अ‍ॅपशहर

चांगल्या योजना गतिमान करु

'पंचगंगा नदी प्रदूषणमुक्ती, शिक्षण आणि आरोग्यविषयक सेवेत सुधारणा या कामांना प्राधान्य राहील. शिवाय सध्या सुरू असलेल्या लोकाभिमुख योजनाही तितक्याच सक्षमपणे पुढे राबविल्या जातील,'अशी ग्वाही जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी अमन मित्तल यांनी दिली.

Maharashtra Times 17 Aug 2018, 4:44 am
मुख्य कार्यकारी अधिकारी मित्तल यांचे प्रतिपादन
महाराष्ट्र टाइम्स.कॉम aman-mittal


म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

'पंचगंगा नदी प्रदूषणमुक्ती, शिक्षण आणि आरोग्यविषयक सेवेत सुधारणा या कामांना प्राधान्य राहील. शिवाय सध्या सुरू असलेल्या लोकाभिमुख योजनाही तितक्याच सक्षमपणे पुढे राबविल्या जातील,'अशी ग्वाही जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी अमन मित्तल यांनी दिली.

मित्तल यांनी गुरुवारी मुख्य कार्यकारी अधिकारीपदाचा कार्यभार स्वीकारला. त्यांनी यापूर्वी चंद्रपूर येथे प्रशिक्षणार्थी अधिकारी म्हणून तर नाशिक येथे आदिवासी विकास प्रकल्प संचालक, सहायक जिल्हाधिकारीसह चार पदांवर काम केले आहे. गुरुवारी सकाळी पदभार स्वीकारल्यानंतर त्यांनी विविध विभागप्रमुखांसोबत आढावा बैठक घेतली. सकाळी ९.३० ते ११.४५ पर्यंत विभाग प्रमुखांसोबत विविध योजना, सद्यस्थितीबाबत चर्चा केली. जिल्हा परिषद अध्यक्षा शौमिका महाडिक यांच्यासोबतही त्यांनी पंचगंगा नदी प्रदूषणमुक्ती संदर्भात चर्चा केली. जिल्हा परिषदेने पंचगंगा नदी प्रदूषणमुक्तीचा कार्यक्रम हाती घेतला आहे. नदी प्रदूषणमुक्त करण्यासाठी आणखी काय उपाययोजना आवश्यक आहेत हे तपासून या कामाला गती देण्याबाबत चर्चा झाली.

मित्तल म्हणाले, 'कोल्हापुरातील योजना, विकास कामे याविषयी माहिती घेत आहे. येत्या आठ दिवसात बहुतांश कामांचा अंदाज येईल. कोल्हापूर जिल्हा परिषदेत अनेक लोकोपयोयी योजना सुरू आहेत, अधिकाऱ्यांनी वेगवेगळ्या संकल्पना राबवून प्रशासन गतिमान केले आहे. शिक्षण, आरोग्य सेवेत बदल घडविले आहेत. या योजना सक्षमपणे पुढे नेल्या जातील. शिक्षण आणि आरोग्य या क्षेत्रात आणखी सुधारणा निर्माण करण्यासाठी प्रयत्न राहील.'

महत्वाचे लेख

Marathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.
ताज्या बातम्यांसह अपडेट राहण्यासाठी लाइक करा Maharashtra Times फेसबुकपेज