म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर
गेली कित्येक वर्षे मनातील धग आता बाहेर आली आहे. मराठ्यांचा आवाज दिल्लीपर्यंत निश्चितच पोहोचविला जाणार आहे. मंगळवार पेठेला लढवय्यांचा मोठा वारसा आहे. मोर्चात मंगळवार पेठेचा सिंहाचा वाटा राहणार आहे. मंगळवार पेठेतील तालीम, सार्वजनिक तरुण मंडळ, युवा वर्गासह प्रत्येक घराला कुलूप लावून मोर्चात सहभागी होण्याचा एकमुखी निर्धार बैठकीत व्यक्त करण्यात आला. बैठकीत काही तीन मिनिटे वीज पुरवठा खंडित झाला. त्या वेळी मोबाइल बॅटरीच्या प्रकाशात मनोगते सुरू राहिली. मराठेत्तर समाजाने या मोर्चाला पाठिंबा देऊन सक्रीय सहभागाचे आश्वासन दिले.
येत्या १५ ऑक्टोबरला होत असलेल्या सकल मराठा मूक क्रांती मोर्चाच्या तयारीसाठी मंगळवार पेठेतील नागरिकांची बैठक हिंदू एकताच्या सभागृहात रविवारी झाली.
नेता म्हणून मी या सभेत आलेला नाही. मला कुणी निमंत्रणही दिलेले नाही. एक मराठा म्हणून बैठकीत उपस्थित राहिलो आहे, असे सांगत आमदार राजेश क्षीरसागर म्हणाले, ‘राज्यात सर्वांत मोठा मोर्चा होईल. हे सांगण्यासाठी कोणत्याही ज्योतिषाची गरज लागणार नाही. मराठा आरक्षणासाठी विधानसभेत आवाज उठविला आहे. मोर्चात लाखो सहभागी होणार असल्याने नियोजन महत्त्वाचे आहे. येत्या दोन ऑक्टोबरला बुधवार, उत्तरेश्वर, शिवाजी पेठ आणि कसबा बावडा यासह एकूण १५ बैठका घेतल्या जाणार आहेत. मंगळवार पेठेलाही लढवय्यांचा इतिहास आहे. त्यामुळे घर बंद करून प्रत्येकाने मोर्चात सहभागी होण्याची गरज आहे. सीमाभागातील नागरिकही मोर्चात सहभागी होणार असल्याने पार्किंगच्या ठिकाणाचा विचार हवा.
बालगोपाल तालीम मंडळाचे निवास साळोखे म्हणाले, ‘मोर्चात मंगळवार पेठेचा सिंहाचा वाटा असेल. शाहू तरुण मंडळाच्या नेतृत्वाखाली सर्वजण एकत्र येण्यास काहीच हरकत नाही. नियोजनासाठी एक कोअर कमिटी तयार करावी. राजर्षी शाहूंची नगरीही पुरोगामी विचारांची आहे. सर्व जातीचे आणि धर्मांच्या लोकांचा मराठा आरक्षणाला पाठिंबा आहे. कोणत्याही आरक्षणाला धक्का न लावता आरक्षणाच्या लढाईत मंगळवार पेठेतील प्रत्येक कुटुंबाचा सहभाग असेल. बाराइमाम आणि बालगोपाल तालमीची संयुक्त बैठक घेतली जाईल. मिरजकर तिकटी ते गांधी मैदानापर्यंत स्वयंसेवकांची फौज उभारली जाईल. या मार्गावरील रस्ता स्वच्छ ठेवण्याची जबाबदारी मंगळवार पेठेतील कार्यकर्ते घेतील.
उमेश पोवार म्हणाले, ‘मोर्चात सर्व पेठांनी एकत्रपणे सहभागी होण्याची गरज आहे. त्यासाठी वैयक्तिक हेवेदावे आणि श्रेय घेण्याचा प्रयत्न करू नये. संपूर्ण देशात मराठा समाजाची लाट आहे. या लाटेवर स्वार होऊन आरक्षण मिळविण्यासाठी या लढ्यात प्रत्येक कुंटुंबाने सहभागी व्हावे.
बाबा पार्टे म्हणाले, ‘मोर्चाच्या दिवशीही मंगळवार पेठेत सर्व व्यवसाय बंद राहतील. शाळा आणि कॉलेजमधील प्रत्येक युवक मोर्चात सहभागी होण्यासाठी प्रयत्न करणार आहेत. यामध्ये मंगळवार पेठ प्रत्येक घरात जागृतीचे काम करेल. मोर्चात आरोग्याचा प्रश्न महत्त्वाचा आहे. पाण्याचा वापरही जपून करायला हवा.
