म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर
चेकवर खाडाखोड करुन कर्जदारांना अंधारात ठेवून संचालक मंडळ, बँक कर्मचाऱ्यांनी परस्पर २ कोटी २० लाख रुपयांचा गैरव्यवहार केल्याच्या प्रकरणाबाबत जिल्हा उपनिबंधकांनी इचलकरंजी मर्चंटस को ऑप बँकेच्या चौकशीचे आदेश दिले आहेत, अशी माहिती बँकेचे सभासद राजेंद्र कनवाडे यांनी पत्रकार परिषदेत दिली. याप्रकरणाला कारणीभूत असलेले संचालक मंडळ बरखास्त करावे अशीही मागणी करणार असल्याचे सांगितले. जिल्हा उपनिबंधक अरुण काकडे यांनी विशेष लेखापरीक्षक डी. जे. जाधव यांची चौकशी अधिकारी म्हणून नेमणूक केली आहे.
कर्जदार सिकंदर मणेर यांच्याशी चर्चा झाल्यानंतर कनवाडे यांनी या प्रकरणाची कागदपत्रे जमा केली. त्यात मिळालेल्या माहितीनुसार कनवाडे यांनी जिल्हा उपनिबंधकांकडे तक्रार केली. याबाबतची माहिती देताना कनवाडे म्हणाले, ‘कर्जदारांना अंधारात ठेवून संचालक मंडळ व कर्मचाऱ्यांनी परस्पर चेकवर खाडाखोड करुन २ कोटी २० लाखांचा गैरव्यवहार केला आहे. रहिमतुल्ला तांबोळी यांच्या समीर इंडस्ट्रिज, शाहीन मणेर यांची सलील इंडस्ट्रिज, रेश्मा मणेर यांची साहिल इंडस्ट्रिज, सिकंदर मणेर यांची सानिया इंडस्ट्रीज, रमिजा मणेर यांची साफिया इंडस्ट्रीजला टर्म लोन व कॅश क्रेडिट लोन असे २ कोटी २० लाखांचे कर्ज मंजूर केले आहे. त्यानंतर २८ व १९ मार्च २०१६ या दोन दिवसांत सर्व खात्यांवरुन कर्जदारांच्या चेकवर खाडाखोड करुन, खाते नंबर बदलून २ कोटी १९ लाख ७८ हजार रुपये काढले आहेत. कर्जदारांनी हे पैसे काढलेलेच नाहीत. त्यामुळे हे पैसे कुणी घेतले याचा तपास होण्याची आवश्यकता आहे. या सर्व खातेदार इतक्या मोठ्या कर्जासाठी पात्रही नाहीत. बँकेचे कोल्हापूर जिल्हा कार्यक्षेत्र असताना सांगलीतील तांबोळी यांना कर्ज दिले आहे.’
कनवाडे म्हणाले, कर्जाची रक्कम परस्पर उचलल्याचे समजताच सिकंदर मणेर यांनी जिल्हा पोलिस अधीक्षकांकडे व तालुका पातळीवरील सहकार विभागाच्या कार्यालय, जिल्हा उपनिबंधकांकडे तक्रार केली आहे. सहकार विभागाने त्याकडे फारसे लक्ष न देता इतर प्रकाराचीच चौकशी केली. कर्जाची रक्कम उचलण्याचा प्रकार मोठा असून त्यातून बँकेच्या सभासदांचे अहित होऊ नये यासाठी तक्रार केली आहे. कर्जदार मणेर म्हणाले, ‘कर्जाचा बोजा उतरुन घेण्यासाठी म्हणून मॉरगेज करुन घेतले होते. त्यातूनही फसवणूक झाली आहे. २००७ साली घेतलेले कर्ज मार्चमध्ये रोख रकमेद्वारे पूर्णपणे भरले आहे. तरीही त्या खात्याचा वापर करुन त्यातून माझ्या व कुटुंबीयांच्या नावावर कर्ज दाखवून पैसे उचलले आहेत.’
याबाबत बँकेचे मॅनेजर सुभाष मिठारी म्हणाले, ‘कर्जदारांचे जुने कर्ज थकले असल्याने ते भरण्यास मदत व्हावी म्हणून नवीन कर्ज मंजूर केले आहे. त्यांना बँकेने मदत केली असताना ते कर्ज भरण्यास टाळाटाळ करत आहेत. त्यांनी कर्जासाठी रजिस्टर मॉरगेजही केले आहे.’
