कोल्हापूर: कोल्हापूर जिल्ह्यात धरणक्षेत्र वगळता इतरत्र पावसाचा जोर काही प्रमाणात ओसरला असला तरी राधानगरी धरणाचे चार स्वयंचलित दरवाजे उघडल्याने महापुराचा धोका कायम आहे. पंचगंगा नदीने रौद्ररूप धारण केले असून सध्या ती धोका पातळी ओलांडून ४५ फुटांवरून वाहत आहे. रस्त्यावर पाणी आल्याने ३९ मार्ग बंद झाले असून तेथे पर्यायी मार्गाने वाहतूक सुरू झाली आहे. एनडीआरएफच्या चार तुकड्या मदतकार्यात सक्रीय झाल्या असून पाच हजारावर लोकांना सुरक्षित ठिकाणी हलविण्यात आले आहे. ( Kolhapur Floods )
वाचा: कृष्णा नदीची पाणी पातळी वाढतेय; सांगलीतील १०४ गावांत धाकधूक
जिल्ह्याला चार दिवस पावसाने झोडपले. सध्या काही भागात पावसाचा जोर ओसरला आहे. मात्र, राधानगरीसह इतर धरणक्षेत्रात पावसाचा धडाका कायम आहे. यामुळे शुक्रवारी पहाटेपर्यंत राधानगरी धरणाचे चार स्वयंचलित दरवाजे उघडले. यातून सात हजार क्युसेक पाण्याचा विसर्ग सुरू आहे. अनेक धरणांतून बाहेर पडणाऱ्या पाण्यामुळे जिल्ह्यातील सर्व नद्या दुथडी भरून वाहत आहेत. यामुळे पुराचा धोका कायम आहे.
वाचा: चंद्रकांत पाटील विरोधकांना जीवनातून उठवतात: हसन मुश्रीफ
पंचगंगा नदीने शुक्रवारी रौद्ररूप धारण केले आहे. ४३ फुटाची धोका पातळी ओलांडून ती सध्या ४५ फुटांवरून वाहत आहे. यामुळे या नदीचे पाणी कोल्हापूर शहरासह अनेक गावात घुसले आहे. पुणे-बेंगळुरू महामार्गावर शिरोली फाटा येथील सर्व्हिस रोडवर पंचगंगेचे पाणी आल्याने तो रस्ता बंद करण्यात आला आहे. शहरात पावसाचा जोर ओसरल्याने शाहूपुरी, व्हिनस कॉर्नर, जामदार वाडा या भागात घुसलेल्या पाण्याचे प्रमाण कमी झाले आहे.
वाचा: मुंबईत परतणाऱ्यांसाठी आता १४ दिवसांचा होम क्वारंटाइन
रस्त्यावर आलेल्या पाण्यामुळे दहा राज्य तर २९ जिल्हामार्ग बंद करण्यात आले आहेत. यामध्ये गगनबावडा, रत्नागिरी, आंबोली या प्रमुख मार्गांचा समावेश आहे. सध्या ९५ बंधारे पाण्याखाली आहेत. जिल्ह्यातील २३ गावातील पाच हजारावर लोकांना सुरक्षित स्थळी हलविण्यात आले आहे. यामध्ये शहरातील दोनशे लोकांचा समावेश आहे. एनडीआरएफची चार पथके कार्यरत आहेत. ही पथके दोन शहरात तर उर्वरित शिरोळ तालुक्यात मदतकार्य करत आहेत.
प्रशासनाने नदीकाठच्या सर्व गावांना सतर्कतेचा इशारा दिला आहे. यामुळे आंबेवाडी, चिखली या गावातील बहूसंख्य नागरिकांनी सुरक्षित स्थळी स्थलांतर केले आहे. पालकमंत्री सतेज पाटील, आरोग्य राज्यमंत्री राजेंद्र पाटील यांनी पूरबाधित ठिकाणी भेट देऊन पाहणी केली.
वाचा: कोविड लढ्यात महाराष्ट्र देशासाठी उदाहरण ठरेल; केंद्राने केले कौतुक
वाचा: कृष्णा नदीची पाणी पातळी वाढतेय; सांगलीतील १०४ गावांत धाकधूक
जिल्ह्याला चार दिवस पावसाने झोडपले. सध्या काही भागात पावसाचा जोर ओसरला आहे. मात्र, राधानगरीसह इतर धरणक्षेत्रात पावसाचा धडाका कायम आहे. यामुळे शुक्रवारी पहाटेपर्यंत राधानगरी धरणाचे चार स्वयंचलित दरवाजे उघडले. यातून सात हजार क्युसेक पाण्याचा विसर्ग सुरू आहे. अनेक धरणांतून बाहेर पडणाऱ्या पाण्यामुळे जिल्ह्यातील सर्व नद्या दुथडी भरून वाहत आहेत. यामुळे पुराचा धोका कायम आहे.
वाचा: चंद्रकांत पाटील विरोधकांना जीवनातून उठवतात: हसन मुश्रीफ
पंचगंगा नदीने शुक्रवारी रौद्ररूप धारण केले आहे. ४३ फुटाची धोका पातळी ओलांडून ती सध्या ४५ फुटांवरून वाहत आहे. यामुळे या नदीचे पाणी कोल्हापूर शहरासह अनेक गावात घुसले आहे. पुणे-बेंगळुरू महामार्गावर शिरोली फाटा येथील सर्व्हिस रोडवर पंचगंगेचे पाणी आल्याने तो रस्ता बंद करण्यात आला आहे. शहरात पावसाचा जोर ओसरल्याने शाहूपुरी, व्हिनस कॉर्नर, जामदार वाडा या भागात घुसलेल्या पाण्याचे प्रमाण कमी झाले आहे.
वाचा: मुंबईत परतणाऱ्यांसाठी आता १४ दिवसांचा होम क्वारंटाइन
रस्त्यावर आलेल्या पाण्यामुळे दहा राज्य तर २९ जिल्हामार्ग बंद करण्यात आले आहेत. यामध्ये गगनबावडा, रत्नागिरी, आंबोली या प्रमुख मार्गांचा समावेश आहे. सध्या ९५ बंधारे पाण्याखाली आहेत. जिल्ह्यातील २३ गावातील पाच हजारावर लोकांना सुरक्षित स्थळी हलविण्यात आले आहे. यामध्ये शहरातील दोनशे लोकांचा समावेश आहे. एनडीआरएफची चार पथके कार्यरत आहेत. ही पथके दोन शहरात तर उर्वरित शिरोळ तालुक्यात मदतकार्य करत आहेत.
प्रशासनाने नदीकाठच्या सर्व गावांना सतर्कतेचा इशारा दिला आहे. यामुळे आंबेवाडी, चिखली या गावातील बहूसंख्य नागरिकांनी सुरक्षित स्थळी स्थलांतर केले आहे. पालकमंत्री सतेज पाटील, आरोग्य राज्यमंत्री राजेंद्र पाटील यांनी पूरबाधित ठिकाणी भेट देऊन पाहणी केली.
वाचा: कोविड लढ्यात महाराष्ट्र देशासाठी उदाहरण ठरेल; केंद्राने केले कौतुक