म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर
पदस्थापनेच्या ठिकाणी हजर होण्याचा नियुक्ती आदेश धुडकावणाऱ्या चार शिक्षकांना मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. कुणाल खेमनार यांनी अखेर निलंबित केले. संदीप शारबिद्रे, संदीप शितोळे, काशिराम बिदनगी, मोहन सातपुते अशी त्यांची नावे आहेत. सोयीची शाळा मिळवून तिथेच हजर होण्याचा हट्ट त्यांना महागात पडला.
आंतर जिल्हा बदलीने जिल्ह्यात ७० शिक्षक आले होते. त्यांना १९ ऑगस्टला प्रशासनाने समुपदेशनाने पदस्थापना दिली. त्यातील संदीप शारबिद्रे, संदीप शितोळे, शहनाज मुजावर, संबोधी गायकवाड, सविता कुंभार, सरला कांबळे, काशीराम बिदनगी, दीपाली ठोंबरे, राणी शिंगाडे, मोहन सातपुते हे दहा शिक्षक गैरसोयीची शाळा मिळाल्याचे कारण पुढे करीत हजर झालेले नव्हते. त्यांना २१ तारखेपर्यंत हजर व्हा, अन्यथा कारवाई करण्याची नोटीस देण्यात आली होती. त्यानंतरही ते हजर झाले नाहीत.
२१ पासून त्यांचे विना वेतन केले. तरीही ते हजर झाले नाहीत. परिणामी त्यांना निलंबित करण्यात आले. हजर न झालेल्या सहा शिक्षिकांना सरकारच्या नियमानुसार सोयीच्या ठिकाणची शाळा देण्याचा प्रस्ताव आयुक्तांकडे पाठवला आहे. तो मंजूर न झाल्यास पूर्वी दिलेल्या शाळेतच त्यांनाही हजर व्हावे लागणार आहे. न झाल्यास त्यांच्यावरही कारवाई होणार आहे.
पदस्थापनेच्या ठिकाणी हजर होण्याचा नियुक्ती आदेश धुडकावणाऱ्या चार शिक्षकांना मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. कुणाल खेमनार यांनी अखेर निलंबित केले. संदीप शारबिद्रे, संदीप शितोळे, काशिराम बिदनगी, मोहन सातपुते अशी त्यांची नावे आहेत. सोयीची शाळा मिळवून तिथेच हजर होण्याचा हट्ट त्यांना महागात पडला.
आंतर जिल्हा बदलीने जिल्ह्यात ७० शिक्षक आले होते. त्यांना १९ ऑगस्टला प्रशासनाने समुपदेशनाने पदस्थापना दिली. त्यातील संदीप शारबिद्रे, संदीप शितोळे, शहनाज मुजावर, संबोधी गायकवाड, सविता कुंभार, सरला कांबळे, काशीराम बिदनगी, दीपाली ठोंबरे, राणी शिंगाडे, मोहन सातपुते हे दहा शिक्षक गैरसोयीची शाळा मिळाल्याचे कारण पुढे करीत हजर झालेले नव्हते. त्यांना २१ तारखेपर्यंत हजर व्हा, अन्यथा कारवाई करण्याची नोटीस देण्यात आली होती. त्यानंतरही ते हजर झाले नाहीत.
२१ पासून त्यांचे विना वेतन केले. तरीही ते हजर झाले नाहीत. परिणामी त्यांना निलंबित करण्यात आले. हजर न झालेल्या सहा शिक्षिकांना सरकारच्या नियमानुसार सोयीच्या ठिकाणची शाळा देण्याचा प्रस्ताव आयुक्तांकडे पाठवला आहे. तो मंजूर न झाल्यास पूर्वी दिलेल्या शाळेतच त्यांनाही हजर व्हावे लागणार आहे. न झाल्यास त्यांच्यावरही कारवाई होणार आहे.