म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी प्रादेशिक सेवा योजनेतून पहिले उड्डाण कोल्हापूर विमानतळावरून होईल. एक जानेवारीपासून विमानतळाचे टेक ऑफ होऊन कोल्हापूर-मुंबई ही विमानसेवा सुरू करण्याची घोषणा पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी केली होती. खासदार धनंजय महाडिक, खासदार संभाजीराजे, आमदार अमल महाडिक यांनीही विमानतळासाठी पाठपुरावा केला होता. मात्र देशातील ४३ छोट्या विमानतळांच्या यादीत कोल्हापूरचा समावेश असला तरी पहिल्या तीनमध्ये कोल्हापूर नाही. केंद्रीय नागरी हवाई वाहतूक मंत्री अशोक राजू यांनी गोवा येथे केलेल्या घोषणेमुळे विमानाचे उड्डाण आणखी लांबणीवर पडले आहे. सारी प्रक्रिया अद्याप कागदोपत्री आहे.
राज्य सरकार आणि जिल्हा प्रशासनाकडून कोल्हापूर विमानतळ विकासाची भरारी केंद्रापर्यंत पोहोचलेली नाही. केंद्र सरकारच्या रिमोट कनेक्टिव्हीटी योजनेतंर्गत अकोला, नांदेड, अमरावती आणि सोलापूर या चार छोट्या विमानतळांसह देशातील ४३ छोट्या शहरातील विमानतळ सहा महिन्यांत देशातील मुख्य ७२ विमानतळांना जोडले जाणार असल्याची घोषणा केंद्रीय नागरी हवाई वाहतूक मंत्री अशोक गजपती राजू यांनी गोवा येथे झालेल्या जागतिक हवाई वाहतूक कार्यशाळेत केली. राज्यातील चार विमानतळे येत्या सहा महिन्यांत सुरू होणार असल्याची ग्वाही दिली. मात्र, या योजनेत कोल्हापूर विमानतळाचा समावेश नाही.
देशातील ४३ विमानतळांच्या यादीत कोल्हापूरचे विमानतळ आहे. मात्र पायाभूत सुविधा देण्यात अजूनही प्रशासन मागे पडत असल्याने कोल्हापूरचा अग्रक्रमांक पुढे गेला आहे. गेले वर्षभर विमानतळाचा विकास आणि विमानसेवा सुरू करण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत. मात्र तांत्रिक बाबी पूर्ण करण्यात प्रशासनाला अडथळे येत आहेत. त्यामुळे नव्या वर्षात विमानसेवा सुरू करण्याचे आश्वासन हवेत विरले. त्यानंतर राज्य सरकारने गुढीपाडव्याच्या मुहूर्तावर विमानसेवा सुरू करण्यासाठी प्रयत्न सुरू केले. मात्र पहिल्या टप्प्यात नांदेड, अमरावती आणि सोलापूर या तीन विमानतळाचा सहा महिन्यांत झपाट्याने विकास केला जाणार आहे.
कोल्हापूर विमानतळाची १५ फेब्रुवारीला तांत्रिक पाहणी झाली. राज्यांतर्गत विमानसेवा सुरू करण्याच्यासाठी रिजनल कनेक्टिव्हिटी सर्व्हिसेस पथकाने ही पाहणी केली. त्याचा तांत्रिक अहवाल मुंबई विभागीय कार्यालयाकडून नागरी हवाई वाहतूक संचालनालयाला (डीजीसीए) पाठविण्यात येणार आहे. यापूर्वी डीजीसीएच्या पथकाने विमानतळाची पाहणी केली होती. सर्वच ऋुतूत या विमानतळावरून नियमित सेवा देता येणे शक्य असल्याची शिफारसही केली होती.
अलिकडे कोल्हापूर विमानतळाचा विकास आणि विमानसेवा सुरू करण्याचे श्रेय अनेक राज्यकर्त्यांनी घेण्याचा प्रयत्न केला. प्रस्ताव पाठविल्याचे पत्र, निधी मंजूर केल्याचे पत्र, निधी स्वीकारताना पत्र, निविदीची प्रक्रिया, वनखात्याची जागा ताब्यात घेतल्याचे पत्र आदी बाबत श्रेयवादाचे राजकारण रंगले. मात्र अद्याप विमानसेवा सुरू झालेली नाही. जिल्हा, राज्य आणि केंद्र स्तरावरून कोल्हापूर विमानतळ सुरू करण्यासाठी स्वतंत्र घोषणा केली जात आहे.
पहिल्या पाच विमानतळाच्या यादीत कोल्हापूर विमानतळाचा समावेश होण्यासाठी प्रयत्न केले जातील. त्यासाठी केंद्र सरकारकडे दोन दिवसांत लेखी मागणी केली जाईल. कोल्हापूरच्या विकासासाठी विमानतळ अत्यावश्यक आहे.
- ललित गांधी, अध्यक्ष, चेंबर ऑफ कॉमर्स
रेल्वेने काही प्रकल्प प्रायव्हेट पब्लिक पाटर्नरशीप (पीपीपी) नुसार दिले आहेत. विमानतळाचा विकासासाठी केंद्र आणि राज्य सरकारकडेही पुरेसा निधी नसल्याचे चित्र आहे. विमानतळाचा विकासही पीपीपी नुसार करण्याची गरज आहे.
