तपासाचा ‘संशय कल्लोळ’
वारणानगर येथे ८ मार्च २०१६ रोजी झालेल्या १४ कोटी रुपयांच्या लुटीचा तपास दिवसेंदिवस अधिकच गूढ बनत आहे.
Maharashtra Times 20 Apr 2017, 3:00 am
म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर
वारणानगर येथे ८ मार्च २०१६ रोजी झालेल्या १४ कोटी रुपयांच्या लुटीचा तपास दिवसेंदिवस अधिकच गूढ बनत आहे. तपास अधिकाऱ्यांनीच चोरट्याशी संगनमत करून चोरीतील कोट्यवधी रुपयांवर डल्ला मारल्याचे वरिष्ठ अधिकाऱ्यांनी केलेल्या चौकशीत निष्पन्न झाले आहे. यानंतर संशयित सात पोलिसांसह नऊ जणांवर गुन्हे दाखल होऊनही त्यांच्यावर अटकेची कारवाई झालेली नाही, त्यामुळे दुसऱ्यांदा सुरू असलेल्या तपासाबाबतही संशय कल्लोळ निर्माण झाला आहे.
सांगली येथील स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे पोलिस निरीक्षक विश्वनाथ घनवट, सहायक निरीक्षक सूरज चंदनशिवे, शरद कुरळपकर, पोलिस हेड कॉन्स्टेबल शंकर पाटील, दीपक पाटील, पोलिस नाईक रवींद्र पाटील आणि कुलदीप कांबळे या सात पोलिसांनी वारणानगर येथील शिक्षण संस्थेच्या एका इमारतीतील कोट्यवधींच्या लुटीचा प्रकार उघडकीस आणला. घनवट यांच्या पथकाने या लुटीचा प्रामाणिकपणे तपास केला असता, तर कदाचित त्यांना उत्कृष्ठ सेवा बजावल्याबद्दल एखादे पदक निश्चित मिळाले असते. त्यांच्या पथकाचाही गौरव झाला असता, मात्र, पोलिसांची नियत फिरली आणि त्यांनी लुटीतील ९ कोटी, १८ लाखांची रक्कम परस्पर गायब केली. ही रक्कम त्यांनी आपसात वाटून घेऊन फ्लॅट, प्लॉट, दागिने आणि बांधकाम व्यवसायात गुंतवली. पोलिसांचा हा दरोडा फार काळ अंधारात राहिला नाही, तपासातील संशयामुळे सुरुवातीपासूनच तपास पथके संशयाच्या भोवऱ्यात होती. फिर्यादीने विशेष पोलिस महानिरीक्षक विश्वास नांगरे-पाटील याच्याकडे धाव घेतल्याने आयपीएस अधिकाऱ्यांनी केलेल्या चौकशीमुळे लुटारू पोलिसांचे पितळ उघडे पडले. या तपासाने आधीचा तपास खोटा ठरला असून, तपासाच्या नावाखाली पोलिसांकडून होणारी लुबाडणूकदेखील स्पष्ट झाली आहे. या गंभीर प्रकाराने तपास अधिकारी अपर पोलिस अधीक्षक सुहेल शर्मा आणि कृष्णकांत उपाध्याय हे दोघेही चक्रावले होते. तपासाचा अहवाल आजी नांगरे-पाटील यांना प्राप्त झाल्यानंतर पलिसांच्या दरोडेखोरीने नांगरे-पाटील देखील अवाक झाले.
संशयित सात पोलिसांसह चोरटा मैनुद्दीन मल्ला आणि लुटारू पोलिसांचा मित्र प्रवीण भास्कर सावंत या नऊ जणांवर रविवारी (ता. १६) तारखेला कोडोली (ता. पन्हाळा) पोलिस ठाण्यात गुन्हे दाखल झाले. सातही पोलिसांवर निलंबनाची कारवाई झाली, मात्र अजूनही त्यांना अटक झाली नाही. संशयितांच्या संपत्तीची माहिती घेऊन ती सील केली जात आहे, तरीही पोलिसांच्या अटकेसाठी विशेष प्रयत्न सुरू नसल्याने संशयितांना सॉफ्ट कॉर्नर दिला जात आहे काय? अशी शंका बळावत आहे.
प्राप्तिकरचा तपास गोपनीय
वारणा लुटीतील १४ कोटींच्या रकमेवर कोल्हापुरातील बांधकाम व्यावसायिक झुंजार सरनोबत यांनी दावा केला आहे. यापूर्वीची ३ कोटी ९ लाख रुपयांची रक्कम त्यांनी कोर्टाच्या आदेशाने परत मिळवली. त्यापोटी सुमारे दीड कोटी रुपयांचा प्राप्तिकरही त्यांनी भरला. लुटीतील रकमेबाबत पुन्हा नव्याने चौकशी करण्यासाठी पोलिसांनी प्राप्तिकरकडे पत्र दिले आहे, मात्र गोपनीयतेच्या नावाखाली प्राप्तिकरकडून चौकशीतील माहिती दडवली जाते. या प्रकाराने संशय आणखी बळावत आहे.
