म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर
अतिरिक्त शिक्षकांचे वेतन तातडीने देण्याच्या मागणीसाठी माध्यमिक शिक्षकांनी गुरूवारी जिल्हा परिषदेच्या माध्यमिक शिक्षण विभागाच्या कार्यालयात दुपारपर्यंत ठिय्या आंदोलन केले. आठवडाभरापूर्वी या शिक्षकांनी आत्मदहनाचा इशारा दिला होता. आत्मदहनाचा इशारा सकाळी दिल्याने यंत्रणेची तारांबळ उडाली. पोलिसांनी जिल्हा परिषदेत प्रवेश करणाऱ्यांची कसून तपासणी केली. दुपारपर्यंत वातावरण तणावपूर्ण होते. अखेर ३१ मार्चपर्यत खात्यावर वेतन जमा न झाल्यास माध्यमिक शिक्षणाधिकारी आणि वेतन पथक अधीक्षकांविरोधात पोलिसांत गुन्हा दाखल करण्याचा इशारा शिक्षकांनी दिला.
अतिरिक्त शिक्षकांचे समायोजन केले असले तरी त्या शाळांच्या मुख्याध्यापकांनी माध्यमिक शिक्षण विभागाकडे पगार बिले सादर केलेली नाहीत. त्यामुळे शिक्षणसंस्था आणि माध्यमिक शिक्षण विभागाच्या तांत्रिक अडचणीत शिक्षकांचे पगार अडकले आहेत. काही शाळांमध्ये संबंधित विषयाची जागा, अनुदानित पद रिक्त नाही. अपदवीधर वेतनश्रेणीतील पद असताना पदवीधर वेतनश्रेणीतील शिक्षकांचे समायोजन अशा तांत्रिक अडचणी आहेत. समायोजन केलेल्या शाळांत शिक्षकांचे नाव समाविष्ट केले नसल्याने त्यांचा वेतनाचा प्रश्न निर्माण झाला आहे. याविरोधात चाळीसहून अधिक अतिरिक्त शिक्षकांनी माध्यमिक शिक्षकांनी माध्यमिक शिक्षण विभागाकडे धाव घेतली. अचानक झालेल्या आंदोलनामुळे शिक्षण विभागाची तारांबळ उडाली.
प्रशासनाने पोलिसांना बोलाविले. विभागात शिक्षक आणि शिक्षण विभागाचे अधिकारी यांच्यात दोन तास वादावादी झाली. माध्यमिक शिक्षण विभागाचे अधीक्षक एम. बी. शेख आणि उपशिक्षणाधिकारी सूर्यंकांत पाटील यांच्यासोबत चर्चा करण्यात आली. जोपर्यंत वेतनाचा आदेश देत नाही, तोपर्यंत आंदोलन मागे न घेण्याचा इशारा देण्यात आला. त्यामुळे वातावरण तणावपूर्ण बनले.
दरम्यान माध्यमिक शिक्षण विभागाकडून वेतनाचे पत्र घेऊन शिक्षक शिक्षण उपसंचालक कार्यालयातील माध्यमिक शिक्षण विभागाच्या वेतन पथकाकडे केले. वेतनपथक अधीक्षक शंकरराव मोरे यांना संबधित पत्र दिले. त्यांनी वेतनपत्रक तयार करून देतो. मात्र त्यावर माध्यमिक शिक्षणाधिकाऱ्यांची स्वाक्षरी आणा, असे सांगितले. त्यावेळी शिक्षक आणि मोरे यांच्यात वाद झाला. शिक्षण विभागाच्या तांत्रिक कारणामुळे वेतन अडवू नये. ३१ मार्चपर्यंत शिक्षकांचे वेतन खात्यावर जमा न झाल्यास वेतन पथक अधीक्षक आणि माध्यमिक शिक्षणाधिकाऱ्यांविरोधात गुन्हा दाखल करण्याचा इशारा दिला. आंदोलनात आनंदा डाकरे, दिनकर कांबळे, शहाजी मासाळ, ए. व्ही. कांबळे, ए. व्ही. पाटील, व्ही. जी. पाटील आदी सहभागी झाले.
