म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर
'राज्य सरकारने मराठा आरक्षणच्या निर्णयाची मुदतीत पूर्तता करावी, अन्यथा हजारोंच्या संख्येने गाडी मार्च काढून मुंबई ब्लॉक करु. सरकारला सळो की पळो करुन सोडू,' असा इशारा सकल मराठा समाजाच्या बैठकीत देण्यात आला. राजर्षी शाहू स्मारक भवन येथे झालेल्या बैठकीत आंदोलनाची दिशाही निश्चित करण्यात आली.
मराठा आरक्षणप्रश्नी समाजात प्रबोधन करण्यासाठी आणि आंदोलनाची व्याप्ती वाढविण्यासाठी गावागावात संपर्क मोहीम राबविली जाईल. तसेच गणेशोत्सव, नवरात्र उत्सव कालावधीत मराठा आरक्षणाचा जागर करण्याचे ठरले. प्रत्येक मंडळाला भेटून आरक्षणाच्या लढ्याचे बळ वाढविण्याचा निर्धार झाला. सकल मराठा समाजाचे वसंतराव मुळीक, इतिहास अभ्यासक इंद्रजित सावंत, दिलीप देसाई, सचिन तोडकर, स्वप्नील पार्टे, जिजाऊ ब्रिगेडच्या राजश्री चव्हाण, चारुशीला जाधव, मुस्लीम बोर्डिंगचे चेअरमन गणी आजरेकर यांच्या प्रमुख उपस्थितीत ही बैठक झाली.
इंद्रजित सावंत म्हणाले, 'राज्य सरकारने आरक्षणप्रश्नी समाजाची मानहानी केली आहे. सरकारवर विश्वास ठेवून नव्हे तर श्रीमंत शाहू महाराज छत्रपती, इतिहास संशोधक जयसिंगराव पवार, यशवंतराव थोरात यांच्या शब्दाला मान देवून आंदोलन स्थगित केले. आरक्षणाची लढाई थांबलेली नाही. मराठा आरक्षणासाठी काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस, शिवसेनेने मदत केल्यास त्यांचेही सहकार्य घेऊ.'
वसंत मुळीक म्हणाले, 'कोल्हापुरातील सकल मराठा समाजाचे आंदोलन हे समाजहिताचे असल्याचा संदेश राज्यभर पोहचला आहे. आंदोलनात पारदर्शकता आहे. वर्गणी गोळा करुन खर्च केला आहे. आरक्षणाच्या लढाईसाठी जिल्ह्यातून ताकद उभी करु. यासाठी गावागावात प्रबोधन, मेळावे यासाठी मोहीम राबविली जाईल.' स्वप्नील पार्टे व किशोर घाटगे म्हणाले, 'गणेशोत्सव कालावधीत प्रत्येक मंडळाला भेटून आरक्षणाच्या लढाईसाठी जागृती करु.' दिलीप देसाई यांनी संपूर्ण जिल्हाभर दौरे, मेळावे याव्दारे आरक्षणसाठी प्रबोधन करु. आंदोलनाची व्याप्ती वाढविली जाईल, असे नमूद केले. चंद्रकांत चव्हाण, सचिन तोडकर, प्रताप साळोखे, रणजित आयरेकर, अमित आडसुळे यांनीही मनोगत व्यक्त केले.
महिला कार्यकर्त्यांना विचारात घ्या
जिजाऊ ब्रिगेडच्या जयश्री चव्हाण, चारुशीला जाधव यांनी आरक्षण लढाईत महिलांचा सहभाग आहे, त्यांना सामावून घ्या. आरक्षणाच्या लढाईत कुणीही राजकारण करु नये, अशी भूमिका मांडली. मुस्लीम बोर्डिंगचे चेअरमन गणी आजरेकर म्हणाले, 'वेगवेगळ्या पध्दतीने आंदोलनात सातत्य ठेवले पाहिजे. मराठा समाजाला आरक्षण मिळाल्याशिवाय मुस्लीम समाजाच्या आरक्षणाचा प्रश्न मार्गी लागणार नाही. '
पैसे घेतल्याचे दाखवा, घरी बसतो
ठिय्या आंदोलनादरम्यान काहींनी अनाठायी आरोप केले. कॉँग्रेसने आंदोलनाला फूस दिल्याचे म्हटले. मात्र त्या साऱ्यांना सांगू इच्छितो की, मराठा आरक्षणाच्या लढाईला पाठिंबा देणारा कुठलाही पक्ष असो त्याची मदत घेऊ. ५८ मूक मोर्चांवेळी राजकारण्यांना मागे ठेवून मोठी चूक केली. कारण आमदार, खासदार हेच विधानसभा व लोकसभेत हा प्रश्न मांडून सरकारला निर्णय घ्यायला भाग पाडणार आहेत. आंदोलनकाळात कुणाकडून पाच पैसे घेतले नाहीत. कुणााकडून पैसे घेतल्याचे दाखवून दिल्यास घरातून बाहेर पडणार नाही,' अशा शब्दांत इंद्रजित सावंत यांनी संबंधितांचा समाचार घेतला.
