Gurubal.mali@timesgroup.com
tweet@:gurubalmaliMT
कोल्हापूर : हागणदारीमुक्त शहर म्हणून देशात प्रथम क्रमांक मिळवलेल्या कोल्हापूरचा खरा चेहरा उघड झाला असून महापालिकेने शिवाजी पेठेत भरवस्तीत ‘ओपन टॉयलेट’ उभारल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. विशेष म्हणजे हे टॉयलेट वापरात असल्याने त्या भागातील नागरिकांचा आरोग्याचा गंभीर प्रश्न निर्माण झाला आहे. केवळ पुरस्कारासाठी खोटे चित्र उभे करत महापालिकेने पंतप्रधानांच्या स्वच्छ भारत योजनेलाच हरताळ फासल्याचे स्पष्ट झाले आहे.
‘डर्टी पिक्चर’ला कंटाळलेल्या या भागातील नागरिकांनी या विषयावर दाद मागण्यासाठी महाराष्ट्र टाइम्सकडे धाव घेतली आणि वास्तव मांडले. यानंतर प्रस्तुत प्रतिनिधीने घटनास्थळी भेट दिल्यानंतर चक्रावून सोडणारे सत्य उजेडात आले. एकतर सारा विधिनिषेध गुंडाळून ठेवत महापालिकेने भरवस्तीत ही ओपन टॉयलेट बांधली. त्याचा वापरही काही नागरिकांनी सुरू केल्याने कोणाला ‘ना लाज-ना लज्जा’ असा प्रकार सुरू झाला आहे. स्वच्छ भारत आणि उघड्यावर ‘विधी’ उरकणाऱ्यांवर गुन्हे दाखल करण्याचा गवगवा केला जात असताना हे टॉयलेट खुलेआम सुरू आहेत. या प्रकरणात केंद्र सरकारला खोटी माहिती देणाऱ्या महापिलकेच्या अधिकाऱ्यांवर आणि सर्व जबाबदार घटकांवर गुन्हे दाखल करण्याची मागणी या भागातील नागरिकांकडून होत आहे.
शिवाजी पेठेतील टिंबर मार्केट परिसरातील संभाजीनगर बसस्थानक प्रभागातील सरनाईक कॉलनी येथे ही ओपन टॉयलेट उभारण्यात आली. या भागात महिला, मुले, विद्यार्थी, आणि ज्येष्ठ नागरिकांची वर्दळ असली तरी त्याला न जुमानता निर्लज्जपणे या टॉयलेटचा उघड्यावरच वापर केला जात असल्याचा चीड आणणारा प्रकार या भागातील संतप्त नागरिकांनी निदर्शनास आणला. स्वच्छतेसाठी पाण्याची कोणतीही सोय नसल्याने त्याची दुर्गंधी पूर्ण कॉलनीत पसरते. यामुळे आरोग्याचा आणि साथ पसरण्याचा धोका निर्माण झाला आहे. हे भयाण वास्तव असताना दुसरीकडे शहरात शंभरटक्के शौचालये असल्याचा खोटा अभिमान बागळत मुंबई, दिल्लीत महापालिका पुरस्कार स्वीकारत आहे.
गेल्या तीन वर्षांत पंतपधान नरेंद्र मोदी यांनी स्वच्छ भारत अभियानावर भर दिला आहे. या अंतर्गत हागणदारीमुक्त गाव अभियान गावागावात राबवले जात आहे. यासाठी हजारो कोटी रूपयांचा निधी खर्च केला जात आहे. ‘घर तेथे शौचालय’ ही सरकारची मोहीम आहे. त्यासाठी मागेल त्याला शौचालयासाठी निधी दिला जातो. सरकारने एवढी सोय करूनही अजूनही अनेक गावे आणि शहरांत उघड्यावर शौचालयास जाणाऱ्यांची संख्या मोठी आहे. कोल्हापूर शहरातच असा प्रकार घडत असल्याचे समोर आल्याने या अभियानाची कशी कुचेष्टा चालवली आहे, हेच स्पष्ट होत आहे. महापालिकेने शौचालय बांधण्याऐवजी रस्त्यावरच कट्टा बांधून उघड्यावरच शौचास बसण्याची अजब सोय केली आहे. एकाचवेळी पाच ते सहा व्यक्ती बसतील, अशी ही सोय आहे. लहान मुलांसाठी ही सोय केल्याचा दिखावा केला असला तरी वस्तुस्थिती तशी नाही.
शिवाजी पेठेतील जुना वाशी नाक्याकडे जाणाऱ्या रस्त्यावर हे ऑपन टॉयलेट बांधण्यात आले आहे. राजाराम चौकानजीक असणारा हा कट्टा भरवस्तीत आहे. पूर्वी हा भाग पाणंद असला तरी आता तो पूर्णपणे विकसीत झाला आहे. येथे चार अपार्टमेंट बांधण्यात आली आहेत. शेजारीच यात्री निवास आहे. रस्त्यावर ये-जा करणाऱ्यांनाच नव्हे तर शेजारच्या सर्व इमारतीतून हा कट्टा सहज नजरेस पडतो. पहाटे आणि सकाळी अनेकजण या कट्ट्यावरच शौचास बसतात. यामुळे महिलांना या रस्त्यावरून ये-जा करणे अवघड झाले आहे. संपूर्ण भागात दिवसरात्र दुर्गंधी पसरलेली असते. नाकाला रूमाल लावल्याशिवाय या भागातून फिरताच येत नाही. मैला निर्गत करण्याची कोणतीच सोय नसल्याने तो थेट गटारीत सोडण्यात आला आहे. मैला गटारीतच तुंबतो. यामुळे दुर्गंधीबरोबरच आरोग्याचाही गंभीर प्रश्न निर्माण झाला आहे.
tweet@:gurubalmaliMT
कोल्हापूर : हागणदारीमुक्त शहर म्हणून देशात प्रथम क्रमांक मिळवलेल्या कोल्हापूरचा खरा चेहरा उघड झाला असून महापालिकेने शिवाजी पेठेत भरवस्तीत ‘ओपन टॉयलेट’ उभारल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. विशेष म्हणजे हे टॉयलेट वापरात असल्याने त्या भागातील नागरिकांचा आरोग्याचा गंभीर प्रश्न निर्माण झाला आहे. केवळ पुरस्कारासाठी खोटे चित्र उभे करत महापालिकेने पंतप्रधानांच्या स्वच्छ भारत योजनेलाच हरताळ फासल्याचे स्पष्ट झाले आहे.