वारणानगर येथे ८ मार्च २०१६ रोजी झालेल्या १४ कोटी रुपयांच्या लुटीचा तपास दिवसेंदिवस अधिकच गूढ बनत आहे. तपास अधिकाऱ्यांनीच चोरट्याशी संगनमत करून चोरीतील कोट्यवधी रुपयांवर डल्ला मारल्याचे वरिष्ठ अधिकाऱ्यांनी केलेल्या चौकशीत निष्पन्न झाले आहे. यानंतर संशयित सात पोलिसांसह नऊ जणांवर गुन्हे दाखल होऊनही त्यांच्यावर अटकेची कारवाई झालेली नाही, त्यामुळे दुसऱ्यांदा सुरू असलेल्या तपासाबाबतही संशय कल्लोळ निर्माण झाला आहे.
सांगली येथील स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे पोलिस निरीक्षक विश्वनाथ घनवट, सहायक निरीक्षक सूरज चंदनशिवे, शरद कुरळपकर, पोलिस हेड कॉन्स्टेबल शंकर पाटील, दीपक पाटील, पोलिस नाईक रवींद्र पाटील आणि कुलदीप कांबळे या सात पोलिसांनी वारणानगर येथील शिक्षण संस्थेच्या एका इमारतीतील कोट्यवधींच्या लुटीचा प्रकार उघडकीस आणला. घनवट यांच्या पथकाने या लुटीचा प्रामाणिकपणे तपास केला असता, तर कदाचित त्यांना उत्कृष्ठ सेवा बजावल्याबद्दल एखादे पदक निश्चित मिळाले असते. त्यांच्या पथकाचाही गौरव झाला असता, मात्र, पोलिसांची नियत फिरली आणि त्यांनी लुटीतील ९ कोटी, १८ लाखांची रक्कम परस्पर गायब केली. ही रक्कम त्यांनी आपसात वाटून घेऊन फ्लॅट, प्लॉट, दागिने आणि बांधकाम व्यवसायात गुंतवली. पोलिसांचा हा दरोडा फार काळ अंधारात राहिला नाही, तपासातील संशयामुळे सुरुवातीपासूनच तपास पथके संशयाच्या भोवऱ्यात होती. फिर्यादीने विशेष पोलिस महानिरीक्षक विश्वास नांगरे-पाटील याच्याकडे धाव घेतल्याने आयपीएस अधिकाऱ्यांनी केलेल्या चौकशीमुळे लुटारू पोलिसांचे पितळ उघडे पडले. या तपासाने आधीचा तपास खोटा ठरला असून, तपासाच्या नावाखाली पोलिसांकडून होणारी लुबाडणूकदेखील स्पष्ट झाली आहे. या गंभीर प्रकाराने तपास अधिकारी अपर पोलिस अधीक्षक सुहेल शर्मा आणि कृष्णकांत उपाध्याय हे दोघेही चक्रावले होते. तपासाचा अहवाल आजी नांगरे-पाटील यांना प्राप्त झाल्यानंतर पलिसांच्या दरोडेखोरीने नांगरे-पाटील देखील अवाक झाले.
संशयित सात पोलिसांसह चोरटा मैनुद्दीन मल्ला आणि लुटारू पोलिसांचा मित्र प्रवीण भास्कर सावंत या नऊ जणांवर रविवारी (ता. १६) तारखेला कोडोली (ता. पन्हाळा) पोलिस ठाण्यात गुन्हे दाखल झाले. सातही पोलिसांवर निलंबनाची कारवाई झाली, मात्र अजूनही त्यांना अटक झाली नाही. संशयितांच्या संपत्तीची माहिती घेऊन ती सील केली जात आहे, तरीही पोलिसांच्या अटकेसाठी विशेष प्रयत्न सुरू नसल्याने संशयितांना सॉफ्ट कॉर्नर दिला जात आहे काय? अशी शंका बळावत आहे.
प्राप्तिकरचा तपास गोपनीय
वारणा लुटीतील १४ कोटींच्या रकमेवर कोल्हापुरातील बांधकाम व्यावसायिक झुंजार सरनोबत यांनी दावा केला आहे. यापूर्वीची ३ कोटी ९ लाख रुपयांची रक्कम त्यांनी कोर्टाच्या आदेशाने परत मिळवली. त्यापोटी सुमारे दीड कोटी रुपयांचा प्राप्तिकरही त्यांनी भरला. लुटीतील रकमेबाबत पुन्हा नव्याने चौकशी करण्यासाठी पोलिसांनी प्राप्तिकरकडे पत्र दिले आहे, मात्र गोपनीयतेच्या नावाखाली प्राप्तिकरकडून चौकशीतील माहिती दडवली जाते. या प्रकाराने संशय आणखी बळावत आहे.