म. टा. प्रतिनिधी,कोल्हापूर
मुंबईतील कमला कम्पाउंडमधील आगीच्या दुर्घटनेनंतर कोल्हापूर महापालिकेनेही बडी हॉटेल्स, रेस्टॉरंट, उपाहरगृहे, लॉजिंग,बोर्डिंग आणि यात्री निवासाची पाहणी सुरु केली आहे. न्यू इयर सेलिब्रेशन करणाऱ्या पाच बड्या हॉटेलमधील फायर ऑडीटमधील त्रुटी लक्षात घेऊन त्यांना नोटीस बजावली आहे .
सरत्या वर्षाला निरोप आणि नववर्षाचे जंगी स्वागत करण्यासाठी शहरातील अनेक बड्या हॉटेलनी न्यू इयर पार्टीचे आयोजन केले आहे. शुक्रवारी अग्निशमन दलाच्या चार अधिकाऱ्यांच्या पथकाने शहरातील हॉटेल, पब, बिअर बारची तपासणी सुरु केली आहे. रविवारीही ही तपासणी केली जाणार आहे.
ज्या हॉटेलमध्ये न्यू इयर पार्टी सेलिब्रेशन आहे अशा हॉटेल्सची तपासणी करण्यात आली आहे. मध्यवर्ती बस स्थानक, ताराबाई पार्क, शिवाजी पार्क, नागाळा पार्क आणि स्टेशन रोड परिसरातील हॉटेलची तपासणी करण्यात आली. बहुतांशी हॉटेल्सनी अग्निप्रतिबंधक उपाययोजना केल्या असल्या तरी पथकाला काही त्रुटी आढळल्याने मध्यवर्ती बस स्थानक परिसरातील पाच हॉटेलना नोटीस बजावल्या आहेत. गेल्या पाच वर्षांत जी नवीन हॉटेल सुरु झाली आहेत त्या ठिकाणी फायर ऑडिटच्या निकषानुसार बांधकाम केल्याचे निदर्शनास आले. हॉटेलमधील येण्याचे जाण्याचे मार्ग, संकटसमयी बाहेर पडण्याच्या मार्गाची तपासणी करण्यात आली आहे. चायनीज माळा व विजेचे साहित्य टाळण्याचा सल्लाही देण्यात आला आहे. पथकाने हॉटेलमधील किचनची पाहणी करुन उघड्यावर तंदूर भट्टी पेटवण्यास बंदी घातली आहे. हॉटेलचालकांना ओव्हन वापरण्याचा सल्ला दिला आहे.
दरम्यान महापालिकेच्यावतीने हॉटेल, बार, पब, लॉजिंग बोर्डिंग, यात्री निवासांचे फायर ऑडिट करण्यासंदर्भात तपासणी केली जाते. दोन महिन्यांपूर्वी हे ऑडिट पूर्ण झाले आहे. तरीही शहरात मोठ्या संख्येने पर्यटक येत असल्याने हॉटेल, लॉजिंग बोर्डिंग, यात्रा निवासाची रविवारी कसून तपासणी करण्यात येणार आहे.
०००००
गेले दोन दिवस शहरातील प्रमुख मोठ्या हॉटेलची तपासणी करण्यात आली. न्यू इयर पार्टी आयोजित करणाऱ्या पाच हॉटेल्समध्ये काही त्रुटी आढळल्याने त्यांना नोटीस पाठवण्यात आली आहे.
रणजित चिले, अग्निशामक विभाग प्रमुख
००००
शिवसेनेची फायर ऑडिटची मागणी
महापालिकेने नोटिसांचे कागदी घोडे नाचवू नये. सर्व बार, पब्ज, हॉटेल्स, चित्रपटगृहे, शॉपिंग मॉल्स, मंगल कार्यालये, व्यापारी व रहिवाशी संकुले, हॉस्पिटल, सरकारी कार्यालयांचे फायर ऑडिट १५ दिवसांत करावे, अशी मागणी शिवसेनेचे जिल्हा प्रमुख संजय पवार यांनी पत्रकाव्दारे केली आहे.
