म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर
चांगला रिझल्ट देण्यात केंद्र सरकार अपयशी ठरले आहे. त्यामुळे मूळ प्रश्नाला बगल देण्यासाठीच जाहिरातबाजीवर वारेमाप खर्च केला जात आहे. मूळ प्रश्नाला बगल देणाऱ्या पंतप्रधान नरेंद्र मोदींना शाबासकीच द्यायला हवी, असा टोला राष्ट्रवादीचे अध्यक्ष, माजी केंद्रीय मंत्री शरद पवार यांनी पत्रकार बैठकीत मारला. त्यांच्या या कामगिरीमुळे ‘कुठं नेऊन ठेवला देश माझा? ’ असे विचारण्याची वेळ आली आहे, असेही ते म्हणाले. शिवसेना-भाजप सत्तेसाठी एकत्रच राहणार असल्याने सरकार पडणार नाही. त्यामुळे मध्यावधीची शक्यता नाही, असे त्यांनी स्पष्ट केले.
पवार यांना रविवारी शाहू पुरस्काराने सन्मानित करण्यात येणार आहे. त्यासाठी कोल्हापुरात आले असून सायंकाळी पत्रकारांनी त्यांच्याशी संवाद साधला. आगामी जिल्हा परिषद व पालिका निवडणुकीत शिवसेना व भाजप वगळता इतर कुणाबरोबरही आघाडी करायला स्थानिक नेत्यांना परवानगी दिल्याचे सांगताना या निवडणुकीत तरूण रक्ताला वाव देणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
केंद्र सरकारच्या कामावर समाधानी आहात का? या प्रश्नावर ते म्हणाले, हे सरकार रिझल्ट देऊ शकत नाही हे दोन वर्षात लक्षात आले. केलेल्या घोषणांची अंमलबजावणी झाली नाही. हे अपयश झाकण्यासाठी जाहिरातबाजी सुरू आहे. मूळ प्रश्नाला बगल देण्याची कला भाजपने चांगली साधली आहे. ‘कुठे नेऊन ठेवला महाराष्ट्र?’ असे ते म्हणत होते. आता मात्र ‘कुठं नेऊन ठेवला देश माझा?,’ असे म्हणण्याची वेळ आली आहे. ही गोष्ट चिंताजनक आहे.
पुण्यातील स्मार्ट सिटीच्या कार्यक्रमावर अनेक पक्षांनी बहिष्कार टाकल्याचे निदर्शनास आणून दिल्यानंतर ते म्हणालेकी, हे तीनही कार्यक्रम पुणे महापालिकेचे होते. त्यामुळे निमंत्रण पत्रिका महापौरांच्याच नावाने निघणे आवश्यक होते. पण, ते तर सोडाच त्यांचे नावही छापायचे सौजन्य दाखवलेले नाही. उलट कुणालाही विश्वासात न घेता परस्पर नियोजन करण्यात आले. त्यामुळे काहींच्या मनात अस्वस्थता निर्माण झाली. सरकारचे हे वागणे न पटल्याने मतभेद विसरून काँग्रेस, राष्ट्रवादी आणि शिवसेना एकत्र येऊन त्यांनी कार्यक्रमावर बहिष्कार घालण्याचा निर्णय घेतला. मुख्यमंत्र्यांनी माझ्याशी आणि महापौरांशी संपर्क साधून अनावधानाने नाव राहिल्याचे मान्य केले. महापौरपद हे राजकीय नाही. तो शहराचा प्रथम नागरिक असतो. म्हणून त्यांना कार्यक्रमास उपस्थित राहण्याची विनंती केली. पण या सर्व प्रकरणात राज्यकर्त्यांनी मनाचा मोठेपणा आणि सौजन्य दाखवले नाही, असा टोला पवारांनी मारला.
