Anuradha.kadam@timesgroup.com
Tweet:@anuradhakadamMt
म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर
फुलेवाडी नाका ओलांडून डाव्या बाजुला वळण घेतल्यानंतर काही अंतरावर मातोश्री वृद्धाश्रमचा पाच एकरचा परिसर दिसतो. हिरव्यागार झाडांनी वेढलेल्या या परिसरात पाऊल टाकतानाच मनात येतं की आयुष्याच्या सायंकाळी नातवंडाच्या गोकुळात रमण्यात समाधान मानणारी ही ज्येष्ठ पाऊले वृद्धाश्रमाकडे वळली असतील तेव्हा त्यांच्या मनात वेदना झाल्या असतील का? याच विचाराने आश्रमातील ज्येष्ठांना बोलतं केल्यानंतर मात्र आपल्या मनातील समज दूर झाला. ‘या वयात काय हवं असतं?’ असा प्रतिप्रश्न करत ते जेव्हा म्हणाले, ‘निवृत्तीच्या टप्प्यावर आयुष्याची इतकी सुखद सायंकाळ वृद्धाश्रमात अनुभवता येते. इथे आमचे सगळे लाड पुरवणारी माणुसकी आहे. त्यामुळे जीवनाच्या क्षितीजरेषेवर समवयस्कांच्या गोकुळात राहण्याचा आनंद देणारे वृद्धाश्रम आमच्यासाठी मात्र प्रेमाश्रम आहे,’ अशा शब्दात मातोश्री आश्रमातील ज्येष्ठांनी भावना व्यक्त केल्या.
एक ऑक्टोबर रोजी असलेल्या ज्येष्ठ नागरिक दिनाच्या औचित्याने मातोश्री वृद्धाश्रमातील ज्येष्ठांशी गप्पा मारल्या तेव्हा ‘मस्त चाललय आमचं’ असाचा काहींसा सुखद आणि आश्वासन भाव आजीआजोबांच्या बोलण्यात होता.
वीस वर्षांपूर्वी उभारण्यात आलेल्या मातोश्री आश्रमात आलेल्या पहिल्या आजी म्हणजे प्रमिला कुलकर्णी. आज त्या ९३ वर्षाच्या आहेत. मुलांची, सुनांची, नातवंडांची आठवण येते का? या प्रश्नावर त्या म्हणतात, ‘आता वीस वर्षानंतर इथल्या कानाकोपऱ्याशी इतकं घट्ट नातं तयार झाल आहे की इथून कुठे जावसं वाटत नाही. त्यांना आठवण आली तर येतात. देवदासी असलेल्या शालाबाई सध्या आश्रमात राहतात. त्यांना साधना झाडबुके यांच्या संवेदना यासंस्थेतर्फे देवदासीतून मुक्त करण्यात आल्यानंतर आश्रमात ठेवले. जे आजीआजोबा थकले आहेत त्यांचे कपडे धुणे, त्यांना मदत करणे अशी काम करण्यात शालाबाईंना मिळणारा आनंद त्यांच्या चेहऱ्यावर ओसंडून वाहतो. ऐंशी वर्षांचे नंदकुमार आणि ७२ वर्षांच्या माधुरी हे कुलकर्णी दांपत्य सहा महिन्यांपूर्वीच आश्रमात आले. मुलगा सून नोकरीला, नातू त्याच्या विश्वात मग्न. सगळं असूनही घरात एकटेपणाचे काहूर. माधुरीआजी सांगतात, ‘साठीपर्यंत स्वयंपाक, घरकाम केलं. आता नको वाटतं. मुलगा आणि सुनेकडे सगळं सोपवून आश्रमात आलो. आठ दिवस राहून बघा, आवडलं नाही तर घरी जा,’ असं आश्रमाच्या संचालिकांनी सांगितलं. दुसऱ्याच दिवशी आमचं ठरलं की, ‘आता आयुष्य संपेपर्यंत हेच आपलं घर.’
मुंबईत ऐसपैस बंगला, पोलिस खात्यातून निवृत्त झाल्यामुळे पाच आकडी पेन्शन असलेलं शांत निवृत्त जीवन असं असूनही आनंद खाके वृद्धाश्रमात आनंदाने राहत आहेत. आश्रमाच्या आवारातील एक भकास कोपरा त्यांनी आपल्या बागकामातून फुलवला आहे. शिवाजी पेठेत घरदार असलेले अरुण लेले हेदेखील आश्रमात राहतात. आपल्या वार्धक्याचा नव्या पिढीला त्रास नको म्हणून स्वेच्छेने ते इथे आलेत. शोभाआजी, कमलआजी, वत्सला आजी, निवृत्त प्राध्यापक विजय बागडे यांच्यासारखे ५२ आजीआजोबा अगदी गुण्यागोविंदाने आश्रमात नांदत आहेत.
