म. टा. वृत्तसेवा, जयसिंगपूर
‘देशातील शेतकरी आत्महत्या करीत आहेत. सीमेवर रोज सैनिक धारातीर्थी पडत आहेत. समतेचा विचार मांडणाऱ्या दाभोलकर, पानसरे, कलबुर्गी, गौरी लंकेश यांसारख्यांच्या हत्या होत आहेत. साम्राज्यवाद आणि धर्मविकृती यामुळे जग विनाशाकडे चालले आहे. अशा परिस्थितीवर मात करण्यासाठी व जगाला शांतता, अहिंसेच्या मार्गावर घेऊन जाण्यासाठी जैन तत्त्वज्ञान उपयोगी पडेल,’ असे प्रतिपादन इतिहास संशोधक श्रीमंत कोकाटे यांनी केले.
जयसिंगपूर येथे २२व्या जैन मराठी साहित्य संमेलनाच्या उद्घाटनप्रसंगी ते बोलत होते. अध्यक्षस्थानी डॉ. लीलावती शहा होत्या. येथील सोनाबाई इंगळे सभागृहात प. पू. स्वस्तिश्री भट्टारक डॉ. लक्ष्मीसेन महास्वामी (कोल्हापूर) व प. पू. स्वस्तिश्री भट्टारक जिनसेन महास्वामी (नांदणी) यांच्या उपस्थितीत संमेलनाचे उद्घाटन झाले. याप्रसंगी निवृत्त न्यायाधीश भालचंद्र वग्याणी, स्वागताध्यक्ष राजेंद्र पाटील-यड्रावकर, नगराध्यक्षा डॉ. नीता माने, उपनगराध्यक्ष संजय पाटील-यड्रावकर, आदिनाथ कुरुंदवाडे, श्रीकांत नरुले प्रमुख उपस्थित होते.
कोकाटे म्हणाले, ‘मराठी-कानडी वाद निरर्थक असून, दोन्ही भाषा मायलेकींप्रमाणे आहेत. मराठी भाषा टिकविण्यामध्ये, तिचे जतन, संवर्धन आणि विकास करण्यात जैन साहित्याचा मोठा वाटा आहे. पुरातत्त्वीय उत्खननात सापडलेल्या पुराव्यांवरून हे सिद्ध होते. जैन धर्म श्रमणसंस्कृतीचे पालन करतो. क्रांती नेहमी लोकभाषेद्वारे होते. त्यामुळेच गौतम बुद्ध व महावीर यांनी त्यांच्या रचना प्राकृत भाषेतून केल्या. त्यांच्या विचारांचा शोध घेण्यासाठी इतिहासाचा अभ्यास केला पाहिजे.’
संमेलनाच्या अध्यक्षा डॉ. लीलावती शहा म्हणाल्या, ‘नव्या पिढीला इतिहास माहीत होण्यासाठी अशा प्रकारची संमेलने होणे गरजेचे आहे. जगाला हिंसेपासून वाचविण्यासाठी जैन धर्मीयांनी एकत्र येऊन प्रबोधन करावे. आज जग विनाशाच्या उंबरठ्यावर आहे. खून, बलात्कार, हल्ले अशा घटना पावलोपावली घडत आहेत. समाजातील संवेदनशीलता हरवली की काय, असा प्रश्न यामुळे निर्माण होतो. अशा परिस्थितीत नवलेखकांनी संवेदनशील लिखाणातून जनजागरण करावे. जैन धर्मातील अहिंसेचा संदेशच जगाला तारेल. जैन साहित्य समाजाला दिशा देईल.’
संमेलनास ग्रंथदिंडीने सुरुवात झाली. दिंडीचा प्रारंभ आप्पासाहेब पाटील यांच्याहस्ते झाला. ध्वजवंदन स्वातंत्र्यसेनानी आदगोंडा पाटील यांनी केले. प्राचीन दुर्मिळ ग्रंथ प्रदर्शनाचे उद्घाटन प्रा. बी. ए. पाटील यांच्याहस्ते, तर डॉ. कर्मवीर भाऊराव पाटील जीवनदर्शन ग्रंथ प्रदर्शनाचे उद्घाटन प्रशांत शहा यांच्याहस्ते झाले. डॉ. रावसाहेब पाटील यांनी स्वागत केले. प्रा. डी. ए. पाटील यांनी प्रास्ताविक केले. तीर्थंकर माणगावे यांनी सूत्रसंचालन केले. संमेलनाचे उपाध्यक्ष सागर चौगुले यांनी आभार मानले.