शेतकऱ्यांना मारण्याचा प्रयत्न
सध्याचे सरकार शेतकरी विरोधी असल्याचे सांगताना पवार म्हणाले की, साखर निर्यातीला वीस टक्के कर लावण्याचा निर्णय म्हणजे साखर भारताच्या बाहेर जाऊ नये यासाठी केलेली व्यवस्था आहे. यामुळे साखरेच्या किमती कमी होतील. साखरेचे दर घसरले की उसाला दर देण्याची शक्ती कारखानदारांत राहणार नाही. यामुळे शेतकऱ्याला ते न्याय देऊ शकणार नाहीत. यामुळे हा उद्योग कोलमडून पडेल. यावरून सरकारचा शेतकऱ्यांकडे पाहण्याचा दृष्टिकोन स्पष्ट होतो, असा टोलाही त्यांनी मारला.
‘ब्रेक्झिट’ फायद्याचे
युरोपीय महासंघातून ब्रिटन बाहेर पडल्याने त्याचा फायदा भारताला होईल, असे स्पष्ट करताना पवार म्हणाले, युरोपीय संघातून ब्रिटन बाहेर पडल्याने भारताला चांगली संधी मिळणार आहे. पौंडाचे दर घसरतो आहे. या देशाला पुरवठा करणारे घटक वाढतील. यामुळे व्यापाराला ते अधिक उपयुक्त ठरणार आहे.
शाहू पुरस्काराचे मोल मोठे
सत्तेचा उपयोग सामान्यासाठी करणाऱ्या शाहू महाराजांच्या नावाने जाहीर झालेला पुरस्कार स्वीकारल्याचे सांगताना पवार म्हणाले, ‘कोल्हापूरकर पुरस्कार देतात याला विशेष महत्व आहे. कारण चांगले असेल तर ते शक्ती देतात. ठीक नसेल तर अनेक गोष्टी हातात घेऊन स्वागत करायला पुढे असतात. दिल्लीत अनेक संघटना, संस्था आहेत. पण ते पुरस्कार घेण्यासाठी किंमत मोजावी लागते. पण, शाहू पुरस्काराचे तसे नाही. यापूर्वीच्या पुरस्कारप्राप्त लोकांची नावे पाहिल्यावर हा पुरस्कार स्वीकारण्याचे ठरवले.’
चांगला रिझल्ट देण्यात केंद्र सरकार अपयशी ठरले आहे. त्यामुळे मूळ प्रश्नाला बगल देण्यासाठीच जाहिरातबाजीवर वारेमाप खर्च केला जात आहे. मूळ प्रश्नाला बगल देणाऱ्या पंतप्रधान नरेंद्र मोदींना शाबासकीच द्यायला हवी, असा टोला राष्ट्रवादीचे अध्यक्ष, माजी केंद्रीय मंत्री शरद पवार यांनी पत्रकार बैठकीत मारला. त्यांच्या या कामगिरीमुळे ‘कुठं नेऊन ठेवला देश माझा? ’ असे विचारण्याची वेळ आली आहे, असेही ते म्हणाले. शिवसेना-भाजप सत्तेसाठी एकत्रच राहणार असल्याने सरकार पडणार नाही. त्यामुळे मध्यावधीची शक्यता नाही, असे त्यांनी स्पष्ट केले.
पवार यांना रविवारी शाहू पुरस्काराने सन्मानित करण्यात येणार आहे. त्यासाठी कोल्हापुरात आले असून सायंकाळी पत्रकारांनी त्यांच्याशी संवाद साधला. आगामी जिल्हा परिषद व पालिका निवडणुकीत शिवसेना व भाजप वगळता इतर कुणाबरोबरही आघाडी करायला स्थानिक नेत्यांना परवानगी दिल्याचे सांगताना या निवडणुकीत तरूण रक्ताला वाव देणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
केंद्र सरकारच्या कामावर समाधानी आहात का? या प्रश्नावर ते म्हणाले, हे सरकार रिझल्ट देऊ शकत नाही हे दोन वर्षात लक्षात आले. केलेल्या घोषणांची अंमलबजावणी झाली नाही. हे अपयश झाकण्यासाठी जाहिरातबाजी सुरू आहे. मूळ प्रश्नाला बगल देण्याची कला भाजपने चांगली साधली आहे. ‘कुठे नेऊन ठेवला महाराष्ट्र?’ असे ते म्हणत होते. आता मात्र ‘कुठं नेऊन ठेवला देश माझा?,’ असे म्हणण्याची वेळ आली आहे. ही गोष्ट चिंताजनक आहे.