कुणी खरच इच्छेने तर कुणी मुलांनी दुर्लक्ष केल्यामुळे आश्रमात आले आहेत. मात्र कौटुंबिक चर्चा करायच्या नाहीत हा इथला नियम सगळे आवर्जून पाळतात. ज्यांचे हातपाय चालतात ते स्वत:ची कामं करतात. सणवार साजरे होतात. वाढदिवसाचे औंक्षण होते. आजी कधीकधी आश्रमाच्या स्वयंपाकघरात रमतात. इतकेच नव्हे तर रोजच्या जेवण्याच्या वेळापत्रकाला छेद देत कधी कधी आजीआजोबांच्या आवडीचा पदार्थही ताटात येतो.
हवं ते करण्याचा आनंद वेगळाच
आयुष्याची संध्याकाळ मुलासुनांच्या ताब्यात गेल्यामुळे अनेकदा मनाला आवडणाऱ्या गोष्टी करण्यावर बंधने येतात. मात्र असे बंधनमुक्त आयुष्य आश्रमात जगायला मिळते. त्यामुळे वृद्धाश्रमातच खरं तर आमचं मन प्रसन्न राहतं. केवळ समाजाला दाखवण्यासाठी मुले सुनांसोबत राहून आयुष्याची संध्याकाळ कंटाळवाणी करण्यापेक्षा आश्रमात मुक्तपणे राहण्यात आम्हाला समाधान आहे हाच समानधागा इथल्या आजीआजोबांना जोडून ठेवत आहे.
संस्कारवर्गातील मुलांमध्ये नातवंडांचे सुख
आश्रमातील आजीआजोबांचे मन मुलं आणि सुनांमधून बाहेर पडले असले तरी नातवंडाभोवती अनेकदा त्यांचे मन फेर धरते. त्यांची हीच मानसिकता ओळखून मातोश्री वृद्धाश्रमाच्या संचालिका वैशाली राजशेखर, उपाध्यक्ष सूर्यप्रभा चिटणीस, समन्वयक पूजा पाटील यांनी आश्रमात लहान मुलांसाठी संस्कार वर्ग सुरू केला आहे. चिमुकल्यांच्या सहवासात आजीआजोबांना नातवंडांना भेटल्याचा आनंद मिळावा यासाठी हा संकल्प राबवण्यात आला आहे.
Tweet:@anuradhakadamMt
म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर
फुलेवाडी नाका ओलांडून डाव्या बाजुला वळण घेतल्यानंतर काही अंतरावर मातोश्री वृद्धाश्रमचा पाच एकरचा परिसर दिसतो. हिरव्यागार झाडांनी वेढलेल्या या परिसरात पाऊल टाकतानाच मनात येतं की आयुष्याच्या सायंकाळी नातवंडाच्या गोकुळात रमण्यात समाधान मानणारी ही ज्येष्ठ पाऊले वृद्धाश्रमाकडे वळली असतील तेव्हा त्यांच्या मनात वेदना झाल्या असतील का? याच विचाराने आश्रमातील ज्येष्ठांना बोलतं केल्यानंतर मात्र आपल्या मनातील समज दूर झाला. ‘या वयात काय हवं असतं?’ असा प्रतिप्रश्न करत ते जेव्हा म्हणाले, ‘निवृत्तीच्या टप्प्यावर आयुष्याची इतकी सुखद सायंकाळ वृद्धाश्रमात अनुभवता येते. इथे आमचे सगळे लाड पुरवणारी माणुसकी आहे. त्यामुळे जीवनाच्या क्षितीजरेषेवर समवयस्कांच्या गोकुळात राहण्याचा आनंद देणारे वृद्धाश्रम आमच्यासाठी मात्र प्रेमाश्रम आहे,’ अशा शब्दात मातोश्री आश्रमातील ज्येष्ठांनी भावना व्यक्त केल्या.
एक ऑक्टोबर रोजी असलेल्या ज्येष्ठ नागरिक दिनाच्या औचित्याने मातोश्री वृद्धाश्रमातील ज्येष्ठांशी गप्पा मारल्या तेव्हा ‘मस्त चाललय आमचं’ असाचा काहींसा सुखद आणि आश्वासन भाव आजीआजोबांच्या बोलण्यात होता.