मुंबईतील कमला कम्पाउंडमधील आगीच्या दुर्घटनेनंतर कोल्हापूर महापालिकेनेही बडी हॉटेल्स, रेस्टॉरंट, उपाहरगृहे, लॉजिंग,बोर्डिंग आणि यात्री निवासाची पाहणी सुरु केली आहे. न्यू इयर सेलिब्रेशन करणाऱ्या पाच बड्या हॉटेलमधील फायर ऑडीटमधील त्रुटी लक्षात घेऊन त्यांना नोटीस बजावली आहे .
सरत्या वर्षाला निरोप आणि नववर्षाचे जंगी स्वागत करण्यासाठी शहरातील अनेक बड्या हॉटेलनी न्यू इयर पार्टीचे आयोजन केले आहे. शुक्रवारी अग्निशमन दलाच्या चार अधिकाऱ्यांच्या पथकाने शहरातील हॉटेल, पब, बिअर बारची तपासणी सुरु केली आहे. रविवारीही ही तपासणी केली जाणार आहे.
ज्या हॉटेलमध्ये न्यू इयर पार्टी सेलिब्रेशन आहे अशा हॉटेल्सची तपासणी करण्यात आली आहे. मध्यवर्ती बस स्थानक, ताराबाई पार्क, शिवाजी पार्क, नागाळा पार्क आणि स्टेशन रोड परिसरातील हॉटेलची तपासणी करण्यात आली. बहुतांशी हॉटेल्सनी अग्निप्रतिबंधक उपाययोजना केल्या असल्या तरी पथकाला काही त्रुटी आढळल्याने मध्यवर्ती बस स्थानक परिसरातील पाच हॉटेलना नोटीस बजावल्या आहेत. गेल्या पाच वर्षांत जी नवीन हॉटेल सुरु झाली आहेत त्या ठिकाणी फायर ऑडिटच्या निकषानुसार बांधकाम केल्याचे निदर्शनास आले. हॉटेलमधील येण्याचे जाण्याचे मार्ग, संकटसमयी बाहेर पडण्याच्या मार्गाची तपासणी करण्यात आली आहे. चायनीज माळा व विजेचे साहित्य टाळण्याचा सल्लाही देण्यात आला आहे. पथकाने हॉटेलमधील किचनची पाहणी करुन उघड्यावर तंदूर भट्टी पेटवण्यास बंदी घातली आहे. हॉटेलचालकांना ओव्हन वापरण्याचा सल्ला दिला आहे.
दरम्यान महापालिकेच्यावतीने हॉटेल, बार, पब, लॉजिंग बोर्डिंग, यात्री निवासांचे फायर ऑडिट करण्यासंदर्भात तपासणी केली जाते. दोन महिन्यांपूर्वी हे ऑडिट पूर्ण झाले आहे. तरीही शहरात मोठ्या संख्येने पर्यटक येत असल्याने हॉटेल, लॉजिंग बोर्डिंग, यात्रा निवासाची रविवारी कसून तपासणी करण्यात येणार आहे.
०००००
गेले दोन दिवस शहरातील प्रमुख मोठ्या हॉटेलची तपासणी करण्यात आली. न्यू इयर पार्टी आयोजित करणाऱ्या पाच हॉटेल्समध्ये काही त्रुटी आढळल्याने त्यांना नोटीस पाठवण्यात आली आहे.
रणजित चिले, अग्निशामक विभाग प्रमुख
००००
शिवसेनेची फायर ऑडिटची मागणी
महापालिकेने नोटिसांचे कागदी घोडे नाचवू नये. सर्व बार, पब्ज, हॉटेल्स, चित्रपटगृहे, शॉपिंग मॉल्स, मंगल कार्यालये, व्यापारी व रहिवाशी संकुले, हॉस्पिटल, सरकारी कार्यालयांचे फायर ऑडिट १५ दिवसांत करावे, अशी मागणी शिवसेनेचे जिल्हा प्रमुख संजय पवार यांनी पत्रकाव्दारे केली आहे.