म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर
‘जिल्ह्यातील शाळांमध्ये ५१३ नवीन खोल्यांची आवश्यकता आहे. त्यासाठी ३७ कोटी ८९ लाख रुपयांची गरज आहे. तर ९८१ शाळांच्या खोल्यांच्या दुरुस्तीसाठी नऊ कोटी ८१ लाख व १६१ शाळांच्या संरक्षक भिंतीसाठी नऊ कोटी रुपये लागणार आहेत. खोल्या दुरुस्ती व संरक्षक भिंतीसाठी लागणार १८ कोटी रुपयांचा निधी त्वरीत देऊन वर्षाखेरीस सर्व कामे पूर्ण होतील’ असे पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी नियोजन मंडळाच्या बैठकीत सांगितले.
जिल्हा परिषदेच्यावतीने शाळांची पाहणी केली होती. पाहणीमध्ये जिल्ह्यातील ५१३ शाळांना नवीन खोल्यांची आवश्यकता आहे. तर ९८१ शाळांच्या खोल्यांची अवस्था दयनीय झाली आहे. तर १६१ शाळांना संरक्षक भिंती नसल्याचे स्पष्ट झाले आहे. नवीन खोल्या, दुरुस्ती किंवा संरक्षक भिंतीसाठी सर्व शिक्षा अभियानातंर्गत निधीची उपलब्धता होत नसल्याने अनेक ठिकाणी उघड्यावर वर्ग भरत आहेत. त्यामुळे सक्तीचे व मोफत शिक्षणाच्या कायद्याची पायमल्ली होत असल्याचे खासदार शेट्टी यांनी निदर्शनास आणून दिले.
‘नवीन खोल्यांसाठी ३७ कोटी ८९ लाखांचा निधी लागणार असून हा निधी सर्व शिक्षा अभियानातून आणण्यासाठी प्रयत्न करुन. शाळा दुरुस्ती व संरक्षक भिंतीसाठी लागणारा १८ कोटीचा निधी त्वरीत उपलब्ध करुन वर्षाखेरीस कामे पूर्ण होतील. तसेच जिल्ह्यात १६० तलाठी कार्यालयांची आवश्यकता असून त्यातील ५० तलाठी कार्यालये अद्ययावत उभारण्यात येणार आहेत’ असे पालकमंत्री पाटील म्हणाले.
कामांना आचारसंहिता नको
जिल्ह्यातील ४१२ ग्रामपंचायतीच्या निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर झाला आहे. यापूर्वी ग्रामपंचायतीच्या निवडणुकी दरम्यान अचारसंहितेमध्ये सरकारी कामे अडकली जात नव्हती. मात्र सद्या नव्याने घेतलेली काम अचारसंहितेमध्ये अडकणार नाहीत, याची दक्षता घेण्याची सूचना सर्वच लोकप्रतिनिधिंनी केली.
‘महाराष्ट्र टाइम्स’चा पाठपुरावा
जिल्हा परिषदेच्या जिल्ह्यातील पडझड झालेल्या शाळांची अवस्था व व्हरांड्यामध्ये भरणाऱ्या वर्गांसंबंधी ‘मटा’ने वृत्त प्रसिद्ध करुन प्रशासन व लोकप्रतिनिधींचे लक्ष वेधले होते. त्याची दखल घेत जिल्हा परिषदेने शाळांची पाहणी करून नवीन खोल्या, दुरुस्ती व संरक्षक भिंतीसाठी लागणाऱ्या निधीचा आराखडा तयार केला. तयार आराखड्यानुसारच सोमवारी झालेल्या जिल्हा नियोजम मंडळाच्या बैठकीत तब्बल १८ कोटींचा निधी देऊन वर्षाखेरीस कामे पूर्ण करण्याच्या सूचना स्वत: पालकमंत्री पाटील यांनी दिल्या आहेत.
‘जिल्ह्यातील शाळांमध्ये ५१३ नवीन खोल्यांची आवश्यकता आहे. त्यासाठी ३७ कोटी ८९ लाख रुपयांची गरज आहे. तर ९८१ शाळांच्या खोल्यांच्या दुरुस्तीसाठी नऊ कोटी ८१ लाख व १६१ शाळांच्या संरक्षक भिंतीसाठी नऊ कोटी रुपये लागणार आहेत. खोल्या दुरुस्ती व संरक्षक भिंतीसाठी लागणार १८ कोटी रुपयांचा निधी त्वरीत देऊन वर्षाखेरीस सर्व कामे पूर्ण होतील’ असे पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी नियोजन मंडळाच्या बैठकीत सांगितले.
जिल्हा परिषदेच्यावतीने शाळांची पाहणी केली होती. पाहणीमध्ये जिल्ह्यातील ५१३ शाळांना नवीन खोल्यांची आवश्यकता आहे. तर ९८१ शाळांच्या खोल्यांची अवस्था दयनीय झाली आहे. तर १६१ शाळांना संरक्षक भिंती नसल्याचे स्पष्ट झाले आहे. नवीन खोल्या, दुरुस्ती किंवा संरक्षक भिंतीसाठी सर्व शिक्षा अभियानातंर्गत निधीची उपलब्धता होत नसल्याने अनेक ठिकाणी उघड्यावर वर्ग भरत आहेत. त्यामुळे सक्तीचे व मोफत शिक्षणाच्या कायद्याची पायमल्ली होत असल्याचे खासदार शेट्टी यांनी निदर्शनास आणून दिले.
‘नवीन खोल्यांसाठी ३७ कोटी ८९ लाखांचा निधी लागणार असून हा निधी सर्व शिक्षा अभियानातून आणण्यासाठी प्रयत्न करुन. शाळा दुरुस्ती व संरक्षक भिंतीसाठी लागणारा १८ कोटीचा निधी त्वरीत उपलब्ध करुन वर्षाखेरीस कामे पूर्ण होतील. तसेच जिल्ह्यात १६० तलाठी कार्यालयांची आवश्यकता असून त्यातील ५० तलाठी कार्यालये अद्ययावत उभारण्यात येणार आहेत’ असे पालकमंत्री पाटील म्हणाले.
कामांना आचारसंहिता नको
जिल्ह्यातील ४१२ ग्रामपंचायतीच्या निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर झाला आहे. यापूर्वी ग्रामपंचायतीच्या निवडणुकी दरम्यान अचारसंहितेमध्ये सरकारी कामे अडकली जात नव्हती. मात्र सद्या नव्याने घेतलेली काम अचारसंहितेमध्ये अडकणार नाहीत, याची दक्षता घेण्याची सूचना सर्वच लोकप्रतिनिधिंनी केली.
‘महाराष्ट्र टाइम्स’चा पाठपुरावा
जिल्हा परिषदेच्या जिल्ह्यातील पडझड झालेल्या शाळांची अवस्था व व्हरांड्यामध्ये भरणाऱ्या वर्गांसंबंधी ‘मटा’ने वृत्त प्रसिद्ध करुन प्रशासन व लोकप्रतिनिधींचे लक्ष वेधले होते. त्याची दखल घेत जिल्हा परिषदेने शाळांची पाहणी करून नवीन खोल्या, दुरुस्ती व संरक्षक भिंतीसाठी लागणाऱ्या निधीचा आराखडा तयार केला. तयार आराखड्यानुसारच सोमवारी झालेल्या जिल्हा नियोजम मंडळाच्या बैठकीत तब्बल १८ कोटींचा निधी देऊन वर्षाखेरीस कामे पूर्ण करण्याच्या सूचना स्वत: पालकमंत्री पाटील यांनी दिल्या आहेत.