अ‍ॅपशहर

आठ बंधारे पाण्याखाली

कालचा ढगफुटी सारखा पाऊस तसेच सलग दोन दिवसांपासून कोल्हापूर शहरासह राधानगरी परिसरात पावसाची संततधार सुरु असल्याने भोगावतीसह पंचगंगा नदीच्या पाणी पातळीत वाढ झाली आहे.

Maharashtra Times 15 Sep 2017, 3:00 am
म. टा. वृत्तसेवा, कसबा बावडा
महाराष्ट्र टाइम्स.कॉम kolhapur rain
आठ बंधारे पाण्याखाली


कालचा ढगफुटी सारखा पाऊस तसेच सलग दोन दिवसांपासून कोल्हापूर शहरासह राधानगरी परिसरात पावसाची संततधार सुरु असल्याने भोगावतीसह पंचगंगा नदीच्या पाणी पातळीत वाढ झाली आहे. त्यामुळे आज सातच्या सुमारास राजाराम बंधारा पाण्याखाली गेला आहे. यावर्षी चौथ्यां वेळेस राजाराम बंधारा पाण्याखाली गेला आहे. त्यामुळे यामार्गावरून वडणगे,भूये, निगवे, केर्ले, केर्ली, जोतीबा आदी गावांवरून ये-जा करणारी वाहतूक ठप्प झाली आहे. सध्या या बंधाऱ्यावर १७ फुटापर्यंत पाण्याने पातळी गाठली आहे. पंचगंगा नदीवरील सात बंधाऱ्यांपैकी पाच बंधारे पाण्याखाली गेले त्यामध्ये राजाराम बंधाऱ्यासह , शिंगणापूर ,सुर्वे,रुई , इचलकरंजी व भोगावती नदीवरील राशिवडे,हळदी, खडककोगे हे बंधारे पहाटे पाण्याखाली गेले असून यामुळे आजूबाजूच्या गावाकडे जाणारे रस्ते बंद झाले असून वाहनचालकांना पर्यायी मार्गाचा वापर करावा लागत आहे.

काल रात्रीच्या मोठ्या पावसामुळे राजाराम बंधारा या मार्गावरून ये जा करणाऱ्या वाहनधारकांची आज मोठी अडचण झाली आहे.पहाटे बंधारा पाण्याखाली गेला आहे हे माहित नसल्याने अनेक वाहनधारकांना बंधाऱ्या जवळून परत फिरावे लागत आहे. दरम्यान, पंचगंगा नदीचे पाणी पात्राबाहेर गेल्याने अनेक मासेमारी करणारे तसेच काही हौशी मंडळी बंधाऱ्याजवळ जाळे आणि गळ टाकून मासेमारीचा आनंद लुटत आहेत.

महत्वाचे लेख

Marathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.
ताज्या बातम्यांसह अपडेट राहण्यासाठी लाइक करा Maharashtra Times फेसबुकपेज