म. टा. प्रतनिधी, कोल्हापूर
‘खासदार राजू शेट्टी संसदेत प्रश्न उपस्थित करतात. गेली दहा वर्षे संसदेत आम्ही त्यांना पाहतोय. पण कृषीराज्यमंत्री सदाभाऊ खोत यांचे योगदान काय?’ असा सवाल माजी केंद्रीय कृषीमंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी उपस्थित केला. दिवंगत ज्येष्ठ नेते एच. डी. पाटील यांच्या कुटुंबियांच्या सांत्वनासाठी कोल्हापूर दौऱ्यावर आलेल्या पवार यांच्याशी पत्रकारांनी संपर्क साधला असता पवार यांनी भाजपचे अध्यक्ष अमित शहा आणि राज्य सरकारच्या कर्जमाफीवर टीकेची झोड उठवली. गुजरातमध्ये राष्ट्रवादीच्या एका आमदाराचे मत मिळाल्यानेच राज्यसभेच्या निवडणुकीत अहमद पटेल विजयी झाले, असा दावाही त्यांन केला.
स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे अध्यक्ष, खासदार राजू शेट्टी आणि कृषी राज्यमंत्री सदाभाऊ खोत यांच्यातील वादाबाबत पत्रकारांनी विचारले असता शरद पवार म्हणाले, ‘सदाभाऊ खोत गेली ३० वर्षे शेतकऱ्यांच्या प्रश्नांवर आम्ही लाठ्या खाल्या, तुरुंगात गेलो असे सांगत आहेत. मात्र त्यांनी कधी लाठ्या खाल्या, तुरुंगात कधी गेले याची माहिती पोलिस खात्याकडून घ्यावी लागेल. गेल्या ३० वर्षांत त्यांनी इतके प्रभावी काम केले आहे तर ते राज्याच्या कानाकोपऱ्यात का पोचले नाहीत? असा खोचक सवालही त्यांनी केला. याउलट राजू शेट्टी यांना गेली दहा वर्षे आम्ही संसदेत पाहतोय असेही पवार म्हणाले. भाजप विरुद्ध काँग्रेससह सर्व विरोधी पक्ष एकत्र येण्याची चर्चाच सुरू आहे. या प्रश्नावर काँग्रेसची धरसोड वृत्ती सुरू आहे असेही ते म्हणाले. राज्य सरकारने ३६ हजार कोटी रुपयांची कर्जमाफी घोषणा केली असली तरी कर्जमाफी झालेला एकतरी शेतकरी दाखवावा. कर्जमाफीचे निकष काय आहेत हे मला माहीत नाहीत असे पवार म्हणाले.
‘खासदार राजू शेट्टी संसदेत प्रश्न उपस्थित करतात. गेली दहा वर्षे संसदेत आम्ही त्यांना पाहतोय. पण कृषीराज्यमंत्री सदाभाऊ खोत यांचे योगदान काय?’ असा सवाल माजी केंद्रीय कृषीमंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी उपस्थित केला. दिवंगत ज्येष्ठ नेते एच. डी. पाटील यांच्या कुटुंबियांच्या सांत्वनासाठी कोल्हापूर दौऱ्यावर आलेल्या पवार यांच्याशी पत्रकारांनी संपर्क साधला असता पवार यांनी भाजपचे अध्यक्ष अमित शहा आणि राज्य सरकारच्या कर्जमाफीवर टीकेची झोड उठवली. गुजरातमध्ये राष्ट्रवादीच्या एका आमदाराचे मत मिळाल्यानेच राज्यसभेच्या निवडणुकीत अहमद पटेल विजयी झाले, असा दावाही त्यांन केला.
स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे अध्यक्ष, खासदार राजू शेट्टी आणि कृषी राज्यमंत्री सदाभाऊ खोत यांच्यातील वादाबाबत पत्रकारांनी विचारले असता शरद पवार म्हणाले, ‘सदाभाऊ खोत गेली ३० वर्षे शेतकऱ्यांच्या प्रश्नांवर आम्ही लाठ्या खाल्या, तुरुंगात गेलो असे सांगत आहेत. मात्र त्यांनी कधी लाठ्या खाल्या, तुरुंगात कधी गेले याची माहिती पोलिस खात्याकडून घ्यावी लागेल. गेल्या ३० वर्षांत त्यांनी इतके प्रभावी काम केले आहे तर ते राज्याच्या कानाकोपऱ्यात का पोचले नाहीत? असा खोचक सवालही त्यांनी केला. याउलट राजू शेट्टी यांना गेली दहा वर्षे आम्ही संसदेत पाहतोय असेही पवार म्हणाले. भाजप विरुद्ध काँग्रेससह सर्व विरोधी पक्ष एकत्र येण्याची चर्चाच सुरू आहे. या प्रश्नावर काँग्रेसची धरसोड वृत्ती सुरू आहे असेही ते म्हणाले. राज्य सरकारने ३६ हजार कोटी रुपयांची कर्जमाफी घोषणा केली असली तरी कर्जमाफी झालेला एकतरी शेतकरी दाखवावा. कर्जमाफीचे निकष काय आहेत हे मला माहीत नाहीत असे पवार म्हणाले.