म. टा. प्रतिनिधी, सांगली: भाजपसह मित्र पक्षांनी शनिवारी केलेल्या दूध दरवाढ आंदोलनात दूध रस्त्यावर ओतल्याबद्दल आमदार सदाभाऊ खोत यांचा मुलगा सागर खोत यांच्यासह दहा ते बारा जणांवर गुन्हा दाखल झाला. बंदी आदेशाचा भंग करून दुधाचे नुकसान केल्याबद्दल इस्लामपूर पोलिस ठाण्यात हा गुन्हा दाखल करण्यात आला.
इस्लामपूर पोलिस ठाण्यातून मिळालेल्या माहितीनुसार, रयत क्रांती संघटनेचे पदाधिकारी सागर खोत यांनी शनिवारी सकाळी कार्यकर्त्यांसह इस्लामपूर ते पेठ नाका या मार्गावर वाघवाडी फाट्याजवळ दूध दरवाढ आंदोलन केले होते. बंदी आदेश धुडकावून जमाव करणे आणि वारणा दूध संघाचे वाहन अडवून दोन कॅनमधील दूध रस्त्यावर ओतून नुकसान केल्याबद्दल त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला. सागर सदाभाऊ खोत (वय ३०, रा. मरळनाथपूर), बजरंग शंकर भोसले (४०, रा. पेठ) मोहसीन मज्जीद पटवेकर (३१, रा. इस्लामपूर), लालासो तुकाराम धुमाळ (३७, रा. येवलेवाडी), बबन भगवान वाघमोडे (२७), राहुल महादेव पाटील (३२, दोघे रा. सुरूल), स्वप्नील देवानंद लोहार (३०, रा. साखराळे), नंदकुमार शंकर पाटोळे (३२, रा. बिचूद) आणि धनाजी शिवाजी मोरे (४०, रा. रेठरे हरणाक्ष, ता. वाळवा) अशी गुन्हा दाखल झालेल्या आंदोलकांची नावे आहेत. याशिवाय आणखी चार ते पाच अनोळखी आंदोलकांवर गुन्हे दाखल केले आहेत. जिल्ह्यात सर्वच ठिकाणी आंदोलन झाले असून, इस्लामपुरात मात्र राजकीय आकसापोटी गुन्हे दाखल केल्याचा आरोप आंदोलकांनी केला आहे.
इस्लामपूर पोलिस ठाण्यातून मिळालेल्या माहितीनुसार, रयत क्रांती संघटनेचे पदाधिकारी सागर खोत यांनी शनिवारी सकाळी कार्यकर्त्यांसह इस्लामपूर ते पेठ नाका या मार्गावर वाघवाडी फाट्याजवळ दूध दरवाढ आंदोलन केले होते. बंदी आदेश धुडकावून जमाव करणे आणि वारणा दूध संघाचे वाहन अडवून दोन कॅनमधील दूध रस्त्यावर ओतून नुकसान केल्याबद्दल त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला. सागर सदाभाऊ खोत (वय ३०, रा. मरळनाथपूर), बजरंग शंकर भोसले (४०, रा. पेठ) मोहसीन मज्जीद पटवेकर (३१, रा. इस्लामपूर), लालासो तुकाराम धुमाळ (३७, रा. येवलेवाडी), बबन भगवान वाघमोडे (२७), राहुल महादेव पाटील (३२, दोघे रा. सुरूल), स्वप्नील देवानंद लोहार (३०, रा. साखराळे), नंदकुमार शंकर पाटोळे (३२, रा. बिचूद) आणि धनाजी शिवाजी मोरे (४०, रा. रेठरे हरणाक्ष, ता. वाळवा) अशी गुन्हा दाखल झालेल्या आंदोलकांची नावे आहेत. याशिवाय आणखी चार ते पाच अनोळखी आंदोलकांवर गुन्हे दाखल केले आहेत. जिल्ह्यात सर्वच ठिकाणी आंदोलन झाले असून, इस्लामपुरात मात्र राजकीय आकसापोटी गुन्हे दाखल केल्याचा आरोप आंदोलकांनी केला आहे.