वीस वर्षांपूर्वी उभारण्यात आलेल्या मातोश्री आश्रमात आलेल्या पहिल्या आजी म्हणजे प्रमिला कुलकर्णी. आज त्या ९३ वर्षाच्या आहेत. मुलांची, सुनांची, नातवंडांची आठवण येते का? या प्रश्नावर त्या म्हणतात, ‘आता वीस वर्षानंतर इथल्या कानाकोपऱ्याशी इतकं घट्ट नातं तयार झाल आहे की इथून कुठे जावसं वाटत नाही. त्यांना आठवण आली तर येतात. देवदासी असलेल्या शालाबाई सध्या आश्रमात राहतात. त्यांना साधना झाडबुके यांच्या संवेदना यासंस्थेतर्फे देवदासीतून मुक्त करण्यात आल्यानंतर आश्रमात ठेवले. जे आजीआजोबा थकले आहेत त्यांचे कपडे धुणे, त्यांना मदत करणे अशी काम करण्यात शालाबाईंना मिळणारा आनंद त्यांच्या चेहऱ्यावर ओसंडून वाहतो. ऐंशी वर्षांचे नंदकुमार आणि ७२ वर्षांच्या माधुरी हे कुलकर्णी दांपत्य सहा महिन्यांपूर्वीच आश्रमात आले. मुलगा सून नोकरीला, नातू त्याच्या विश्वात मग्न. सगळं असूनही घरात एकटेपणाचे काहूर. माधुरीआजी सांगतात, ‘साठीपर्यंत स्वयंपाक, घरकाम केलं. आता नको वाटतं. मुलगा आणि सुनेकडे सगळं सोपवून आश्रमात आलो. आठ दिवस राहून बघा, आवडलं नाही तर घरी जा,’ असं आश्रमाच्या संचालिकांनी सांगितलं. दुसऱ्याच दिवशी आमचं ठरलं की, ‘आता आयुष्य संपेपर्यंत हेच आपलं घर.’
मुंबईत ऐसपैस बंगला, पोलिस खात्यातून निवृत्त झाल्यामुळे पाच आकडी पेन्शन असलेलं शांत निवृत्त जीवन असं असूनही आनंद खाके वृद्धाश्रमात आनंदाने राहत आहेत. आश्रमाच्या आवारातील एक भकास कोपरा त्यांनी आपल्या बागकामातून फुलवला आहे. शिवाजी पेठेत घरदार असलेले अरुण लेले हेदेखील आश्रमात राहतात. आपल्या वार्धक्याचा नव्या पिढीला त्रास नको म्हणून स्वेच्छेने ते इथे आलेत. शोभाआजी, कमलआजी, वत्सला आजी, निवृत्त प्राध्यापक विजय बागडे यांच्यासारखे ५२ आजीआजोबा अगदी गुण्यागोविंदाने आश्रमात नांदत आहेत.
कुणी खरच इच्छेने तर कुणी मुलांनी दुर्लक्ष केल्यामुळे आश्रमात आले आहेत. मात्र कौटुंबिक चर्चा करायच्या नाहीत हा इथला नियम सगळे आवर्जून पाळतात. ज्यांचे हातपाय चालतात ते स्वत:ची कामं करतात. सणवार साजरे होतात. वाढदिवसाचे औंक्षण होते. आजी कधीकधी आश्रमाच्या स्वयंपाकघरात रमतात. इतकेच नव्हे तर रोजच्या जेवण्याच्या वेळापत्रकाला छेद देत कधी कधी आजीआजोबांच्या आवडीचा पदार्थही ताटात येतो.
हवं ते करण्याचा आनंद वेगळाच
आयुष्याची संध्याकाळ मुलासुनांच्या ताब्यात गेल्यामुळे अनेकदा मनाला आवडणाऱ्या गोष्टी करण्यावर बंधने येतात. मात्र असे बंधनमुक्त आयुष्य आश्रमात जगायला मिळते. त्यामुळे वृद्धाश्रमातच खरं तर आमचं मन प्रसन्न राहतं. केवळ समाजाला दाखवण्यासाठी मुले सुनांसोबत राहून आयुष्याची संध्याकाळ कंटाळवाणी करण्यापेक्षा आश्रमात मुक्तपणे राहण्यात आम्हाला समाधान आहे हाच समानधागा इथल्या आजीआजोबांना जोडून ठेवत आहे.
संस्कारवर्गातील मुलांमध्ये नातवंडांचे सुख
आश्रमातील आजीआजोबांचे मन मुलं आणि सुनांमधून बाहेर पडले असले तरी नातवंडाभोवती अनेकदा त्यांचे मन फेर धरते. त्यांची हीच मानसिकता ओळखून मातोश्री वृद्धाश्रमाच्या संचालिका वैशाली राजशेखर, उपाध्यक्ष सूर्यप्रभा चिटणीस, समन्वयक पूजा पाटील यांनी आश्रमात लहान मुलांसाठी संस्कार वर्ग सुरू केला आहे. चिमुकल्यांच्या सहवासात आजीआजोबांना नातवंडांना भेटल्याचा आनंद मिळावा यासाठी हा संकल्प राबवण्यात आला आहे.