अ‍ॅपशहर

‘जलयुक्त’मधील कामांची चौकशी

कोल्हापूर ः जलयुक्त शिवार योजनेच्या कामात मोठ्या प्रमाणात घोटाळा झाल्याने जिल्ह्यातील सर्वच कामांच्या चौकशीचे आदेश देण्यात आले आहेत.

Maharashtra Times 4 Jul 2017, 3:00 am
Gurubal.mali@timesgroup.com
महाराष्ट्र टाइम्स.कॉम jalyukt scam enquiry
‘जलयुक्त’मधील कामांची चौकशी


Tweet:@gurubalmaliMT

कोल्हापूर ः जलयुक्त शिवार योजनेच्या कामात मोठ्या प्रमाणात घोटाळा झाल्याने जिल्ह्यातील सर्वच कामांच्या चौकशीचे आदेश देण्यात आले आहेत. यासाठी प्रांताधिकाऱ्यांच्या अध्यक्षतेखाली सहा समित्या नियुक्त केल्या आहेत. या चौकशीत घोटाळा झाल्याचे सिद्ध झाल्यास ठेकेदाराकडून बिलाची वसुली​ करण्यात येणार असल्याने त्यांचे धाबे दणादले आहेत. या योजनेंतर्गत जिल्ह्यात ८० हून अधिक गावांत पन्नास कोटींपेक्षा जादा निधी खर्च झाला आहे.

जिल्ह्यात जलयुक्त शिवार योजनेतून २०१५ व १६ सालात ६९ गावांत तीस कोटी रूपये निधी खर्चून जलसंधारणाची कामे करण्यात आली. ५५ हजार घनमीटर गाळ काढण्यात आला. त्यानंतर पुढीलवर्षी वीस गावे या योजनेत समाविष्ट करण्यात आली. यासाठी वीस कोटींचा निधी देण्यात आला. ती कामे सध्या सुरू आहेत. आणखी पन्नास गावांत ही योजना सुरू करण्याची प्रशासनाची तयारी आहे. त्यासाठी सरकारकडे प्रस्ताव पाठवण्यात आला आहे.

जिल्ह्यातील चार ठिकाणच्या या योजनेतील कामाच्या दर्जाबाबत तक्रारी आल्या होत्या. त्यात लाकूडवाडी, बावेली, महागाव व माणोली या गावांतील कामांचा समावेश होता. कृषी, सामाजिक वनीकरण आणि वन विभागासह तेरा विभागाच्यावतीने केलेल्या या कामांच्या तक्रारीच्या पार्श्वभूमीवर त्यांची चौकशी करण्याचा निर्णय घेण्यात आला. या चार गावांतील कामाबाबत तक्रारी असल्या तरी हीच परिस्थिती जिल्ह्यातील सर्वच कामांची असल्याचा आरोप होऊ लागला. यामुळे अखेर सर्व कामांची चौकशी करण्याचे आदेश देण्यात आले आहेत.

त्यासाठी चार सदस्यीय सहा समित्या नियुक्त करण्यात आल्या आहेत. प्रांताधिकारी या समितीचे अध्यक्ष असून गटविकास अधिकारी, उपअभियंता पाणी पुरवठा व सहायक लेखापरिक्षकांचा त्यात समावेश आहे. जिल्ह्यात सहा समित्या स्थापन करण्यात आल्या आहेत. या समित्यांनी कोणत्याही कामांची चौकशी करून तातडीने अहवाल द्यावा, असे आदेश दिले आहेत. या अहवालात कामाचा दर्जा चांगला नसल्याचे सिद्ध झाल्यास ठेकेदाराकडून बिल परत घेण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.



जलयुक्त शिवार योजनेत भ्रष्टाचार झाल्याच्या तक्रारी आल्यानेच सर्वच कामांची चौकशी करण्याचे आदेश देण्यात आले आहेत. या चौकशीत घोटाळा उघडकीस आल्यास संबंधित ठेकेदाराकडून बिलाची वसुली करण्यात येईल.

अविनाश सुभेदार, जिल्हाधिकारी

००००००००



‘मटा’चा पाठपुरावा

जलयुक्त शिवार योजनेत झालेल्या कामांचा दर्जा सुमार असल्याचे वृत्त यापूर्वी ‘मटा’ने दिले होते. तीन दिवस दिलेल्या मालिकेत अनेक गावांतील कामांचा आढावा घेण्यात आला होता. याची दखल घेत प्रशासनाने चौकशी करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.


जलयुक्तची कामे आणि (कंसात) खर्च झालेला निधी

करवीर : ७० (२ कोटी २९ लाख)

गगनबावडा : ५४ (१ कोटी ६७ लाख),

आजरा : ४६ ( १ कोटी ३१ लाख)

भुदरगड : ३८ ( ७४ लाख)

चंदगड : १६५ (५ कोटी)

गडहिंग्लज : ११७ ( ४ कोटी ९२ लाख)

शिरोळ : ३२ ( ९३ लाख)

हातकणंगले : २४५ (२ कोटी ७१ लाख)

पन्हाळा : ७९ (२ कोटी ७८ लाख)

शाहूवाडी : १६३ (४ कोटी ५५ लाख )

राधानगरी : १५५ (२ कोटी ३१ लाख)

कागल : ४८ (१ कोटी ११ लाख).

महत्वाचे लेख

Marathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.
ताज्या बातम्यांसह अपडेट राहण्यासाठी लाइक करा Maharashtra Times फेसबुकपेज