‘देशातील शेतकरी आत्महत्या करीत आहेत. सीमेवर रोज सैनिक धारातीर्थी पडत आहेत. समतेचा विचार मांडणाऱ्या दाभोलकर, पानसरे, कलबुर्गी, गौरी लंकेश यांसारख्यांच्या हत्या होत आहेत. साम्राज्यवाद आणि धर्मविकृती यामुळे जग विनाशाकडे चालले आहे. अशा परिस्थितीवर मात करण्यासाठी व जगाला शांतता, अहिंसेच्या मार्गावर घेऊन जाण्यासाठी जैन तत्त्वज्ञान उपयोगी पडेल,’ असे प्रतिपादन इतिहास संशोधक श्रीमंत कोकाटे यांनी केले.
जयसिंगपूर येथे २२व्या जैन मराठी साहित्य संमेलनाच्या उद्घाटनप्रसंगी ते बोलत होते. अध्यक्षस्थानी डॉ. लीलावती शहा होत्या. येथील सोनाबाई इंगळे सभागृहात प. पू. स्वस्तिश्री भट्टारक डॉ. लक्ष्मीसेन महास्वामी (कोल्हापूर) व प. पू. स्वस्तिश्री भट्टारक जिनसेन महास्वामी (नांदणी) यांच्या उपस्थितीत संमेलनाचे उद्घाटन झाले. याप्रसंगी निवृत्त न्यायाधीश भालचंद्र वग्याणी, स्वागताध्यक्ष राजेंद्र पाटील-यड्रावकर, नगराध्यक्षा डॉ. नीता माने, उपनगराध्यक्ष संजय पाटील-यड्रावकर, आदिनाथ कुरुंदवाडे, श्रीकांत नरुले प्रमुख उपस्थित होते.
कोकाटे म्हणाले, ‘मराठी-कानडी वाद निरर्थक असून, दोन्ही भाषा मायलेकींप्रमाणे आहेत. मराठी भाषा टिकविण्यामध्ये, तिचे जतन, संवर्धन आणि विकास करण्यात जैन साहित्याचा मोठा वाटा आहे. पुरातत्त्वीय उत्खननात सापडलेल्या पुराव्यांवरून हे सिद्ध होते. जैन धर्म श्रमणसंस्कृतीचे पालन करतो. क्रांती नेहमी लोकभाषेद्वारे होते. त्यामुळेच गौतम बुद्ध व महावीर यांनी त्यांच्या रचना प्राकृत भाषेतून केल्या. त्यांच्या विचारांचा शोध घेण्यासाठी इतिहासाचा अभ्यास केला पाहिजे.’
संमेलनाच्या अध्यक्षा डॉ. लीलावती शहा म्हणाल्या, ‘नव्या पिढीला इतिहास माहीत होण्यासाठी अशा प्रकारची संमेलने होणे गरजेचे आहे. जगाला हिंसेपासून वाचविण्यासाठी जैन धर्मीयांनी एकत्र येऊन प्रबोधन करावे. आज जग विनाशाच्या उंबरठ्यावर आहे. खून, बलात्कार, हल्ले अशा घटना पावलोपावली घडत आहेत. समाजातील संवेदनशीलता हरवली की काय, असा प्रश्न यामुळे निर्माण होतो. अशा परिस्थितीत नवलेखकांनी संवेदनशील लिखाणातून जनजागरण करावे. जैन धर्मातील अहिंसेचा संदेशच जगाला तारेल. जैन साहित्य समाजाला दिशा देईल.’
संमेलनास ग्रंथदिंडीने सुरुवात झाली. दिंडीचा प्रारंभ आप्पासाहेब पाटील यांच्याहस्ते झाला. ध्वजवंदन स्वातंत्र्यसेनानी आदगोंडा पाटील यांनी केले. प्राचीन दुर्मिळ ग्रंथ प्रदर्शनाचे उद्घाटन प्रा. बी. ए. पाटील यांच्याहस्ते, तर डॉ. कर्मवीर भाऊराव पाटील जीवनदर्शन ग्रंथ प्रदर्शनाचे उद्घाटन प्रशांत शहा यांच्याहस्ते झाले. डॉ. रावसाहेब पाटील यांनी स्वागत केले. प्रा. डी. ए. पाटील यांनी प्रास्ताविक केले. तीर्थंकर माणगावे यांनी सूत्रसंचालन केले. संमेलनाचे उपाध्यक्ष सागर चौगुले यांनी आभार मानले.