पुण्यातील स्मार्ट सिटीच्या कार्यक्रमावर अनेक पक्षांनी बहिष्कार टाकल्याचे निदर्शनास आणून दिल्यानंतर ते म्हणालेकी, हे तीनही कार्यक्रम पुणे महापालिकेचे होते. त्यामुळे निमंत्रण पत्रिका महापौरांच्याच नावाने निघणे आवश्यक होते. पण, ते तर सोडाच त्यांचे नावही छापायचे सौजन्य दाखवलेले नाही. उलट कुणालाही विश्वासात न घेता परस्पर नियोजन करण्यात आले. त्यामुळे काहींच्या मनात अस्वस्थता निर्माण झाली. सरकारचे हे वागणे न पटल्याने मतभेद विसरून काँग्रेस, राष्ट्रवादी आणि शिवसेना एकत्र येऊन त्यांनी कार्यक्रमावर बहिष्कार घालण्याचा निर्णय घेतला. मुख्यमंत्र्यांनी माझ्याशी आणि महापौरांशी संपर्क साधून अनावधानाने नाव राहिल्याचे मान्य केले. महापौरपद हे राजकीय नाही. तो शहराचा प्रथम नागरिक असतो. म्हणून त्यांना कार्यक्रमास उपस्थित राहण्याची विनंती केली. पण या सर्व प्रकरणात राज्यकर्त्यांनी मनाचा मोठेपणा आणि सौजन्य दाखवले नाही, असा टोला पवारांनी मारला.
शेतकऱ्यांना मारण्याचा प्रयत्न
सध्याचे सरकार शेतकरी विरोधी असल्याचे सांगताना पवार म्हणाले की, साखर निर्यातीला वीस टक्के कर लावण्याचा निर्णय म्हणजे साखर भारताच्या बाहेर जाऊ नये यासाठी केलेली व्यवस्था आहे. यामुळे साखरेच्या किमती कमी होतील. साखरेचे दर घसरले की उसाला दर देण्याची शक्ती कारखानदारांत राहणार नाही. यामुळे शेतकऱ्याला ते न्याय देऊ शकणार नाहीत. यामुळे हा उद्योग कोलमडून पडेल. यावरून सरकारचा शेतकऱ्यांकडे पाहण्याचा दृष्टिकोन स्पष्ट होतो, असा टोलाही त्यांनी मारला.
‘ब्रेक्झिट’ फायद्याचे
युरोपीय महासंघातून ब्रिटन बाहेर पडल्याने त्याचा फायदा भारताला होईल, असे स्पष्ट करताना पवार म्हणाले, युरोपीय संघातून ब्रिटन बाहेर पडल्याने भारताला चांगली संधी मिळणार आहे. पौंडाचे दर घसरतो आहे. या देशाला पुरवठा करणारे घटक वाढतील. यामुळे व्यापाराला ते अधिक उपयुक्त ठरणार आहे.
शाहू पुरस्काराचे मोल मोठे
सत्तेचा उपयोग सामान्यासाठी करणाऱ्या शाहू महाराजांच्या नावाने जाहीर झालेला पुरस्कार स्वीकारल्याचे सांगताना पवार म्हणाले, ‘कोल्हापूरकर पुरस्कार देतात याला विशेष महत्व आहे. कारण चांगले असेल तर ते शक्ती देतात. ठीक नसेल तर अनेक गोष्टी हातात घेऊन स्वागत करायला पुढे असतात. दिल्लीत अनेक संघटना, संस्था आहेत. पण ते पुरस्कार घेण्यासाठी किंमत मोजावी लागते. पण, शाहू पुरस्काराचे तसे नाही. यापूर्वीच्या पुरस्कारप्राप्त लोकांची नावे पाहिल्यावर हा पुरस्कार स्वीकारण्याचे ठरवले.’