म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर
प्रशासक नियुक्तीनंतर सत्तेवर आलेल्या कोल्हापूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या संचालक मंडळाने बँकेचा संचित तोटा भरुन काढला आहे. आता बँक फायद्यात आणली असल्याने जुलै महिन्यात हे सर्व संचालक, चेअरमन हसन मुश्रीफ यांच्या खर्चाने परदेशवारीवर जाणार आहेत. मॉरिशस व दुबई दौऱ्याचा कार्यक्रम निश्चित झाला आहे असे सूत्रांनी सांगितले.
कोल्हापूर जिल्हा बँकेची सहकार कलम ‘८८’ नुसार चौकशी झाल्यानंतर बँकेवर प्रशासकांची नियुक्ती करण्यात आली होती. प्रशासकीय काळात कर्जवसुली मोहीम तीव्र करुनही बँकेच्या ताळेबंदामध्ये सुधारणा झालेली नव्हती. चौकशीचा ससेमिरा पूर्ण झाल्यानंतर पुन्हा बँकेची निवडणूक झाली. त्यानंतर संचालक मंडळ अस्तित्वात आले. बँकेने वसुली मोहीम तीव्र करत बँकेचा संचित तोटा भरुन काढला. सनई-चौघडा वाजवत कर्जवसुली केल्याने अनेक मोठ्या थकबाकीदारांनी ‘ओटीएस’मध्ये कर्जाची परतफेड केली. त्यामुळे धोक्यात आलेला बँकेचा परवाना सुरक्षित राहिला.
तसेच संचालक मंडळाने घेतलेल्या विविध कर्जयोजनांमुळे कर्जपुरवठाही चांगला झाला. कर्जवसुलीमुळे बँकेचा संचित तोटा कमी झाल्याने उत्साही झालेल्या चेअरमन मुश्रीफ यांनी, सर्व संचालकांना घेऊन परदेशगमनाचा बेत आखला आहे. जुलै महिन्याच्या अखेरीस हे सर्व संचालक मॉरिशस व दुबईसाठी रवाना होणार आहेत. मात्र, हा खर्च चेअरमन मुश्रीफ हे स्वतः करणार असल्याचे सांगण्यात आले.
प्रशासक नियुक्तीनंतर सत्तेवर आलेल्या कोल्हापूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या संचालक मंडळाने बँकेचा संचित तोटा भरुन काढला आहे. आता बँक फायद्यात आणली असल्याने जुलै महिन्यात हे सर्व संचालक, चेअरमन हसन मुश्रीफ यांच्या खर्चाने परदेशवारीवर जाणार आहेत. मॉरिशस व दुबई दौऱ्याचा कार्यक्रम निश्चित झाला आहे असे सूत्रांनी सांगितले.
कोल्हापूर जिल्हा बँकेची सहकार कलम ‘८८’ नुसार चौकशी झाल्यानंतर बँकेवर प्रशासकांची नियुक्ती करण्यात आली होती. प्रशासकीय काळात कर्जवसुली मोहीम तीव्र करुनही बँकेच्या ताळेबंदामध्ये सुधारणा झालेली नव्हती. चौकशीचा ससेमिरा पूर्ण झाल्यानंतर पुन्हा बँकेची निवडणूक झाली. त्यानंतर संचालक मंडळ अस्तित्वात आले. बँकेने वसुली मोहीम तीव्र करत बँकेचा संचित तोटा भरुन काढला. सनई-चौघडा वाजवत कर्जवसुली केल्याने अनेक मोठ्या थकबाकीदारांनी ‘ओटीएस’मध्ये कर्जाची परतफेड केली. त्यामुळे धोक्यात आलेला बँकेचा परवाना सुरक्षित राहिला.
तसेच संचालक मंडळाने घेतलेल्या विविध कर्जयोजनांमुळे कर्जपुरवठाही चांगला झाला. कर्जवसुलीमुळे बँकेचा संचित तोटा कमी झाल्याने उत्साही झालेल्या चेअरमन मुश्रीफ यांनी, सर्व संचालकांना घेऊन परदेशगमनाचा बेत आखला आहे. जुलै महिन्याच्या अखेरीस हे सर्व संचालक मॉरिशस व दुबईसाठी रवाना होणार आहेत. मात्र, हा खर्च चेअरमन मुश्रीफ हे स्वतः करणार असल्याचे सांगण्यात आले.