‘डर्टी पिक्चर’ला कंटाळलेल्या या भागातील नागरिकांनी या विषयावर दाद मागण्यासाठी महाराष्ट्र टाइम्सकडे धाव घेतली आणि वास्तव मांडले. यानंतर प्रस्तुत प्रतिनिधीने घटनास्थळी भेट दिल्यानंतर चक्रावून सोडणारे सत्य उजेडात आले. एकतर सारा विधिनिषेध गुंडाळून ठेवत महापालिकेने भरवस्तीत ही ओपन टॉयलेट बांधली. त्याचा वापरही काही नागरिकांनी सुरू केल्याने कोणाला ‘ना लाज-ना लज्जा’ असा प्रकार सुरू झाला आहे. स्वच्छ भारत आणि उघड्यावर ‘विधी’ उरकणाऱ्यांवर गुन्हे दाखल करण्याचा गवगवा केला जात असताना हे टॉयलेट खुलेआम सुरू आहेत. या प्रकरणात केंद्र सरकारला खोटी माहिती देणाऱ्या महापिलकेच्या अधिकाऱ्यांवर आणि सर्व जबाबदार घटकांवर गुन्हे दाखल करण्याची मागणी या भागातील नागरिकांकडून होत आहे.
शिवाजी पेठेतील टिंबर मार्केट परिसरातील संभाजीनगर बसस्थानक प्रभागातील सरनाईक कॉलनी येथे ही ओपन टॉयलेट उभारण्यात आली. या भागात महिला, मुले, विद्यार्थी, आणि ज्येष्ठ नागरिकांची वर्दळ असली तरी त्याला न जुमानता निर्लज्जपणे या टॉयलेटचा उघड्यावरच वापर केला जात असल्याचा चीड आणणारा प्रकार या भागातील संतप्त नागरिकांनी निदर्शनास आणला. स्वच्छतेसाठी पाण्याची कोणतीही सोय नसल्याने त्याची दुर्गंधी पूर्ण कॉलनीत पसरते. यामुळे आरोग्याचा आणि साथ पसरण्याचा धोका निर्माण झाला आहे. हे भयाण वास्तव असताना दुसरीकडे शहरात शंभरटक्के शौचालये असल्याचा खोटा अभिमान बागळत मुंबई, दिल्लीत महापालिका पुरस्कार स्वीकारत आहे.
गेल्या तीन वर्षांत पंतपधान नरेंद्र मोदी यांनी स्वच्छ भारत अभियानावर भर दिला आहे. या अंतर्गत हागणदारीमुक्त गाव अभियान गावागावात राबवले जात आहे. यासाठी हजारो कोटी रूपयांचा निधी खर्च केला जात आहे. ‘घर तेथे शौचालय’ ही सरकारची मोहीम आहे. त्यासाठी मागेल त्याला शौचालयासाठी निधी दिला जातो. सरकारने एवढी सोय करूनही अजूनही अनेक गावे आणि शहरांत उघड्यावर शौचालयास जाणाऱ्यांची संख्या मोठी आहे. कोल्हापूर शहरातच असा प्रकार घडत असल्याचे समोर आल्याने या अभियानाची कशी कुचेष्टा चालवली आहे, हेच स्पष्ट होत आहे. महापालिकेने शौचालय बांधण्याऐवजी रस्त्यावरच कट्टा बांधून उघड्यावरच शौचास बसण्याची अजब सोय केली आहे. एकाचवेळी पाच ते सहा व्यक्ती बसतील, अशी ही सोय आहे. लहान मुलांसाठी ही सोय केल्याचा दिखावा केला असला तरी वस्तुस्थिती तशी नाही.
शिवाजी पेठेतील जुना वाशी नाक्याकडे जाणाऱ्या रस्त्यावर हे ऑपन टॉयलेट बांधण्यात आले आहे. राजाराम चौकानजीक असणारा हा कट्टा भरवस्तीत आहे. पूर्वी हा भाग पाणंद असला तरी आता तो पूर्णपणे विकसीत झाला आहे. येथे चार अपार्टमेंट बांधण्यात आली आहेत. शेजारीच यात्री निवास आहे. रस्त्यावर ये-जा करणाऱ्यांनाच नव्हे तर शेजारच्या सर्व इमारतीतून हा कट्टा सहज नजरेस पडतो. पहाटे आणि सकाळी अनेकजण या कट्ट्यावरच शौचास बसतात. यामुळे महिलांना या रस्त्यावरून ये-जा करणे अवघड झाले आहे. संपूर्ण भागात दिवसरात्र दुर्गंधी पसरलेली असते. नाकाला रूमाल लावल्याशिवाय या भागातून फिरताच येत नाही. मैला निर्गत करण्याची कोणतीच सोय नसल्याने तो थेट गटारीत सोडण्यात आला आहे. मैला गटारीतच तुंबतो. यामुळे दुर्गंधीबरोबरच आरोग्याचाही गंभीर प्रश्न निर्माण झाला आहे.