म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर
प्रधानमंत्री आवास योजनेंतर्गत शहरात राबविण्यात येणाऱ्या ‘सर्वांसाठी घर’या संकल्पनेतून तब्बल १९ हजार घरांची बांधणी होणार आहे. २०२२ पर्यंत टप्प्याटप्प्याने प्रत्येकाचे घरकुलाचे स्वप्न साकार होणार आहे. महापालिका प्रशासनाने, सर्वांसाठी घर संदर्भातील कृती आराखडा तयार केला आहे. अनुदान, कर्ज स्वरुपात व खासगी बांधकाम व्यावसायिकासोबताच्या भागीदारीतून तब्बल १५०० कोटी रुपयांचा हा संपूर्ण प्रकल्प असेल. चार विविध घटकांना या योजनेचा लाभ होणार आहे.
प्रशासन, हा कृती आराखडा मान्यतेसाठी महापालिकेच्या सर्वसाधारण सभेपुढे ठेवणार आहे. महासभेच्या मान्यतेनंतर राज्य सरकारकडे सादर होईल. शहरातील ६३ झोपडपट्टयामध्ये १४ हजार कुटुंबे आहेत. झोपडपट्ट्यांसह अन्य तीन घटकांसाठी ही योजना आहे. झोपडपट्टीतील पात्र लाभार्थ्याना योजनेंतर्गत दोन लाख रुपयांचे अनुदान मिळार आहे. खासगी भागीदारातून घरांची उभारणी होणार आहे. ‘सर्वांसाठी घर’ योजनेतून घरकुलासाठी कर्ज घेणाऱ्या लाभार्थ्यांचे १५ वर्षाचे व्याज सरकार भरणार आहे.
तिसऱ्या विभागात शहरातील बेघरांना हक्काचे घर उपलब्ध करण्यात येणार आहे. या घटकांना परवडणाऱ्या दरात घरे उपलब्ध असणार आहेत. महापालिका आणि खासगी बांधकाम व्यावसायिकांच्या भागीदारीतून लाभार्थ्यांना घरकुल दिली जाणार आहेत. लाभार्थ्यांनी दोन लाख पन्नास हजार रुपयांची उभारणी करायची आहे. चौथ्या विभागात स्वत:ची जागा आहे, त्यांना नव्याने घर बांधणी, दुरूस्तीसाठी अनुदान मिळणार आहे.
कृती आराखड्याचे महापालिकेत सादरीकरण
प्रशासनाने ‘सर्वांसाठी घर’कृती आराखडा तयार केला आहे. अधिकारी आणि पदाधिकाऱ्यांच्यासमोर आराखड्याचे सादरीकरण झाले. सामाजिक विकास अधिकारी प्रसाद संकपाळ आणि व्हीआरपी असोसिएशन या सल्लागार संस्थेच्या अध्यक्षा मेघा गवारे यांनी आराखड्याचे सादरीकरण केले. यावेळी महापौर अश्विनी रामाणे, उपमहापौर शमा मुल्ला, सभापती मुरलीधर जाधव, वृषाली कदम, लाला भोसले, सभागृह नेता प्रवीण केसरकर, विरोधी पक्ष नेता संभाजी जाधव आदी उपस्थित होते.
कोल्हापूर आणि नागपूर ही शहरे प्रधानमंत्री आवास योजना अंमलबजावणीमध्ये अग्रेसर आहेत. कृती आराखडा सादर करणारी कोल्हापूर महापालिका पहिली आहे.
श्रीधर पाटणकर,अतिरिक्त आयुक्त, महापालिका
संपूर्ण शहर डोळ्यासमोर ठेवून सर्वांसाठी घर कृती आराखडा तयार केला आहे. २०२२ पर्यंत टप्प्याटप्प्याने अंमलबजावणी होईल. १९ हजार कुटुंबांना लाभ मिळणार आहे. सादरीकरणाच्या माध्यमातून शहरातील झोपडपट्टया, पक्क्या घरांची गरज, सार्वजनिक आणि खासगी क्षेत्राची भागिदारीविषयी माहिती दिली.