'राज्य सरकारने मराठा आरक्षणच्या निर्णयाची मुदतीत पूर्तता करावी, अन्यथा हजारोंच्या संख्येने गाडी मार्च काढून मुंबई ब्लॉक करु. सरकारला सळो की पळो करुन सोडू,' असा इशारा सकल मराठा समाजाच्या बैठकीत देण्यात आला. राजर्षी शाहू स्मारक भवन येथे झालेल्या बैठकीत आंदोलनाची दिशाही निश्चित करण्यात आली.
मराठा आरक्षणप्रश्नी समाजात प्रबोधन करण्यासाठी आणि आंदोलनाची व्याप्ती वाढविण्यासाठी गावागावात संपर्क मोहीम राबविली जाईल. तसेच गणेशोत्सव, नवरात्र उत्सव कालावधीत मराठा आरक्षणाचा जागर करण्याचे ठरले. प्रत्येक मंडळाला भेटून आरक्षणाच्या लढ्याचे बळ वाढविण्याचा निर्धार झाला. सकल मराठा समाजाचे वसंतराव मुळीक, इतिहास अभ्यासक इंद्रजित सावंत, दिलीप देसाई, सचिन तोडकर, स्वप्नील पार्टे, जिजाऊ ब्रिगेडच्या राजश्री चव्हाण, चारुशीला जाधव, मुस्लीम बोर्डिंगचे चेअरमन गणी आजरेकर यांच्या प्रमुख उपस्थितीत ही बैठक झाली.
इंद्रजित सावंत म्हणाले, 'राज्य सरकारने आरक्षणप्रश्नी समाजाची मानहानी केली आहे. सरकारवर विश्वास ठेवून नव्हे तर श्रीमंत शाहू महाराज छत्रपती, इतिहास संशोधक जयसिंगराव पवार, यशवंतराव थोरात यांच्या शब्दाला मान देवून आंदोलन स्थगित केले. आरक्षणाची लढाई थांबलेली नाही. मराठा आरक्षणासाठी काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस, शिवसेनेने मदत केल्यास त्यांचेही सहकार्य घेऊ.'
वसंत मुळीक म्हणाले, 'कोल्हापुरातील सकल मराठा समाजाचे आंदोलन हे समाजहिताचे असल्याचा संदेश राज्यभर पोहचला आहे. आंदोलनात पारदर्शकता आहे. वर्गणी गोळा करुन खर्च केला आहे. आरक्षणाच्या लढाईसाठी जिल्ह्यातून ताकद उभी करु. यासाठी गावागावात प्रबोधन, मेळावे यासाठी मोहीम राबविली जाईल.' स्वप्नील पार्टे व किशोर घाटगे म्हणाले, 'गणेशोत्सव कालावधीत प्रत्येक मंडळाला भेटून आरक्षणाच्या लढाईसाठी जागृती करु.' दिलीप देसाई यांनी संपूर्ण जिल्हाभर दौरे, मेळावे याव्दारे आरक्षणसाठी प्रबोधन करु. आंदोलनाची व्याप्ती वाढविली जाईल, असे नमूद केले. चंद्रकांत चव्हाण, सचिन तोडकर, प्रताप साळोखे, रणजित आयरेकर, अमित आडसुळे यांनीही मनोगत व्यक्त केले.
महिला कार्यकर्त्यांना विचारात घ्या
जिजाऊ ब्रिगेडच्या जयश्री चव्हाण, चारुशीला जाधव यांनी आरक्षण लढाईत महिलांचा सहभाग आहे, त्यांना सामावून घ्या. आरक्षणाच्या लढाईत कुणीही राजकारण करु नये, अशी भूमिका मांडली. मुस्लीम बोर्डिंगचे चेअरमन गणी आजरेकर म्हणाले, 'वेगवेगळ्या पध्दतीने आंदोलनात सातत्य ठेवले पाहिजे. मराठा समाजाला आरक्षण मिळाल्याशिवाय मुस्लीम समाजाच्या आरक्षणाचा प्रश्न मार्गी लागणार नाही. '
पैसे घेतल्याचे दाखवा, घरी बसतो
ठिय्या आंदोलनादरम्यान काहींनी अनाठायी आरोप केले. कॉँग्रेसने आंदोलनाला फूस दिल्याचे म्हटले. मात्र त्या साऱ्यांना सांगू इच्छितो की, मराठा आरक्षणाच्या लढाईला पाठिंबा देणारा कुठलाही पक्ष असो त्याची मदत घेऊ. ५८ मूक मोर्चांवेळी राजकारण्यांना मागे ठेवून मोठी चूक केली. कारण आमदार, खासदार हेच विधानसभा व लोकसभेत हा प्रश्न मांडून सरकारला निर्णय घ्यायला भाग पाडणार आहेत. आंदोलनकाळात कुणाकडून पाच पैसे घेतले नाहीत. कुणााकडून पैसे घेतल्याचे दाखवून दिल्यास घरातून बाहेर पडणार नाही,' अशा शब्दांत इंद्रजित सावंत यांनी संबंधितांचा समाचार घेतला.