कोल्हापूर : ‘शहरातील ऐतिहासिक वैभव टिकवून स्मार्ट सिटी करणे गरजेचे आहे. त्यासाठी स्थानिक आर्किटेक्टच्या सहभागातून शाश्वत विकासाचा आराखडा तयार करावा. भविष्यात पर्यावरणपूरक, प्रदूषणमुक्त ग्रीन बिल्डिंग बांधणे आवश्यक आहे,’ असे प्रतिपादन बडोद्याचे प्रसिद्ध आर्किटेक्ट हितेश मोदी यांनी बुधवारी केले.
इन्स्टिट्यूट ऑफ इंडियन इंटेरियर डिझायनर्स (आयआयआयडी) संस्थेला वीस वर्षे पूर्ण झाल्यानिमित्त आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते. कार्यक्रम वृंदावन हॉलमध्ये झाला.
मोदी म्हणाले, ‘शहराचा मूळ बाज कायम राखून पुढील २०० वर्षे टिकेल असा विकास करण्याचे तंत्रज्ञान आले आहे. जयपूरमध्ये अशा प्रकारचे मॉडेल शहर तयार झाले आहे. त्याच धर्तीवर इतर शहरांचा विकास झाला पाहिजे. शहराच्या विकासात आर्किटेक्टचा सहभाग घेतल्यास नवा लूक मिळेल. प्रत्येक वर्षी देखभाल, दुरूस्ती करायला लागू नये, अशी ऐतिहासिक इमारतीची बांधणी करता येते. इमारतीमधील बाह्य, अंतर्गत डिझायनिंगसाठी नवतंत्रज्ञान तरुण आर्किटेक्टनी आत्मसात करावे. भारतातील जुन्या ऐतिहासिक इमारती वास्तुशास्त्राच्या उत्तम नमुना आहेत. त्याचा अभ्यास या क्षेत्रात येऊ पाहणाऱ्या विद्यार्थांनी करावा.’
संस्थेचे अध्यक्ष पार्षद वायचळ यांनी प्रास्ताविक केले. खजिनदार चंदन मिरजकर, संदीप घोरपडे, संजय चराटे, वृंदा परूळेकर, संजय खडीकर, नेहा मिरजकर, जयंत वेगणपुरे, विवेक सावंत, गिरीजा कुलकर्णी यांच्यासह पदाधिकारी, सदस्य उपस्थित होते. बेला जोशी यांनी सूत्रसंचालन केले. संचालक किशोर पाटील यांनी आभार मानले.
इन्स्टिट्यूट ऑफ इंडियन इंटेरियर डिझायनर्स (आयआयआयडी) संस्थेला वीस वर्षे पूर्ण झाल्यानिमित्त आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते. कार्यक्रम वृंदावन हॉलमध्ये झाला.
मोदी म्हणाले, ‘शहराचा मूळ बाज कायम राखून पुढील २०० वर्षे टिकेल असा विकास करण्याचे तंत्रज्ञान आले आहे. जयपूरमध्ये अशा प्रकारचे मॉडेल शहर तयार झाले आहे. त्याच धर्तीवर इतर शहरांचा विकास झाला पाहिजे. शहराच्या विकासात आर्किटेक्टचा सहभाग घेतल्यास नवा लूक मिळेल. प्रत्येक वर्षी देखभाल, दुरूस्ती करायला लागू नये, अशी ऐतिहासिक इमारतीची बांधणी करता येते. इमारतीमधील बाह्य, अंतर्गत डिझायनिंगसाठी नवतंत्रज्ञान तरुण आर्किटेक्टनी आत्मसात करावे. भारतातील जुन्या ऐतिहासिक इमारती वास्तुशास्त्राच्या उत्तम नमुना आहेत. त्याचा अभ्यास या क्षेत्रात येऊ पाहणाऱ्या विद्यार्थांनी करावा.’
संस्थेचे अध्यक्ष पार्षद वायचळ यांनी प्रास्ताविक केले. खजिनदार चंदन मिरजकर, संदीप घोरपडे, संजय चराटे, वृंदा परूळेकर, संजय खडीकर, नेहा मिरजकर, जयंत वेगणपुरे, विवेक सावंत, गिरीजा कुलकर्णी यांच्यासह पदाधिकारी, सदस्य उपस्थित होते. बेला जोशी यांनी सूत्रसंचालन केले. संचालक किशोर पाटील यांनी आभार मानले.