म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर
अॅट्रॉसिटीचा वापर करून खोटे गुन्हे दाखल करणाऱ्यांना जिल्हा परिषद निवडणुकीत उमेदवारी देऊ नये, अशी मागणी काही संघटनांनी नुकतीच केली आहे. वेगळ्या पद्धतीने बहिष्कार टाकण्याच्या हेतूने सामाजिक दहशतवाद पसरवणाऱ्यांनीच अशी मागणी केली आहे. ही मागणी सामाजिक शांतता भंग करणारी आहे. त्यामुळे ही मागणी करणाऱ्यांवर कारवाई करण्याची मागणी आंबेडकरवादी संघटनांनी केली आहे. याबाबतचे निवेदन पोलिस अधीक्षक एम. बी. तांबडे यांच्याकडे देण्यात आले आहे.
अॅट्रॉसिटीचा गैरवापर करणाऱ्यांना उमेदवारी देऊ नका, अशी मागणी काही संघटनांनी केली आहे. याला आंबेडकरी संघटनांनी विरोध दर्शवला असून, याबाबत सोमवारी पोलिस अधीक्षक तांबडे यांच्याकडे निवेदन देण्यात आले. संबंधितांवर कारवाईची मागणी निवेदनात करण्यात आली आहे. निवेदनातून म्हटले आहे की, ‘काही संघटनांकडून वेगळ्या पद्धतीने बहिष्कार टाकला जात आहे. अॅट्रॉसिटीचा वापर करणाऱ्यांना उमेदवारी देऊ नये, अशी मागणी करून मागासवर्गीय नागरिकांना निवडणुकीपासून वंचित ठेवण्याचा हा प्रयत्न आहे. सामाजिक शांतता बिघडवणारी मागणी असून, संबंधितांवर कारवाई करावी,’ अशी मागणी आंबेडकरी संघटनांनी केली आहे.
डी. जी. भास्कर, आरपीआयचे अॅड. पंडितराव सडोलीकर, बी. के. कांबळे, बाबासाहेब वडगावकर, शहाजी कांबळे, सखाराम कामत, बहुजन परिवर्तनचे बाजीराव नाईक, ब्लॅक पँथरचे सुभाष देसाई, आदी उपस्थित होते.
अॅट्रॉसिटीचा वापर करून खोटे गुन्हे दाखल करणाऱ्यांना जिल्हा परिषद निवडणुकीत उमेदवारी देऊ नये, अशी मागणी काही संघटनांनी नुकतीच केली आहे. वेगळ्या पद्धतीने बहिष्कार टाकण्याच्या हेतूने सामाजिक दहशतवाद पसरवणाऱ्यांनीच अशी मागणी केली आहे. ही मागणी सामाजिक शांतता भंग करणारी आहे. त्यामुळे ही मागणी करणाऱ्यांवर कारवाई करण्याची मागणी आंबेडकरवादी संघटनांनी केली आहे. याबाबतचे निवेदन पोलिस अधीक्षक एम. बी. तांबडे यांच्याकडे देण्यात आले आहे.
अॅट्रॉसिटीचा गैरवापर करणाऱ्यांना उमेदवारी देऊ नका, अशी मागणी काही संघटनांनी केली आहे. याला आंबेडकरी संघटनांनी विरोध दर्शवला असून, याबाबत सोमवारी पोलिस अधीक्षक तांबडे यांच्याकडे निवेदन देण्यात आले. संबंधितांवर कारवाईची मागणी निवेदनात करण्यात आली आहे. निवेदनातून म्हटले आहे की, ‘काही संघटनांकडून वेगळ्या पद्धतीने बहिष्कार टाकला जात आहे. अॅट्रॉसिटीचा वापर करणाऱ्यांना उमेदवारी देऊ नये, अशी मागणी करून मागासवर्गीय नागरिकांना निवडणुकीपासून वंचित ठेवण्याचा हा प्रयत्न आहे. सामाजिक शांतता बिघडवणारी मागणी असून, संबंधितांवर कारवाई करावी,’ अशी मागणी आंबेडकरी संघटनांनी केली आहे.
डी. जी. भास्कर, आरपीआयचे अॅड. पंडितराव सडोलीकर, बी. के. कांबळे, बाबासाहेब वडगावकर, शहाजी कांबळे, सखाराम कामत, बहुजन परिवर्तनचे बाजीराव नाईक, ब्लॅक पँथरचे सुभाष देसाई, आदी उपस्थित होते.