म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर
महापालिकेच्या घरफाळा विभागातील अनागोंदी कारभारावरुन प्रशासनाला धारेवर धरताना नगरसेवकांनी घरफाळा विभागाची ७३ कोटी रुपयांची थकबाकी असल्याचा भांडाफोड सभागृहात केला. घरफाळ्याच्या थकीत रकमेची वसुली करण्याऐवजी नागरिकांच्या माथ्यावर करवाढीचा बोजा लादण्याचा प्रकार अन्यायकारक असून तो सहन केला जाणार नाही. प्रशासनाने, आधी घरफाळा विभागाच्या कामकाजात सुधारणा करावी, वसुली मोहिम राबवावी आणि नंतर करवाढीबाबतचा प्रस्तावावर चर्चा अशी आक्रमक भूमिका सभागृहाने घेतली. विविध प्रभागाच्या नगरसेवकांनी घरफाळा लागू होण्यासाठी नागरिक कार्यालयाचे उंबरठे झिजवतात, पण प्रशासनाकडून आकारणी होत नसल्याचे आकडेवारीसह सभागृहाच्या निदर्शनास आणले. महापौर हसीना फरास यांच्या अध्यक्षतेखाली सभा झाली.
भाजपचे नगरसेवक अजित ठाणेकर म्हणाले, ‘घरफाळा विभागाचे कामकाज चिंताजनक आहे. विभागाची तब्बल ७३ कोटी ९२ लाख रुपयांची थकबाकी आहे. ४९ मिळकतधारकांकडे दहा लाखांपेक्षा जास्त थकबाकी असून त्याची एकूण रक्कम ९ कोटी रुपये आहे. एक हजार ते दहा हजार रुपयापर्यंतची थकबाकीची रक्कम चाळीस कोटीच्या घरात आहे. ८९७ मिळकतधारक हे एक ते पाच लाख रुपयापर्यंतची थकबाकीधारक असून त्यांच्याकडून १७ कोटी रुपये वसूल होऊ शकतात. ८६ मिळकतधारकांकडे पाच ते दहा लाख रुपयांची थकबाकी असून ही रक्कम पाच कोटी ९८ लाख इतकी आहे. मोठ्या प्रमाणातील थकबाकी वसुलीऐवजी प्रशासन उत्पन्नवाढीचा प्रस्ताव देत आहे. मात्र उत्पन्नवाढीसाठी करवाढ हे एकमेव माध्यम असू शकत नाही. प्रशासनाने प्रभावी वसुली मोहिम, नव्या मिळकतीचा शोध घेऊन घरफाळा आकारणी केली तर करवाढीची गरज नाही.’
काँग्रेसचे गटनेते शारंगधर देशमुख यांनी घरफाळा विभागातील अधिकारी कार्यक्षमतेने काम करत नाहीत. मिळकतधारकांशी संगनमत करुन घरफाळा लागू केला जात नाही. यामुळे महापालिकेचे नुकसान होत आहे. कर्मचाऱ्यांच्या नाकतर्पेणामुळे शहरातील हजारो मिळकतींना घरफाळा लागू झाला नसल्याचे सांगत भ्रष्ट कर्मचाऱ्यांना चाप लावावा अशी सूचना केली.
नगरसेवक भूपाल शेटे, वहिदा सौदागर, उमा बनछोडे, प्रविण केसरकर, सूरमंजिली लाटकर, किरण नकाते, शेखर कुसाळे, पूजा नाईकनवरे यांनी घरफाळा आणि पाणीपट्टीचा विषय हा संवेदनशील आहे. घरफाळा आकारणीसाठी प्रत्येक प्रभागात कॅम्प लावा अशा सूचना केल्या.
महापालिकेच्या इमारतीत घोड्याचा तबेला
राजेंद्रनगर येथे एकात्मिक झोपडपट्टी विकास कार्यक्रमातंर्गत कर्मचाऱ्यांसाठी बांधलेल्या इमारतीत अतिक्रमण झाले आहे. काही जणांनी येथे जबरदस्तीने जागा बळकाविल्या आहेत. महापालिकेच्या मालकीची इमारतीत घोड्याचा तबेला सुरु झाला आहे. या ठिकाणी अनधिकृत व्यवसाय सुरु असून महापालिकेचे अधिकारी आणि कर्मचारी काय करत आहेत? असा सवाल नगरसेविका रुपाराणी निकम यांनी केला. प्रा. जयंत पाटील यांनी हा प्रश्न उचलून धरत अतिरिक्त आयुक्त श्रीधर पाटणकर, इस्टेट अधिकारी प्रमोद बराले यांच्याकडे याप्रश्नी विचारणा केली. निकम व पाटील यांनी, संबंधितांवर आजच्या आज करावी या शब्दात खडसावले. प्रशासनाने तत्काळ हालचाली करत राजेंद्रनगरमधील त्या इमारतीची तपासणी सुरु केली. नगरसेवक मुरलीधर जाधव, विलास वास्कर यांनी राजारामपुरी पाण्याच्या टाकीजवळील इमारतीत गैरप्रकार सुरु आहेत, गांजा पार्टी चालते. कर्मचारी कारवाईस गेल्यावर त्यांना मारहाणीच्या घटना घडतात असे सांगितले. महापालिकेच्या इमारतीत अतिक्रमण करणाऱ्यावर कारवाईची मागणी त्यांनी केली.
