म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर
यंदा उत्पादन चांगले असल्याने दर स्थिर राहण्याबाबत धान्य बाजारातील अंदाज गेल्या आठवड्यापासून फोल ठरला. तूरडाळ, हरभरा डाळ, मूग डाळ, मसूर डाळीच्या दरात किलोमागे दोन ते पाच रुपयांची वाढ झाली आहे. गुढी पाडव्याच्या सणामुळे दर वाढले असण्याची शक्यता वर्तवण्यात येत असून त्यानंतर हा दर कमी होण्याची शक्यता आहे.
पाऊस चांगला झाल्याने यंदा डाळींचे उत्पादन समाधानकारक झाले आहे. तूरडाळीचे उत्पादन तर मोठ्या प्रमाणावर झाले असल्याने नागरिकांच्यादृष्टीने दर आवाक्यात येण्याचे दिलासादायक चित्र निर्माण झाले होते. त्यामुळे दोन वर्षापूर्वी असलेल्या दराप्रमाणे फेब्रुवारीमध्ये विक्री होत होती. होलसेल बाजारातूनही हे दर असेच स्थिर राहील, असा अंदाज वर्तवण्यात येत होता. पण मार्चच्या पंधरवड्यानंतर हळूहळू दर वाढू लागले. गेल्या आठवड्यात तूरडाळीचा दर ७२ रुपयावरुन ७५ रुपये झाला होता. या आठवड्यात आणखी तीन रुपयांची वाढ होऊन दर ७८ रुपये झाला आहे. हरभरा डाळ व मूग डाळीचा दर ७५ रुपये किलो होता. त्यामध्ये पाच रुपयांची वाढ झाली असून ८० रुपये किलो या डाळी झाल्या आहेत.
मसूर डाळीत तुलनेने कमी म्हणजे दोन रुपयांची वाढ झाली आहे. ७० रुपयांवर असलेली डाळ ७२ रुपये किलो झाली आहे. उडिद डाळीचा वाढलेला दर कायम असून ११० रुपये किलो असा आहे. सध्या चवळीची आवक कमी आहे. त्यामुळे होलसेल बाजारात क्विंटलचा दर ७ हजारावर गेला आहे. यामुळे किरकोळ बाजारात ७५ ते ७८ रुपये असा किलोचा दर आहे. गुढी पाडव्यापर्यंत ही तेजी कायम राहण्याची शक्यता आहे.
यंदा उत्पादन चांगले असल्याने दर स्थिर राहण्याबाबत धान्य बाजारातील अंदाज गेल्या आठवड्यापासून फोल ठरला. तूरडाळ, हरभरा डाळ, मूग डाळ, मसूर डाळीच्या दरात किलोमागे दोन ते पाच रुपयांची वाढ झाली आहे. गुढी पाडव्याच्या सणामुळे दर वाढले असण्याची शक्यता वर्तवण्यात येत असून त्यानंतर हा दर कमी होण्याची शक्यता आहे.
पाऊस चांगला झाल्याने यंदा डाळींचे उत्पादन समाधानकारक झाले आहे. तूरडाळीचे उत्पादन तर मोठ्या प्रमाणावर झाले असल्याने नागरिकांच्यादृष्टीने दर आवाक्यात येण्याचे दिलासादायक चित्र निर्माण झाले होते. त्यामुळे दोन वर्षापूर्वी असलेल्या दराप्रमाणे फेब्रुवारीमध्ये विक्री होत होती. होलसेल बाजारातूनही हे दर असेच स्थिर राहील, असा अंदाज वर्तवण्यात येत होता. पण मार्चच्या पंधरवड्यानंतर हळूहळू दर वाढू लागले. गेल्या आठवड्यात तूरडाळीचा दर ७२ रुपयावरुन ७५ रुपये झाला होता. या आठवड्यात आणखी तीन रुपयांची वाढ होऊन दर ७८ रुपये झाला आहे. हरभरा डाळ व मूग डाळीचा दर ७५ रुपये किलो होता. त्यामध्ये पाच रुपयांची वाढ झाली असून ८० रुपये किलो या डाळी झाल्या आहेत.
मसूर डाळीत तुलनेने कमी म्हणजे दोन रुपयांची वाढ झाली आहे. ७० रुपयांवर असलेली डाळ ७२ रुपये किलो झाली आहे. उडिद डाळीचा वाढलेला दर कायम असून ११० रुपये किलो असा आहे. सध्या चवळीची आवक कमी आहे. त्यामुळे होलसेल बाजारात क्विंटलचा दर ७ हजारावर गेला आहे. यामुळे किरकोळ बाजारात ७५ ते ७८ रुपये असा किलोचा दर आहे. गुढी पाडव्यापर्यंत ही तेजी कायम राहण्याची शक्यता आहे.