चेकवर खाडाखोड करुन कर्जदारांना अंधारात ठेवून संचालक मंडळ, बँक कर्मचाऱ्यांनी परस्पर २ कोटी २० लाख रुपयांचा गैरव्यवहार केल्याच्या प्रकरणाबाबत जिल्हा उपनिबंधकांनी इचलकरंजी मर्चंटस को ऑप बँकेच्या चौकशीचे आदेश दिले आहेत, अशी माहिती बँकेचे सभासद राजेंद्र कनवाडे यांनी पत्रकार परिषदेत दिली. याप्रकरणाला कारणीभूत असलेले संचालक मंडळ बरखास्त करावे अशीही मागणी करणार असल्याचे सांगितले. जिल्हा उपनिबंधक अरुण काकडे यांनी विशेष लेखापरीक्षक डी. जे. जाधव यांची चौकशी अधिकारी म्हणून नेमणूक केली आहे.
कर्जदार सिकंदर मणेर यांच्याशी चर्चा झाल्यानंतर कनवाडे यांनी या प्रकरणाची कागदपत्रे जमा केली. त्यात मिळालेल्या माहितीनुसार कनवाडे यांनी जिल्हा उपनिबंधकांकडे तक्रार केली. याबाबतची माहिती देताना कनवाडे म्हणाले, ‘कर्जदारांना अंधारात ठेवून संचालक मंडळ व कर्मचाऱ्यांनी परस्पर चेकवर खाडाखोड करुन २ कोटी २० लाखांचा गैरव्यवहार केला आहे. रहिमतुल्ला तांबोळी यांच्या समीर इंडस्ट्रिज, शाहीन मणेर यांची सलील इंडस्ट्रिज, रेश्मा मणेर यांची साहिल इंडस्ट्रिज, सिकंदर मणेर यांची सानिया इंडस्ट्रीज, रमिजा मणेर यांची साफिया इंडस्ट्रीजला टर्म लोन व कॅश क्रेडिट लोन असे २ कोटी २० लाखांचे कर्ज मंजूर केले आहे. त्यानंतर २८ व १९ मार्च २०१६ या दोन दिवसांत सर्व खात्यांवरुन कर्जदारांच्या चेकवर खाडाखोड करुन, खाते नंबर बदलून २ कोटी १९ लाख ७८ हजार रुपये काढले आहेत. कर्जदारांनी हे पैसे काढलेलेच नाहीत. त्यामुळे हे पैसे कुणी घेतले याचा तपास होण्याची आवश्यकता आहे. या सर्व खातेदार इतक्या मोठ्या कर्जासाठी पात्रही नाहीत. बँकेचे कोल्हापूर जिल्हा कार्यक्षेत्र असताना सांगलीतील तांबोळी यांना कर्ज दिले आहे.’
कनवाडे म्हणाले, कर्जाची रक्कम परस्पर उचलल्याचे समजताच सिकंदर मणेर यांनी जिल्हा पोलिस अधीक्षकांकडे व तालुका पातळीवरील सहकार विभागाच्या कार्यालय, जिल्हा उपनिबंधकांकडे तक्रार केली आहे. सहकार विभागाने त्याकडे फारसे लक्ष न देता इतर प्रकाराचीच चौकशी केली. कर्जाची रक्कम उचलण्याचा प्रकार मोठा असून त्यातून बँकेच्या सभासदांचे अहित होऊ नये यासाठी तक्रार केली आहे. कर्जदार मणेर म्हणाले, ‘कर्जाचा बोजा उतरुन घेण्यासाठी म्हणून मॉरगेज करुन घेतले होते. त्यातूनही फसवणूक झाली आहे. २००७ साली घेतलेले कर्ज मार्चमध्ये रोख रकमेद्वारे पूर्णपणे भरले आहे. तरीही त्या खात्याचा वापर करुन त्यातून माझ्या व कुटुंबीयांच्या नावावर कर्ज दाखवून पैसे उचलले आहेत.’
याबाबत बँकेचे मॅनेजर सुभाष मिठारी म्हणाले, ‘कर्जदारांचे जुने कर्ज थकले असल्याने ते भरण्यास मदत व्हावी म्हणून नवीन कर्ज मंजूर केले आहे. त्यांना बँकेने मदत केली असताना ते कर्ज भरण्यास टाळाटाळ करत आहेत. त्यांनी कर्जासाठी रजिस्टर मॉरगेजही केले आहे.’