अ‍ॅपशहर

कोल्हापूर : तब्बल ३० वर्षांनी ५० किलो वजनाची अंबाबाईची चांदीची मूर्ती देवस्थानकडे!

तब्बल ३० वर्षांनी देवीची चांदीची मूर्ती देवस्थानकडे देण्याचा योग आला.

Authored byअक्षय शितोळे | महाराष्ट्र टाइम्स.कॉम 2 Mar 2022, 6:18 pm
कोल्हापूर : सर्व सराफांनी एकत्र चांदी गोळा करुन करवीरनिवासिनी अंबाबाईची तब्बल ५१ किलो वजनाची चांदीची मूर्ती ३० वर्षांपूर्वी घडवली. मूर्ती गाभाऱ्यात ठेवायची की अन्य ठिकाणी ठेवायची, या वादातून आणि सराफ संघातील राजकारण आणि अन्य कारणामुळे ही मूर्ती सराफ संघातच होती. मात्र आता तब्बल ३० वर्षांनी देवीची चांदीची मूर्ती देवस्थानकडे देण्याचा योग आला असून वाजत गाजत मिरवणूक काढून चांदीची मूर्ती देवस्थानकडे देण्यात आली. (Ambabai Temple Kolhapur News)
महाराष्ट्र टाइम्स.कॉम ambabai temple kolhapur
कोल्हापूर अंबाबाई मंदिर


सराफ संघाने १९९३ मध्ये अंबाबाईची चांदीची मूर्ती तयार केली. नियमित होणाऱ्या अभिषेकामुळे मूळ मूर्तीची झिज होत असल्याने चांदीच्या मूर्तीचा अभिषेकासाठी वापर करावा, अशी सूचना काही भाविकांनी केली. मात्र मूळ मूर्ती आणि चांदीची अंबाबाईची मूर्ती गाभाऱ्यात ठेवता येईल का, अशी शंका उपस्थित झाली. मूर्ती श्रीपूजकांकडे द्यायची की देवस्थान समितीकडे द्यायची याचाही खल सुरू झाला. किमती मूर्ती सुरक्षितता कशी राहणार अशी शंकाही काहींनी बोलून दाखवली. सराफ संघाचे राजकारण दर दोन वर्षांनी बदलत असल्याने मूर्ती सुपूर्द करण्यावरुनही तीव्र मतभेद झाले. त्यामुळे तब्बल ३० वर्षे चांदीची मूर्ती सराफ संघाकडेच होती.

आधी हिजाबचा वाद, आता अभ्यासिकेत नमाज पठणावर बंदीची मागणी, नांदेडमध्ये राडा

अखेर सराफ संघाने महाशिवरात्रीच्या दिवशी चांदीची अंबाबाईची मूर्ती वाजत गाजत देवस्थान समितीकडे दिली. श्रीमंत शाहू छत्रपती, बिहारचे माजी राज्यपाल डॉ. डी.वाय. पाटील, राज्य नियोजन मंडळाचे अध्यक्ष राजेश क्षीरसागर, माजी खासदार धनंजय महाडिक, सराफ संघाचे अध्यक्ष कुलदीप गायकवाड आणि संघाचे इतर पदाधिकारी यावेळी उपस्थित होते. देवस्थान समितीचे सचिव शिवराज नायकवडे यांनी चांदीची मूर्ती स्वीकारली.
लेखकाबद्दल
अक्षय शितोळे
अक्षय शितोळे, २०१८ पासून डिजिटल मीडियात कार्यरत असून सध्या मटा ऑनलाइनमध्ये डिजिटल कंटेंट प्रोड्युसर म्हणून जबाबदारी सांभाळत आहे. राजकीय बातम्यांमध्ये विशेष रस, बातम्यांमागची बातमी अर्थात घडामोडींचा विश्लेषणात्मक आढावा घेण्याचा सातत्याने प्रयत्न. शेती आणि ग्रामीण जीवन हे जिव्हाळ्याचे विषय.... आणखी वाचा

महत्वाचे लेख

Marathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.
ताज्या बातम्यांसह अपडेट राहण्यासाठी लाइक करा Maharashtra Times फेसबुकपेज