म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर
जोतिबा देवस्थान तीर्थक्षेत्र विकास आराखड्याला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखालील शिखर समितीने मंजुरी दिली. मंगळवारी मुख्यमंत्र्यांच्या वर्षा निवासस्थानी बैठक झाली. तिर्थक्षेत्र विकास आराखडा तयार करताना घनकचरा आणि सांडपाणी व्यवस्थापन, बसस्थानक, जलपुनर्भरण आदी बाबींचा यामध्ये समावेश करावा, अशा सूचनाही मुख्यमंत्र्यांनी यावेळी दिल्या. २५ कोटींचा हा आराखडा आहे.
आराखड्यानुसार सेंट्रल प्लाझा परिसराचे नूतनीकरण करण्यात येणार आहे. भूमिगत वीजवाहिन्या, भक्तनिवास बांधणे, दर्शन मंडप उभारणी, सांडपाणी, घनकचरा व्यवस्थापन आणि पर्जन्य जलपुनर्भरण आदी कामांचा समावेश आहे. भक्त निवासात कुटुंबांसाठी २२ खोल्या व ३ मोठे हॉल बांधण्यात येणार आहेत. आठ ते दहा हजार क्षमतेचा दर्शन मंडप उभारण्यात येणार आहे. सेंट्रल प्लाझा येथे अॅम्पिथिएटरसारखी व्यवस्था करण्यात येणार असून तेथे साहित्य विक्रीची दुकाने असतील. १५ दिवसांत याबाबतचा अध्यादेश काढून कामास सुरुवात करण्यात येणार आहे. आराखड्याचे सादरीकरण जिल्हाधिकारी डॉ. अमित सैनी यांनी केले.
तीर्थक्षेत्रांचा विकास आराखडा बनविताना इतर पायाभूत सुविधांबरोबरच सांडपाणी व्यवस्थापन, घनकचरा व्यवस्थापन, बस डेपो, पोलीस चौकी यांचाही प्राधान्याने समावेश करावा. तसेच भक्तनिवास, शौचालय आदींच्या देखभाल दुरुस्तीचीही जबाबदारी सोपविण्यात यावी. जेणेकरून पुढील काळातही तीर्थक्षेत्रे स्वच्छ व सुंदर राहतील, अशी सूचना मुख्यमंत्र्यांनी यावेळी केली.
जोतिबा देवस्थान तीर्थक्षेत्र विकास आराखड्याला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखालील शिखर समितीने मंजुरी दिली. मंगळवारी मुख्यमंत्र्यांच्या वर्षा निवासस्थानी बैठक झाली. तिर्थक्षेत्र विकास आराखडा तयार करताना घनकचरा आणि सांडपाणी व्यवस्थापन, बसस्थानक, जलपुनर्भरण आदी बाबींचा यामध्ये समावेश करावा, अशा सूचनाही मुख्यमंत्र्यांनी यावेळी दिल्या. २५ कोटींचा हा आराखडा आहे.
आराखड्यानुसार सेंट्रल प्लाझा परिसराचे नूतनीकरण करण्यात येणार आहे. भूमिगत वीजवाहिन्या, भक्तनिवास बांधणे, दर्शन मंडप उभारणी, सांडपाणी, घनकचरा व्यवस्थापन आणि पर्जन्य जलपुनर्भरण आदी कामांचा समावेश आहे. भक्त निवासात कुटुंबांसाठी २२ खोल्या व ३ मोठे हॉल बांधण्यात येणार आहेत. आठ ते दहा हजार क्षमतेचा दर्शन मंडप उभारण्यात येणार आहे. सेंट्रल प्लाझा येथे अॅम्पिथिएटरसारखी व्यवस्था करण्यात येणार असून तेथे साहित्य विक्रीची दुकाने असतील. १५ दिवसांत याबाबतचा अध्यादेश काढून कामास सुरुवात करण्यात येणार आहे. आराखड्याचे सादरीकरण जिल्हाधिकारी डॉ. अमित सैनी यांनी केले.
तीर्थक्षेत्रांचा विकास आराखडा बनविताना इतर पायाभूत सुविधांबरोबरच सांडपाणी व्यवस्थापन, घनकचरा व्यवस्थापन, बस डेपो, पोलीस चौकी यांचाही प्राधान्याने समावेश करावा. तसेच भक्तनिवास, शौचालय आदींच्या देखभाल दुरुस्तीचीही जबाबदारी सोपविण्यात यावी. जेणेकरून पुढील काळातही तीर्थक्षेत्रे स्वच्छ व सुंदर राहतील, अशी सूचना मुख्यमंत्र्यांनी यावेळी केली.