अ‍ॅपशहर

कोल्हापूर जिल्ह्यात पावसाने जनजीवन विस्कळीत, कुठे कशी आहे स्थिती? पाहा...

Maharashtra News : कोल्हापूर जिल्ह्यात गेल्या काही दिवसांपासून जोरदार पाऊस सुरू आहे. पावसामुळे नद्यांना पूर आला आहे. जनजीवनही विस्कळीत झालं आहे. पंचगंगेची पातळी वाढत असल्याने नागरिकांना सतर्क करण्यात आलं आहे.

Authored byटीम मटा ऑनलाइन | महाराष्ट्र टाइम्स.कॉम 14 Jul 2022, 6:54 pm
कोल्हापूर : कोल्हापूर जिल्ह्यात सध्या सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे जनजीवन विस्कळीत झाले आहे. जिल्ह्यातील अनेक बंधारे पाण्याखाली गेले असून अनेक मध्यम प्रकल्प ओव्हरफ्लो होत आहेत. यामुळे प्रशासनाकडून नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे. दुसऱ्या बाजूला सतत सुरू असलेल्या पावसामुळे अनेक ठिकाणी दरड कोसळणे, भूस्खलन होण्याच्या घटना घडत आहेत. पंचगंगेची वाटचाल ही इशारा पातळीकडे सुरू आहे. पंचगंगेची पाणी पातळी ३७ फूट २ इंचावर पोहोचली आहे. जिल्ह्यात एकूण ५९ बंधारे पाण्याखाली गेले आहेत. एनडीआरएफ च्या २ तुकड्या तैनात करण्यात आल्या आहेत. जिल्हाधिकारी आणि पोलीस अधीक्षक स्वतः ग्राउंडवर उतरून आढावा घेत आहेत.
महाराष्ट्र टाइम्स.कॉम kolhapur rain news panchaganga water level today
कोल्हापूर जिल्ह्यात पावसाने जनजीवन विस्कळीत, कुठे कशी आहे स्थिती? पाहा...


विशाळगडावरील बुरूज कोसळला

कोल्हापूर जिल्ह्यात गेल्या आठवड्यांपासून सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे विशाळगडावर जाण्यासाठी असलेल्या लोखंडी जिन्याच्या बाजूचा दगडी बुरूज कोसळला आहे. यामुळे येथील लोखंडी जिना वाहतुकीसाठी बंद करण्यात आला आहे. तसेच येथे पोलीस देखील तैनात करण्यात आले आहेत. नागरिकांनी गडावर ये-जा करण्यासाठी पर्यायी मार्गाचा वापर करावा असे आवाहन शाहूवाडी पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक विजय पाटील यांनी केले आहे.

धरणाच्या विद्युत विमोचनमधून विसर्ग

शाहूवाडी तालुक्यातील गेळवडे येथील कासारी मध्यम प्रकलपाच्या धरण व पाणलोट क्षेत्रात सुरू असलेल्या मुसळधार पावसाने धरणाच्या पाण्यात सातत्याने वाढ होत आहे. त्यामुळे धरणाच्या विद्युत विमोचनमधून कासारी नदी पात्रात विसर्ग सुरू असल्याने कासारी नदीकाठच्या नागरिकांना सतर्कतेचा इशारा पाटबंधारे विभागाने दिला आहे.

कोल्हापूर महापुराच्या छायेत; पावसाचा धुमाकूळ कायम, पाणी इशारा पातळीकडे

नागरिकांनी सहकार्य करावे, पोलिसांचे आवाहन

सांभाव्य पूरपरिस्थितीच्या अनुषंगाने पोलीस विभाग सज्ज आहे. पावसाच्या पाण्याने ओढे, नाले ओसंडून रस्त्यावरुन पाणी वाहत असल्यास वाहनधारकांनी अशावेळी पाण्यात वाहने घालू नयेत. रस्त्यावर पाणी आले असल्यास एसटी, बसेस देखील पाण्यात घालू नयेत, जेणेकरून दुर्घटना होणार नाही. गरज भासल्यास पोलीस प्रशासनाच्या नियंत्रण कक्षाच्या ११२ या क्रमांकावर संपर्क साधावा, असे आवाहन पोलीस अधीक्षक शैलेश बलकडे यांनी केले आहे.

धनगरवाड्यातील चिमुकल्यांसाठी भर पावसातून आरोग्यसेविकांचा जीवघेणा

महत्वाचे लेख