- आनंद उगवे, वाहतूक तज्ज्ञ
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी प्रादेशिक सेवा योजनेतून पहिले उड्डाण कोल्हापूर विमानतळावरून होईल. एक जानेवारीपासून विमानतळाचे टेक ऑफ होऊन कोल्हापूर-मुंबई ही विमानसेवा सुरू करण्याची घोषणा पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी केली होती. खासदार धनंजय महाडिक, खासदार संभाजीराजे, आमदार अमल महाडिक यांनीही विमानतळासाठी पाठपुरावा केला होता. मात्र देशातील ४३ छोट्या विमानतळांच्या यादीत कोल्हापूरचा समावेश असला तरी पहिल्या तीनमध्ये कोल्हापूर नाही. केंद्रीय नागरी हवाई वाहतूक मंत्री अशोक राजू यांनी गोवा येथे केलेल्या घोषणेमुळे विमानाचे उड्डाण आणखी लांबणीवर पडले आहे. सारी प्रक्रिया अद्याप कागदोपत्री आहे.
राज्य सरकार आणि जिल्हा प्रशासनाकडून कोल्हापूर विमानतळ विकासाची भरारी केंद्रापर्यंत पोहोचलेली नाही. केंद्र सरकारच्या रिमोट कनेक्टिव्हीटी योजनेतंर्गत अकोला, नांदेड, अमरावती आणि सोलापूर या चार छोट्या विमानतळांसह देशातील ४३ छोट्या शहरातील विमानतळ सहा महिन्यांत देशातील मुख्य ७२ विमानतळांना जोडले जाणार असल्याची घोषणा केंद्रीय नागरी हवाई वाहतूक मंत्री अशोक गजपती राजू यांनी गोवा येथे झालेल्या जागतिक हवाई वाहतूक कार्यशाळेत केली. राज्यातील चार विमानतळे येत्या सहा महिन्यांत सुरू होणार असल्याची ग्वाही दिली. मात्र, या योजनेत कोल्हापूर विमानतळाचा समावेश नाही.
देशातील ४३ विमानतळांच्या यादीत कोल्हापूरचे विमानतळ आहे. मात्र पायाभूत सुविधा देण्यात अजूनही प्रशासन मागे पडत असल्याने कोल्हापूरचा अग्रक्रमांक पुढे गेला आहे. गेले वर्षभर विमानतळाचा विकास आणि विमानसेवा सुरू करण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत. मात्र तांत्रिक बाबी पूर्ण करण्यात प्रशासनाला अडथळे येत आहेत. त्यामुळे नव्या वर्षात विमानसेवा सुरू करण्याचे आश्वासन हवेत विरले. त्यानंतर राज्य सरकारने गुढीपाडव्याच्या मुहूर्तावर विमानसेवा सुरू करण्यासाठी प्रयत्न सुरू केले. मात्र पहिल्या टप्प्यात नांदेड, अमरावती आणि सोलापूर या तीन विमानतळाचा सहा महिन्यांत झपाट्याने विकास केला जाणार आहे.
कोल्हापूर विमानतळाची १५ फेब्रुवारीला तांत्रिक पाहणी झाली. राज्यांतर्गत विमानसेवा सुरू करण्याच्यासाठी रिजनल कनेक्टिव्हिटी सर्व्हिसेस पथकाने ही पाहणी केली. त्याचा तांत्रिक अहवाल मुंबई विभागीय कार्यालयाकडून नागरी हवाई वाहतूक संचालनालयाला (डीजीसीए) पाठविण्यात येणार आहे. यापूर्वी डीजीसीएच्या पथकाने विमानतळाची पाहणी केली होती. सर्वच ऋुतूत या विमानतळावरून नियमित सेवा देता येणे शक्य असल्याची शिफारसही केली होती.
अलिकडे कोल्हापूर विमानतळाचा विकास आणि विमानसेवा सुरू करण्याचे श्रेय अनेक राज्यकर्त्यांनी घेण्याचा प्रयत्न केला. प्रस्ताव पाठविल्याचे पत्र, निधी मंजूर केल्याचे पत्र, निधी स्वीकारताना पत्र, निविदीची प्रक्रिया, वनखात्याची जागा ताब्यात घेतल्याचे पत्र आदी बाबत श्रेयवादाचे राजकारण रंगले. मात्र अद्याप विमानसेवा सुरू झालेली नाही. जिल्हा, राज्य आणि केंद्र स्तरावरून कोल्हापूर विमानतळ सुरू करण्यासाठी स्वतंत्र घोषणा केली जात आहे.
पहिल्या पाच विमानतळाच्या यादीत कोल्हापूर विमानतळाचा समावेश होण्यासाठी प्रयत्न केले जातील. त्यासाठी केंद्र सरकारकडे दोन दिवसांत लेखी मागणी केली जाईल. कोल्हापूरच्या विकासासाठी विमानतळ अत्यावश्यक आहे.
- ललित गांधी, अध्यक्ष, चेंबर ऑफ कॉमर्स
रेल्वेने काही प्रकल्प प्रायव्हेट पब्लिक पाटर्नरशीप (पीपीपी) नुसार दिले आहेत. विमानतळाचा विकासासाठी केंद्र आणि राज्य सरकारकडेही पुरेसा निधी नसल्याचे चित्र आहे. विमानतळाचा विकासही पीपीपी नुसार करण्याची गरज आहे.
- आनंद उगवे, वाहतूक तज्ज्ञ