कोल्हापूर: जिल्हा परिषदेच्या स्थायी समितीची सभा बुधवारी (ता.१३) होणार आहे. विधानसभा निवडणूक संपल्यानंतर पहिल्यांदाच स्थायी समितीची सभा होत आहे. यामध्ये विविध सरकारी योजना व आणि व्यक्तिगत लाभार्थी योजनेच्या अंमलबजावणीचा मुद्दा उपस्थित होणार आहे. समाजकल्याण विभाग, कृषी विभाग, महिला व बालकल्याण विभागातर्फे लाभार्थ्यांना विविध प्रकारच्या वस्तू खरेदीसाठी अर्थसहाय्य केले जाते. पात्र लाभार्थ्यांनी वस्तू खरेदी करून त्याच्या बिलाची पावती जमा केल्यानंतर खात्यावर अनुदान जमा होते. लाभार्थ्यांनी पावत्या जमा करुनही त्यांच्या खात्यावर अनुदान जमा झाले नाही. त्यावरुन प्रशासनाला धारेवर धरले जाण्याची शक्यता आहे.
सभा आज
जिल्हा परिषदेच्या स्थायी समितीची सभा बुधवारी (ता१३) होणार आहे विधानसभा निवडणूक संपल्यानंतर पहिल्यांदाच स्थायी समितीची सभा होत आहे...
महाराष्ट्र टाइम्स.कॉम 13 Nov 2019, 4:00 am