मराठा महासंघाचे जिल्हाध्यक्ष वसंतराव मुळीक म्हणाले, ‘भविष्याचा विचार करून प्रत्येक घरातील युवा मंडळीनी स्वयंस्फूर्तीने बाहेर पडण्याची गरज आहे.’
माणिक मंडलिक म्हणाले, ‘गेली कित्येक वर्षे धगधगत असलेली मनातील धग बाहेर पडली आहे. ही धग आता दिल्लीपर्यत पोहोचणार आहे. पन्नास टक्के आरक्षणही देण्याचे धोरण ठरविताना अन्य समाजाचा विचार केलेला नव्हता.’ मुस्लिम बोर्डिंगचे अध्यक्ष गणी आजरेकर म्हणाले, ‘सकल मराठा समाज क्रांती मोर्चासाठी कोणतीही जबाबदारी द्यावी. त्यासाठी मुस्लिम समाजाचा कायम पाठिबा राहिली. आदिल फरास म्हणाले, ‘मराठा आरक्षणाला मुस्लिम समाजाने पाठिंबा जाहीर केला आहे. या मोर्चात दोन हजार मुस्लिम मावळे सहभाग घेणार आहेत.’
आरपीआयचे अॅड. पंडितराव सडोलीकर म्हणाले, ‘आरपीआयच्या सर्व गटाचा मराठ्यांच्या मोर्चाला पाठिंबा राहणार आहे.’ बोडके तालीम मंडळाचे अशोक पोवार म्हणाले, ‘मंगळवार पेठेतून अधिकाधिक स्वयंसेवक देण्यासाठी प्रयत्न देण्याची गरज आहे.’
माळी समाजाचे बाबासाहेब माळी यांनी मोर्चाला पाठिंबा जाहीर केला. संदीप पाटील, महेश जाधव आदींनी मनोगत व्यक्त केले.
यावेळी चंद्रमोहन पाटील यांनी दोन हजार चपात्या आणि अजित सासने यांनी ५०० किलो पोहे देण्याचे जाहीर केले.
यावेळी प्रा. आनंद जरग, जयकुमार शिंदे, अशोक पोवार, प्रसाद जाधव, अच्युत साळोखे, विनायक साळोखे, श्रीकांत जाधव, अशोक जाधव आदींनी मनोगत व्यक्त केले. नगरसेवक रविकिरण इंगवले यांच्यासह मंगळवार पेठातील तालीम मंडळाचे पदाधिकारी उपस्थित होते.
गेली कित्येक वर्षे मनातील धग आता बाहेर आली आहे. मराठ्यांचा आवाज दिल्लीपर्यंत निश्चितच पोहोचविला जाणार आहे. मंगळवार पेठेला लढवय्यांचा मोठा वारसा आहे. मोर्चात मंगळवार पेठेचा सिंहाचा वाटा राहणार आहे. मंगळवार पेठेतील तालीम, सार्वजनिक तरुण मंडळ, युवा वर्गासह प्रत्येक घराला कुलूप लावून मोर्चात सहभागी होण्याचा एकमुखी निर्धार बैठकीत व्यक्त करण्यात आला. बैठकीत काही तीन मिनिटे वीज पुरवठा खंडित झाला. त्या वेळी मोबाइल बॅटरीच्या प्रकाशात मनोगते सुरू राहिली. मराठेत्तर समाजाने या मोर्चाला पाठिंबा देऊन सक्रीय सहभागाचे आश्वासन दिले.
येत्या १५ ऑक्टोबरला होत असलेल्या सकल मराठा मूक क्रांती मोर्चाच्या तयारीसाठी मंगळवार पेठेतील नागरिकांची बैठक हिंदू एकताच्या सभागृहात रविवारी झाली.
नेता म्हणून मी या सभेत आलेला नाही. मला कुणी निमंत्रणही दिलेले नाही. एक मराठा म्हणून बैठकीत उपस्थित राहिलो आहे, असे सांगत आमदार राजेश क्षीरसागर म्हणाले, ‘राज्यात सर्वांत मोठा मोर्चा होईल. हे सांगण्यासाठी कोणत्याही ज्योतिषाची गरज लागणार नाही. मराठा आरक्षणासाठी विधानसभेत आवाज उठविला आहे. मोर्चात लाखो सहभागी होणार असल्याने नियोजन महत्त्वाचे आहे. येत्या दोन ऑक्टोबरला बुधवार, उत्तरेश्वर, शिवाजी पेठ आणि कसबा बावडा यासह एकूण १५ बैठका घेतल्या जाणार आहेत. मंगळवार पेठेलाही लढवय्यांचा इतिहास आहे. त्यामुळे घर बंद करून प्रत्येकाने मोर्चात सहभागी होण्याची गरज आहे. सीमाभागातील नागरिकही मोर्चात सहभागी होणार असल्याने पार्किंगच्या ठिकाणाचा विचार हवा.