महापालिकेच्या घरफाळा विभागातील अनागोंदी कारभारावरुन प्रशासनाला धारेवर धरताना नगरसेवकांनी घरफाळा विभागाची ७३ कोटी रुपयांची थकबाकी असल्याचा भांडाफोड सभागृहात केला. घरफाळ्याच्या थकीत रकमेची वसुली करण्याऐवजी नागरिकांच्या माथ्यावर करवाढीचा बोजा लादण्याचा प्रकार अन्यायकारक असून तो सहन केला जाणार नाही. प्रशासनाने, आधी घरफाळा विभागाच्या कामकाजात सुधारणा करावी, वसुली मोहिम राबवावी आणि नंतर करवाढीबाबतचा प्रस्तावावर चर्चा अशी आक्रमक भूमिका सभागृहाने घेतली. विविध प्रभागाच्या नगरसेवकांनी घरफाळा लागू होण्यासाठी नागरिक कार्यालयाचे उंबरठे झिजवतात, पण प्रशासनाकडून आकारणी होत नसल्याचे आकडेवारीसह सभागृहाच्या निदर्शनास आणले. महापौर हसीना फरास यांच्या अध्यक्षतेखाली सभा झाली.
भाजपचे नगरसेवक अजित ठाणेकर म्हणाले, ‘घरफाळा विभागाचे कामकाज चिंताजनक आहे. विभागाची तब्बल ७३ कोटी ९२ लाख रुपयांची थकबाकी आहे. ४९ मिळकतधारकांकडे दहा लाखांपेक्षा जास्त थकबाकी असून त्याची एकूण रक्कम ९ कोटी रुपये आहे. एक हजार ते दहा हजार रुपयापर्यंतची थकबाकीची रक्कम चाळीस कोटीच्या घरात आहे. ८९७ मिळकतधारक हे एक ते पाच लाख रुपयापर्यंतची थकबाकीधारक असून त्यांच्याकडून १७ कोटी रुपये वसूल होऊ शकतात. ८६ मिळकतधारकांकडे पाच ते दहा लाख रुपयांची थकबाकी असून ही रक्कम पाच कोटी ९८ लाख इतकी आहे. मोठ्या प्रमाणातील थकबाकी वसुलीऐवजी प्रशासन उत्पन्नवाढीचा प्रस्ताव देत आहे. मात्र उत्पन्नवाढीसाठी करवाढ हे एकमेव माध्यम असू शकत नाही. प्रशासनाने प्रभावी वसुली मोहिम, नव्या मिळकतीचा शोध घेऊन घरफाळा आकारणी केली तर करवाढीची गरज नाही.’
काँग्रेसचे गटनेते शारंगधर देशमुख यांनी घरफाळा विभागातील अधिकारी कार्यक्षमतेने काम करत नाहीत. मिळकतधारकांशी संगनमत करुन घरफाळा लागू केला जात नाही. यामुळे महापालिकेचे नुकसान होत आहे. कर्मचाऱ्यांच्या नाकतर्पेणामुळे शहरातील हजारो मिळकतींना घरफाळा लागू झाला नसल्याचे सांगत भ्रष्ट कर्मचाऱ्यांना चाप लावावा अशी सूचना केली.
नगरसेवक भूपाल शेटे, वहिदा सौदागर, उमा बनछोडे, प्रविण केसरकर, सूरमंजिली लाटकर, किरण नकाते, शेखर कुसाळे, पूजा नाईकनवरे यांनी घरफाळा आणि पाणीपट्टीचा विषय हा संवेदनशील आहे. घरफाळा आकारणीसाठी प्रत्येक प्रभागात कॅम्प लावा अशा सूचना केल्या.
महापालिकेच्या इमारतीत घोड्याचा तबेला
राजेंद्रनगर येथे एकात्मिक झोपडपट्टी विकास कार्यक्रमातंर्गत कर्मचाऱ्यांसाठी बांधलेल्या इमारतीत अतिक्रमण झाले आहे. काही जणांनी येथे जबरदस्तीने जागा बळकाविल्या आहेत. महापालिकेच्या मालकीची इमारतीत घोड्याचा तबेला सुरु झाला आहे. या ठिकाणी अनधिकृत व्यवसाय सुरु असून महापालिकेचे अधिकारी आणि कर्मचारी काय करत आहेत? असा सवाल नगरसेविका रुपाराणी निकम यांनी केला. प्रा. जयंत पाटील यांनी हा प्रश्न उचलून धरत अतिरिक्त आयुक्त श्रीधर पाटणकर, इस्टेट अधिकारी प्रमोद बराले यांच्याकडे याप्रश्नी विचारणा केली. निकम व पाटील यांनी, संबंधितांवर आजच्या आज करावी या शब्दात खडसावले. प्रशासनाने तत्काळ हालचाली करत राजेंद्रनगरमधील त्या इमारतीची तपासणी सुरु केली. नगरसेवक मुरलीधर जाधव, विलास वास्कर यांनी राजारामपुरी पाण्याच्या टाकीजवळील इमारतीत गैरप्रकार सुरु आहेत, गांजा पार्टी चालते. कर्मचारी कारवाईस गेल्यावर त्यांना मारहाणीच्या घटना घडतात असे सांगितले. महापालिकेच्या इमारतीत अतिक्रमण करणाऱ्यावर कारवाईची मागणी त्यांनी केली.