांच्या नावाने बारामतीतून 'त्याने' भरला दम

महत्वाचे लेख

Marathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.
ताज्या बातम्यांसह अपडेट राहण्यासाठी लाइक करा Maharashtra Times फेसबुकपेज