म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर
केएमटी प्रशासनाने, प्रवासी मिळविण्याला प्राधान्य देत बसच्या मार्गाचे विस्तारीकरण केले आहे. सर्व बस मार्गावरील वेळापत्रकाचे फेरनियोजन करण्यात आले आहे. शालेय विद्यार्थ्यांसाटी पूर्वीप्रमाणेच विशेष बससेवा सुरू राहील. शाळा, कॉलेजच्या सहलीसाठी (प्रासंगिक करार) छत्रपती शिवाजी चौक येथील नियंत्रण कक्षात सकाळी आठ ते रात्री आठ या वेळेत बुकिंग करता येईल. वेळापत्रकातील बदलाची अंमलबजावणी सोमवारपासून (ता.१ ऑगस्ट) होणार असल्याची माहिती परिवहन समिती सभापती लाला भोसले यांनी दिली.
वेळापत्रकातील बदलानुसार रेल्वे स्टेशन येथून शहरात येणाऱ्या सर्व बस मारूती मंदिर पिछाडीस असलेल्या बस थांब्यावर थांबतील. लक्षतीर्थ-माणगाव या मार्गावरील बसेस लक्षतीर्थ वसाहत कमानीपासून पुढे प्रबृद्ध भारत हायस्कूल, बलराम कॉलनी, जिव्हाळा कॉलनीपर्यंत विस्तारीत केले आहेत. कळंबा -कागल बसेस कागलकडे जाताना कळंबा जेलनंतर उजव्या बाजूने महिला बालसुधारगृह, बँक शिपाई कॉलनी, अनंत प्राईड, निर्मिती कॉर्नर (पाचगाव रोड क्रॉस), रामानंदनगर चौक, महालक्ष्मी पार्क, विश्वकर्मा चौक मार्गे विश्वपंढरीकडे धावतील. विश्वपंढरी, आयटीपार्क, रेणुका मंदिर चौक, गोखले कॉलेज, श्री शाहू मैदान, छत्रपती शिवाजी चौक, शाहूपुरी, रेल्वे फाटक, राजारामपुरी, शिवाजी विद्यापीठमार्गे कागल असा मार्ग निश्चित केला आहे. तसेच येताना रेल्वे फाटक, शाहूपुरी, बिंदू चौक, कॉमर्स कॉलेज, गोखले कॉलेज, आयटीपार्क पुढे कळंबा शिक्षक कॉलनीकडे धावतील.
आपटेनगर-राजारामपुरी मार्गे कागल या बसेस आपटेनगर येथून सुटल्यानंतर आपटेनगर, साळोखेनगर, मोहिते कॉलनी, पार्वती पार्क, गणपतीनगर, दत्त कॉलनी, सुश्रुषा कॉलनी, मोहिते मळा, टेलीफोन ऑफेस, रचनाकार सोसायटी चौकापासून पुढे नाळे कॉलनीतून नियमित मार्गे कागलला जातील. कागलहून सुटल्यानंतर नाळे कॉलनीपासून नियमित मार्गाने पुढे धावतील. बसच्या या बदलाची प्रवासी व पासधारकांनी नोंद घ्यावी असे आवाहन केले आहे.
केएमटी प्रशासनाने, प्रवासी मिळविण्याला प्राधान्य देत बसच्या मार्गाचे विस्तारीकरण केले आहे. सर्व बस मार्गावरील वेळापत्रकाचे फेरनियोजन करण्यात आले आहे. शालेय विद्यार्थ्यांसाटी पूर्वीप्रमाणेच विशेष बससेवा सुरू राहील. शाळा, कॉलेजच्या सहलीसाठी (प्रासंगिक करार) छत्रपती शिवाजी चौक येथील नियंत्रण कक्षात सकाळी आठ ते रात्री आठ या वेळेत बुकिंग करता येईल. वेळापत्रकातील बदलाची अंमलबजावणी सोमवारपासून (ता.१ ऑगस्ट) होणार असल्याची माहिती परिवहन समिती सभापती लाला भोसले यांनी दिली.
वेळापत्रकातील बदलानुसार रेल्वे स्टेशन येथून शहरात येणाऱ्या सर्व बस मारूती मंदिर पिछाडीस असलेल्या बस थांब्यावर थांबतील. लक्षतीर्थ-माणगाव या मार्गावरील बसेस लक्षतीर्थ वसाहत कमानीपासून पुढे प्रबृद्ध भारत हायस्कूल, बलराम कॉलनी, जिव्हाळा कॉलनीपर्यंत विस्तारीत केले आहेत. कळंबा -कागल बसेस कागलकडे जाताना कळंबा जेलनंतर उजव्या बाजूने महिला बालसुधारगृह, बँक शिपाई कॉलनी, अनंत प्राईड, निर्मिती कॉर्नर (पाचगाव रोड क्रॉस), रामानंदनगर चौक, महालक्ष्मी पार्क, विश्वकर्मा चौक मार्गे विश्वपंढरीकडे धावतील. विश्वपंढरी, आयटीपार्क, रेणुका मंदिर चौक, गोखले कॉलेज, श्री शाहू मैदान, छत्रपती शिवाजी चौक, शाहूपुरी, रेल्वे फाटक, राजारामपुरी, शिवाजी विद्यापीठमार्गे कागल असा मार्ग निश्चित केला आहे. तसेच येताना रेल्वे फाटक, शाहूपुरी, बिंदू चौक, कॉमर्स कॉलेज, गोखले कॉलेज, आयटीपार्क पुढे कळंबा शिक्षक कॉलनीकडे धावतील.
आपटेनगर-राजारामपुरी मार्गे कागल या बसेस आपटेनगर येथून सुटल्यानंतर आपटेनगर, साळोखेनगर, मोहिते कॉलनी, पार्वती पार्क, गणपतीनगर, दत्त कॉलनी, सुश्रुषा कॉलनी, मोहिते मळा, टेलीफोन ऑफेस, रचनाकार सोसायटी चौकापासून पुढे नाळे कॉलनीतून नियमित मार्गे कागलला जातील. कागलहून सुटल्यानंतर नाळे कॉलनीपासून नियमित मार्गाने पुढे धावतील. बसच्या या बदलाची प्रवासी व पासधारकांनी नोंद घ्यावी असे आवाहन केले आहे.