प्रा. शिवाजीराव भुकेले
जनता जनार्दनाच्या अंतःकरणामध्ये शक्तीदेवतेचा संचार झाल्याशिवाय परदासीयत्वाची भयानक स्थिती बदलणे शक्य नाही, याचा साक्षात्कार ज्यांना झाला आहे अशा जनी जनार्दन बघणाऱ्या महाभागवत संत एकनाथांनी निर्गुण निराकार आई अंबामातेस सगुण साकार रुपात येण्याची प्रार्थना, जोगवा, तुझा गोंधळ मांडिला, बया दार उघड इत्यादी भारुडातून केली आहे.
‘अनादि निर्गुण प्रकटली भवानी।
मोह महिषासूर मर्दाना लागुनी।
त्रिविध तापाची करावया झाडणी।
भक्ता लागी तू पावसी निर्वाणी।
आईचा जोगवा-जोगवा मागेन।।’
आई भवानी मातेच्या नावाने जोगवा मागणारे संत गोंधळ्याच्या रुपामध्ये म्हणतात. ‘हे निर्गुण निराकार माते, मोहरुपी महिषासुराचा वध करण्यासाठी तू सगुण साकार झाली आहेस. काम, क्रोध, मद, मत्सर, दंभ, अहंकार या षड्विकाररुपी राक्षसांचा नाश महिषासूर मातेच्या कृपेनेचे होणार आहे. आदिभौतिक, आदिदैविक व अध्यात्मिक हे त्रिविध तापसुद्धा आई अंबामातेच्या कृपेने नष्ट झाले आहेत. जो सर्वसंग परित्याग करून आणि निसंग होऊन आईच्या नावे भक्तीचा जोगवा मागतो तो द्वैत नष्ट करुन अद्वैताच्या पातळीवर पोहेचतो.
ज्या साधकांच्या हातात आत्मबोधाचा झेंडा आहे व जो भेदभावरहित आत्मस्वरुपाची वारी करतो तोच मातेच्या वात्सल्यमय करुणा रुपापर्यंत पोहचू शकतो. अंतःकरणात सद्भावाची दिवटी पेटवून दंभाचा त्याग करुन पूर्ण बोधाची परडी ज्याने भरुन घेतली आहे व जो आशा-निराशेच्या पार पलिकडे गेला आहे, तोच खरा मातेचा आवडता सद्भक्त आहे. नाथांचे हे प्रतिकात्मक नवरात्र हेच खरे नवरात्र आहे.
आपले नवरात्र मात्र कर्मकांड व प्रदर्शन भावनेमध्ये गुंतून पडले आहे. नवरात्रामधील प्रतिपदा ते दशमी म्हणजे नामस्मरण, कीर्तन, श्रवण, पादसेवन, सख्य, अर्चन, वंदन इत्यादी भक्ती प्रकारातील एकेक रात्र व शेवटी भक्ताला मुक्तीचा आनंद देणारी विजयादशमी येते. कोणे एकेकाळी नानाशस्त्र धारिणी सिंहवाहिनी देवीने महिषासूराचा वध केला, पण आज नाक्यानाक्यावर दबा धरुन बसलेला मोहरुपी महिषासूर नवरात्र उत्सवाच्या काळातच आमचाच वध करीत आहे. द्वैत सारुन अद्वैताची माळ घालण्याऐवजी आम्हीच खंडण करून द्वैतभावाची दरी निर्माण करीत आहोत. भेदरहीत वारीस विसरुन भेदभावाच्या गर्तेत आम्ही ढकललो जात आहोत. अशावेळी गरज आहे अंतरीचा सद्भाव निर्माण करणाऱ्या अंबामातेच्या गोंधळाची.
जनता जनार्दनाच्या अंतःकरणामध्ये शक्तीदेवतेचा संचार झाल्याशिवाय परदासीयत्वाची भयानक स्थिती बदलणे शक्य नाही, याचा साक्षात्कार ज्यांना झाला आहे अशा जनी जनार्दन बघणाऱ्या महाभागवत संत एकनाथांनी निर्गुण निराकार आई अंबामातेस सगुण साकार रुपात येण्याची प्रार्थना, जोगवा, तुझा गोंधळ मांडिला, बया दार उघड इत्यादी भारुडातून केली आहे.
‘अनादि निर्गुण प्रकटली भवानी।
मोह महिषासूर मर्दाना लागुनी।
त्रिविध तापाची करावया झाडणी।
भक्ता लागी तू पावसी निर्वाणी।
आईचा जोगवा-जोगवा मागेन।।’
आई भवानी मातेच्या नावाने जोगवा मागणारे संत गोंधळ्याच्या रुपामध्ये म्हणतात. ‘हे निर्गुण निराकार माते, मोहरुपी महिषासुराचा वध करण्यासाठी तू सगुण साकार झाली आहेस. काम, क्रोध, मद, मत्सर, दंभ, अहंकार या षड्विकाररुपी राक्षसांचा नाश महिषासूर मातेच्या कृपेनेचे होणार आहे. आदिभौतिक, आदिदैविक व अध्यात्मिक हे त्रिविध तापसुद्धा आई अंबामातेच्या कृपेने नष्ट झाले आहेत. जो सर्वसंग परित्याग करून आणि निसंग होऊन आईच्या नावे भक्तीचा जोगवा मागतो तो द्वैत नष्ट करुन अद्वैताच्या पातळीवर पोहेचतो.
ज्या साधकांच्या हातात आत्मबोधाचा झेंडा आहे व जो भेदभावरहित आत्मस्वरुपाची वारी करतो तोच मातेच्या वात्सल्यमय करुणा रुपापर्यंत पोहचू शकतो. अंतःकरणात सद्भावाची दिवटी पेटवून दंभाचा त्याग करुन पूर्ण बोधाची परडी ज्याने भरुन घेतली आहे व जो आशा-निराशेच्या पार पलिकडे गेला आहे, तोच खरा मातेचा आवडता सद्भक्त आहे. नाथांचे हे प्रतिकात्मक नवरात्र हेच खरे नवरात्र आहे.
आपले नवरात्र मात्र कर्मकांड व प्रदर्शन भावनेमध्ये गुंतून पडले आहे. नवरात्रामधील प्रतिपदा ते दशमी म्हणजे नामस्मरण, कीर्तन, श्रवण, पादसेवन, सख्य, अर्चन, वंदन इत्यादी भक्ती प्रकारातील एकेक रात्र व शेवटी भक्ताला मुक्तीचा आनंद देणारी विजयादशमी येते. कोणे एकेकाळी नानाशस्त्र धारिणी सिंहवाहिनी देवीने महिषासूराचा वध केला, पण आज नाक्यानाक्यावर दबा धरुन बसलेला मोहरुपी महिषासूर नवरात्र उत्सवाच्या काळातच आमचाच वध करीत आहे. द्वैत सारुन अद्वैताची माळ घालण्याऐवजी आम्हीच खंडण करून द्वैतभावाची दरी निर्माण करीत आहोत. भेदरहीत वारीस विसरुन भेदभावाच्या गर्तेत आम्ही ढकललो जात आहोत. अशावेळी गरज आहे अंतरीचा सद्भाव निर्माण करणाऱ्या अंबामातेच्या गोंधळाची.