कोल्हापूर
बाजारात बकऱ्यांचा दर वाढल्याने व बकऱ्यांची पुरेशी उपलब्धता नसल्याने जादा दरानेच बकरी खरेदी करावी लागत आहेत. त्यामुळे मटण दरावर परिणाम झाला आहे, असे पत्रक खाटिक समाजाने प्रसिद्धीस दिले आहे. पत्रकात म्हटले आहे, महापूर आणि अतिवृष्टीमुळे मोठ्या प्रमाणावर बकरी दगावली आहेत. आंध्र प्रदेश, तामिळनाडू राज्यातील व्यावसायिक महाराष्ट्रात खरेदीसाठी येत आहेत. या राज्यात मटणाचा दर जास्त असल्याने ते चढ्या दराने बकरी खरेदी करत आहेत. त्यामुळे बकऱ्यांचे दर वाढले आहेत. त्याचा परिणाम मटण दरावर झाला आहे.