अतिरिक्त शिक्षकांचे वेतन तातडीने देण्याच्या मागणीसाठी माध्यमिक शिक्षकांनी गुरूवारी जिल्हा परिषदेच्या माध्यमिक शिक्षण विभागाच्या कार्यालयात दुपारपर्यंत ठिय्या आंदोलन केले. आठवडाभरापूर्वी या शिक्षकांनी आत्मदहनाचा इशारा दिला होता. आत्मदहनाचा इशारा सकाळी दिल्याने यंत्रणेची तारांबळ उडाली. पोलिसांनी जिल्हा परिषदेत प्रवेश करणाऱ्यांची कसून तपासणी केली. दुपारपर्यंत वातावरण तणावपूर्ण होते. अखेर ३१ मार्चपर्यत खात्यावर वेतन जमा न झाल्यास माध्यमिक शिक्षणाधिकारी आणि वेतन पथक अधीक्षकांविरोधात पोलिसांत गुन्हा दाखल करण्याचा इशारा शिक्षकांनी दिला.
अतिरिक्त शिक्षकांचे समायोजन केले असले तरी त्या शाळांच्या मुख्याध्यापकांनी माध्यमिक शिक्षण विभागाकडे पगार बिले सादर केलेली नाहीत. त्यामुळे शिक्षणसंस्था आणि माध्यमिक शिक्षण विभागाच्या तांत्रिक अडचणीत शिक्षकांचे पगार अडकले आहेत. काही शाळांमध्ये संबंधित विषयाची जागा, अनुदानित पद रिक्त नाही. अपदवीधर वेतनश्रेणीतील पद असताना पदवीधर वेतनश्रेणीतील शिक्षकांचे समायोजन अशा तांत्रिक अडचणी आहेत. समायोजन केलेल्या शाळांत शिक्षकांचे नाव समाविष्ट केले नसल्याने त्यांचा वेतनाचा प्रश्न निर्माण झाला आहे. याविरोधात चाळीसहून अधिक अतिरिक्त शिक्षकांनी माध्यमिक शिक्षकांनी माध्यमिक शिक्षण विभागाकडे धाव घेतली. अचानक झालेल्या आंदोलनामुळे शिक्षण विभागाची तारांबळ उडाली.
प्रशासनाने पोलिसांना बोलाविले. विभागात शिक्षक आणि शिक्षण विभागाचे अधिकारी यांच्यात दोन तास वादावादी झाली. माध्यमिक शिक्षण विभागाचे अधीक्षक एम. बी. शेख आणि उपशिक्षणाधिकारी सूर्यंकांत पाटील यांच्यासोबत चर्चा करण्यात आली. जोपर्यंत वेतनाचा आदेश देत नाही, तोपर्यंत आंदोलन मागे न घेण्याचा इशारा देण्यात आला. त्यामुळे वातावरण तणावपूर्ण बनले.
दरम्यान माध्यमिक शिक्षण विभागाकडून वेतनाचे पत्र घेऊन शिक्षक शिक्षण उपसंचालक कार्यालयातील माध्यमिक शिक्षण विभागाच्या वेतन पथकाकडे केले. वेतनपथक अधीक्षक शंकरराव मोरे यांना संबधित पत्र दिले. त्यांनी वेतनपत्रक तयार करून देतो. मात्र त्यावर माध्यमिक शिक्षणाधिकाऱ्यांची स्वाक्षरी आणा, असे सांगितले. त्यावेळी शिक्षक आणि मोरे यांच्यात वाद झाला. शिक्षण विभागाच्या तांत्रिक कारणामुळे वेतन अडवू नये. ३१ मार्चपर्यंत शिक्षकांचे वेतन खात्यावर जमा न झाल्यास वेतन पथक अधीक्षक आणि माध्यमिक शिक्षणाधिकाऱ्यांविरोधात गुन्हा दाखल करण्याचा इशारा दिला. आंदोलनात आनंदा डाकरे, दिनकर कांबळे, शहाजी मासाळ, ए. व्ही. कांबळे, ए. व्ही. पाटील, व्ही. जी. पाटील आदी सहभागी झाले.