बालगोपाल तालीम मंडळाचे निवास साळोखे म्हणाले, ‘मोर्चात मंगळवार पेठेचा सिंहाचा वाटा असेल. शाहू तरुण मंडळाच्या नेतृत्वाखाली सर्वजण एकत्र येण्यास काहीच हरकत नाही. नियोजनासाठी एक कोअर कमिटी तयार करावी. राजर्षी शाहूंची नगरीही पुरोगामी विचारांची आहे. सर्व जातीचे आणि धर्मांच्या लोकांचा मराठा आरक्षणाला पाठिंबा आहे. कोणत्याही आरक्षणाला धक्का न लावता आरक्षणाच्या लढाईत मंगळवार पेठेतील प्रत्येक कुटुंबाचा सहभाग असेल. बाराइमाम आणि बालगोपाल तालमीची संयुक्त बैठक घेतली जाईल. मिरजकर तिकटी ते गांधी मैदानापर्यंत स्वयंसेवकांची फौज उभारली जाईल. या मार्गावरील रस्ता स्वच्छ ठेवण्याची जबाबदारी मंगळवार पेठेतील कार्यकर्ते घेतील.
उमेश पोवार म्हणाले, ‘मोर्चात सर्व पेठांनी एकत्रपणे सहभागी होण्याची गरज आहे. त्यासाठी वैयक्तिक हेवेदावे आणि श्रेय घेण्याचा प्रयत्न करू नये. संपूर्ण देशात मराठा समाजाची लाट आहे. या लाटेवर स्वार होऊन आरक्षण मिळविण्यासाठी या लढ्यात प्रत्येक कुंटुंबाने सहभागी व्हावे.
बाबा पार्टे म्हणाले, ‘मोर्चाच्या दिवशीही मंगळवार पेठेत सर्व व्यवसाय बंद राहतील. शाळा आणि कॉलेजमधील प्रत्येक युवक मोर्चात सहभागी होण्यासाठी प्रयत्न करणार आहेत. यामध्ये मंगळवार पेठ प्रत्येक घरात जागृतीचे काम करेल. मोर्चात आरोग्याचा प्रश्न महत्त्वाचा आहे. पाण्याचा वापरही जपून करायला हवा.
मराठा महासंघाचे जिल्हाध्यक्ष वसंतराव मुळीक म्हणाले, ‘भविष्याचा विचार करून प्रत्येक घरातील युवा मंडळीनी स्वयंस्फूर्तीने बाहेर पडण्याची गरज आहे.’
माणिक मंडलिक म्हणाले, ‘गेली कित्येक वर्षे धगधगत असलेली मनातील धग बाहेर पडली आहे. ही धग आता दिल्लीपर्यत पोहोचणार आहे. पन्नास टक्के आरक्षणही देण्याचे धोरण ठरविताना अन्य समाजाचा विचार केलेला नव्हता.’ मुस्लिम बोर्डिंगचे अध्यक्ष गणी आजरेकर म्हणाले, ‘सकल मराठा समाज क्रांती मोर्चासाठी कोणतीही जबाबदारी द्यावी. त्यासाठी मुस्लिम समाजाचा कायम पाठिबा राहिली. आदिल फरास म्हणाले, ‘मराठा आरक्षणाला मुस्लिम समाजाने पाठिंबा जाहीर केला आहे. या मोर्चात दोन हजार मुस्लिम मावळे सहभाग घेणार आहेत.’
आरपीआयचे अॅड. पंडितराव सडोलीकर म्हणाले, ‘आरपीआयच्या सर्व गटाचा मराठ्यांच्या मोर्चाला पाठिंबा राहणार आहे.’ बोडके तालीम मंडळाचे अशोक पोवार म्हणाले, ‘मंगळवार पेठेतून अधिकाधिक स्वयंसेवक देण्यासाठी प्रयत्न देण्याची गरज आहे.’
माळी समाजाचे बाबासाहेब माळी यांनी मोर्चाला पाठिंबा जाहीर केला. संदीप पाटील, महेश जाधव आदींनी मनोगत व्यक्त केले.
यावेळी चंद्रमोहन पाटील यांनी दोन हजार चपात्या आणि अजित सासने यांनी ५०० किलो पोहे देण्याचे जाहीर केले.
यावेळी प्रा. आनंद जरग, जयकुमार शिंदे, अशोक पोवार, प्रसाद जाधव, अच्युत साळोखे, विनायक साळोखे, श्रीकांत जाधव, अशोक जाधव आदींनी मनोगत व्यक्त केले. नगरसेवक रविकिरण इंगवले यांच्यासह मंगळवार पेठातील तालीम मंडळाचे पदाधिकारी उपस्थित होते.