म. टा. वृत्तसेवा, इस्लामपूर
कृषिराज्य मंत्री सदाभाऊ खोत यांची स्वाभिमानी शेतकरी संघटनेतून हकालपट्टी केल्यानंतर अनेक कार्यकर्त्यांनी, राजकीय नेत्यांनी प्रत्यक्ष भेटून, फोनवरून त्यांच्याकडे सहानुभूती व्यक्त केली. राज्यभरातील स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या अनेक जिल्हाध्यक्षानी आमच्या सोबत राहणार असल्याचे सांगितले आहे, अशी माहिती सदाभाऊ खोत यांचे पुत्र सागर खोत यांनी दिली.
सागर खोत म्हणाले, ‘सांगली जिल्ह्यातील तसेच वाळवा तालुक्यातील सर्वच पदाधिकारी आमच्या सोबत आहेत. बुलढाणा जिल्ह्यातील कार्यकर्त्यांनी सोबत राहणार असल्याचे कळविले आहे. सांगली जिल्ह्यातील पदाधिकाऱ्यांनी तसे लेखी कळविले आहे. काही कार्यकर्त्यांचा नवीन संघटना काढण्याचा आग्रह आहे तर काहीजण भाजप सोबत जावूया, असे सांगत आहेत. मात्र, आम्ही कोणताही निर्णय घेतला तरी आता आम्ही समर्थ आहोत. जे झाले ते दुःखद झाले. त्यांनी फक्त वैयक्तिक स्वार्थ बघितला. भाऊ मंत्री झाल्यापासूनच त्यांच्या पोटात दुखायला लागल होते. पुण्याचे अॅड्. योगेश पांडे हे साखरेचे व्यापारी भाऊंच्या बद्दल आक्षेपार्ह मजकूर सोशल मीडियावर टाकत होते. तरीही खासदार शेट्टीनी त्यांना रोखले नाही. यावरूनच हे कारस्थान असल्याचे स्पष्ट होते. आमच्यावर घराणेशाहीचा आरोप राजू शेट्टींना केला. मात्र, त्यांनी घराणेशाही राज्यकर्त्यांशी जवळीक साधून पदे भोगली.’
कृषिराज्य मंत्री सदाभाऊ खोत यांची स्वाभिमानी शेतकरी संघटनेतून हकालपट्टी केल्यानंतर अनेक कार्यकर्त्यांनी, राजकीय नेत्यांनी प्रत्यक्ष भेटून, फोनवरून त्यांच्याकडे सहानुभूती व्यक्त केली. राज्यभरातील स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या अनेक जिल्हाध्यक्षानी आमच्या सोबत राहणार असल्याचे सांगितले आहे, अशी माहिती सदाभाऊ खोत यांचे पुत्र सागर खोत यांनी दिली.
सागर खोत म्हणाले, ‘सांगली जिल्ह्यातील तसेच वाळवा तालुक्यातील सर्वच पदाधिकारी आमच्या सोबत आहेत. बुलढाणा जिल्ह्यातील कार्यकर्त्यांनी सोबत राहणार असल्याचे कळविले आहे. सांगली जिल्ह्यातील पदाधिकाऱ्यांनी तसे लेखी कळविले आहे. काही कार्यकर्त्यांचा नवीन संघटना काढण्याचा आग्रह आहे तर काहीजण भाजप सोबत जावूया, असे सांगत आहेत. मात्र, आम्ही कोणताही निर्णय घेतला तरी आता आम्ही समर्थ आहोत. जे झाले ते दुःखद झाले. त्यांनी फक्त वैयक्तिक स्वार्थ बघितला. भाऊ मंत्री झाल्यापासूनच त्यांच्या पोटात दुखायला लागल होते. पुण्याचे अॅड्. योगेश पांडे हे साखरेचे व्यापारी भाऊंच्या बद्दल आक्षेपार्ह मजकूर सोशल मीडियावर टाकत होते. तरीही खासदार शेट्टीनी त्यांना रोखले नाही. यावरूनच हे कारस्थान असल्याचे स्पष्ट होते. आमच्यावर घराणेशाहीचा आरोप राजू शेट्टींना केला. मात्र, त्यांनी घराणेशाही राज्यकर्त्यांशी जवळीक साधून पदे भोगली.’