प्रसाद संकपाळ , सामाजिक विकास अधिकारी
प्रधानमंत्री आवास योजनेंतर्गत शहरात राबविण्यात येणाऱ्या ‘सर्वांसाठी घर’या संकल्पनेतून तब्बल १९ हजार घरांची बांधणी होणार आहे. २०२२ पर्यंत टप्प्याटप्प्याने प्रत्येकाचे घरकुलाचे स्वप्न साकार होणार आहे. महापालिका प्रशासनाने, सर्वांसाठी घर संदर्भातील कृती आराखडा तयार केला आहे. अनुदान, कर्ज स्वरुपात व खासगी बांधकाम व्यावसायिकासोबताच्या भागीदारीतून तब्बल १५०० कोटी रुपयांचा हा संपूर्ण प्रकल्प असेल. चार विविध घटकांना या योजनेचा लाभ होणार आहे.
प्रशासन, हा कृती आराखडा मान्यतेसाठी महापालिकेच्या सर्वसाधारण सभेपुढे ठेवणार आहे. महासभेच्या मान्यतेनंतर राज्य सरकारकडे सादर होईल. शहरातील ६३ झोपडपट्टयामध्ये १४ हजार कुटुंबे आहेत. झोपडपट्ट्यांसह अन्य तीन घटकांसाठी ही योजना आहे. झोपडपट्टीतील पात्र लाभार्थ्याना योजनेंतर्गत दोन लाख रुपयांचे अनुदान मिळार आहे. खासगी भागीदारातून घरांची उभारणी होणार आहे. ‘सर्वांसाठी घर’ योजनेतून घरकुलासाठी कर्ज घेणाऱ्या लाभार्थ्यांचे १५ वर्षाचे व्याज सरकार भरणार आहे.
तिसऱ्या विभागात शहरातील बेघरांना हक्काचे घर उपलब्ध करण्यात येणार आहे. या घटकांना परवडणाऱ्या दरात घरे उपलब्ध असणार आहेत. महापालिका आणि खासगी बांधकाम व्यावसायिकांच्या भागीदारीतून लाभार्थ्यांना घरकुल दिली जाणार आहेत. लाभार्थ्यांनी दोन लाख पन्नास हजार रुपयांची उभारणी करायची आहे. चौथ्या विभागात स्वत:ची जागा आहे, त्यांना नव्याने घर बांधणी, दुरूस्तीसाठी अनुदान मिळणार आहे.
कृती आराखड्याचे महापालिकेत सादरीकरण
प्रशासनाने ‘सर्वांसाठी घर’कृती आराखडा तयार केला आहे. अधिकारी आणि पदाधिकाऱ्यांच्यासमोर आराखड्याचे सादरीकरण झाले. सामाजिक विकास अधिकारी प्रसाद संकपाळ आणि व्हीआरपी असोसिएशन या सल्लागार संस्थेच्या अध्यक्षा मेघा गवारे यांनी आराखड्याचे सादरीकरण केले. यावेळी महापौर अश्विनी रामाणे, उपमहापौर शमा मुल्ला, सभापती मुरलीधर जाधव, वृषाली कदम, लाला भोसले, सभागृह नेता प्रवीण केसरकर, विरोधी पक्ष नेता संभाजी जाधव आदी उपस्थित होते.
कोल्हापूर आणि नागपूर ही शहरे प्रधानमंत्री आवास योजना अंमलबजावणीमध्ये अग्रेसर आहेत. कृती आराखडा सादर करणारी कोल्हापूर महापालिका पहिली आहे.
श्रीधर पाटणकर,अतिरिक्त आयुक्त, महापालिका
संपूर्ण शहर डोळ्यासमोर ठेवून सर्वांसाठी घर कृती आराखडा तयार केला आहे. २०२२ पर्यंत टप्प्याटप्प्याने अंमलबजावणी होईल. १९ हजार कुटुंबांना लाभ मिळणार आहे. सादरीकरणाच्या माध्यमातून शहरातील झोपडपट्टया, पक्क्या घरांची गरज, सार्वजनिक आणि खासगी क्षेत्राची भागिदारीविषयी माहिती दिली.
प्रसाद संकपाळ , सामाजिक विकास अधिकारी