म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर
कडकनाथ कोंबडी पालन प्रकल्पाच्या संचालकांनी ८ हजारांहून अधिक शेतकऱ्यांची कोट्यवधी रुपयांची फसवणूक केल्याचे समजते. गुंतवणूक केलेल्या शेतकऱ्यांच्या रक्कमा परत देवू शकत नसल्याने कोल्हापूर आणि सांगली जिल्ह्यातील कार्यालयांना टाळे लावून संचालक पसार झाले आहेत. एका वर्षात ७५ हजाराच्या मोबदल्यात १ लाख रुपये मिळणार असल्याने हजारो गुंतवणूकदार आमिषाला बळी पडले.
कडकनाथ प्रकल्पाच्या इस्लामूपर येथील कार्यालयासह कागल, राधानगरी, भुदरगड तालक्यातील शेतकऱ्यांनी पोलिस ठाण्याकडे तक्रारी दाखल केल्या आहेत. गुंतवणूकदारांनी कंपनीच्या इस्लामपूर कार्यालयाला टाळे ठोकले आहे.
कडकनाथ कोंबड्यांचे पालन करुन लाखो रुपयांचे आमिष शेतकऱ्यांना दाखविण्यात आले. त्यांना पद्धतशीरपणे गुंतवणूक करण्यास भाग पाडले. एकाच वेळी इतकी मोठी रक्कम गुंतवणूक करण्यापेक्षा दोन टप्प्यात रक्कम स्वीकारण्याची युक्ती कंपनीने राबविली. प्रकल्प सुरु करण्यासाठी ७५ हजारांची गुंतवणूक करायची. पैकी ४० हजार रुपये पक्षी घेताना आणि उर्वरित ३५ हजार रुपये तीन महिन्यानंतर असे दोन टप्प्यात ७५ हजार रुपये देण्याची योजना राबविली. ही कंपनी रक्कम गुंतवणाऱ्या शेतकऱ्याला कडकनाथ कोंबडीची पिले देत होती. या २०० पिलांसाठी लागणारे खाद्य, औषधे, खाद्याची भांडी आणि लसीकरणाचे साहित्य कंपनीकडून दिले जात होते. तीन महिन्यानंतर कंपनीचे काही लोक शेतकऱ्यांकडे १०० मादी आणि २० नर घेवून ८० मोठे झालेले पक्षी घेवून जात. चार ते पाच महिन्यानंतर अंडी द्यायला सुरुवात झाल्यानंतर पहिली दोन हजार अंडी ५० रुपये प्रति अंडे, दुसरी दोन हजार अंडी ३० रुपये प्रति अंडे आणि त्यानंतरची ३५०० हजार अंडी २० रुपये दराने खरेदी केली जात होती. या सर्व व्यवहारातून एका वर्षांत शेतकऱ्याला सुमारे पावणेदोन लाख रुपयांचे उत्पन्न मिळण्याची हमी कंपनीने दिली होती. मात्र कोट्यवधी रुपयांची रक्कम गोळा केल्यानंतर कंपनीच्या संचालकांनी सहा महिन्यातच्या कालावधीत कोल्हापूर, सांगली आणि सातारा जिल्ह्यातील काही गुंतवणूकदारांना किरकोळ रक्कम दिली. शेतकऱ्यांना हजारो आणि लाखो रुपयांच्या पावत्याही पावती तिकिटाशिवाय दिल्या. गुंतवणूकदारांचा प्रतिसाद पाहून कंपनीने तीन जिल्ह्यात एजंट नेमून योजनेची व्याप्ती वाढविली. काही ठिकाणी कॉर्पोरेट कार्यालये स्थापन केली. कडकनाथ कोंबडी आरोग्यासाठी चांगली असून तिला फाइव्ह स्टार, सेव्हन स्टार हॉटेलमध्ये मोठी मागणी असल्याचे सांग्ण्यात आले. मात्र गुंतवणूक केलेली रक्कम परत मिळत नसल्याने गुंतवणूकदार हवालदिल झाले. या योजनेत तीन जिल्ह्यातील सुमारे ५० हजारांहून अधिकजणांनी गुंतवणूक केल्याचे समजते. दरम्यान , या प्रकरणी इस्लामपूरच्या महारयत अॅग्रो कंपनीवर कारवाई करावी, अशी मागणी निवासी उपजिल्हाधिकारी संजय शिंदे यांच्याकडे शेतकऱ्यांनी केली आहे. कागल, राधानगरी, भुदरगड तालुक्यातील शेतकऱ्यांनी मुरगूड पोलिस ठाण्याला निवेदन देवून कडकनाथ कंपनीच्या बोगस कारभाराची चौकशी करण्याची मागणी केली आहे.
दरम्यान, कंपनीत कोणताही गैरव्यवहार नसल्याचा दावा कंपनीचे संस्थापक अध्यक्ष सुधीर मोहिते यांनी केला आहे. त्याबाबतचे प्रसिद्धपत्रक त्यांनी गुंतवणूकादारांना दिले आहे. कंपनीचा सर्व कारभार सुरळीत सुरु असून कोणताही गैरव्यवहार झालेला नाही. पशुखाद्याची समस्या निर्माण झाली आहे, त्यावर लवकरच तोडगा निघेल. कोणत्याही अफवांवर आणि भूलथापांवर विश्वास न ठेवता शेतकऱ्यांनी कंपनीला सहकार्य करावे, असे आवाहन मोहिते यांनी केले आहे.
तर, कोंबड्याची विक्री होत नाही. पहिल्या शेतकऱ्यांच्या कोंबड्या नव्या गुंतवणूकदाराला दिल्या जात आहेत. गुंतवणूक केलेल्या रक्कम दिलेली नाही. अनेकदा कंपनीच्या कार्यालयाकडे हेलपाटे मारुनही संचालक भेट घेत नाहीत. पैसे परत देण्याचा तगादा लावल्याने कार्यालय बंद केले असल्याचा आरोप तक्रारदारांनी केला आहे.
राज्यमंत्री सदाभाऊ खोत
यांच्याशी संबधित संस्था
याबाबत स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे अध्यक्ष, माजी खासदार राजू शेट्टी म्हणाले,‘ कडकनाथ कोंबडी पालन करणारी संस्था ही कृषी राज्यमंत्री सदाभाऊ खोत यांच्याशी संबधित आहे. सांगलीतील ज्या कंपनीने ही फसवणूक केली आहे, त्याचा मालक हा राज्यमंत्री खोत यांच्या रयत क्रांती संघटनेच्या युवा संघटनेचा अध्यक्ष होता. कंपनीचे नावही ‘रयत’ या नावावरुन दिले आहे. संबधित कंपनीच्या मोहिते नावाच्या मालकाचा विवाह खोत यांच्या पुतणीशी झाला आहे. यावरुन ही कंपनी खोत यांच्याशी संबधित आहे. कृषी विभागाकडून या व्यवसायावर ५० टक्के अनुदान देण्याच्या आमिषाने फसवणूक झाली आहे.’
अन्यथा शेट्टींनी
राजकारण सोडावे
कृषी राज्यमंत्री सदाभाऊ खोत म्हणाले,‘ माझ्या जावयाने फसवणूक केली असे म्हणत असतील, तर तो माझा जावई आहे हे सिद्ध करुन दाखवावे, आपण राजकारण सोडतो. जर तो माझा जावई नसेल तर शेट्टी हे राजकारण सोडणार का, हे त्यांनी जाहीर करावे.’ याप्रकरणी शेट्टींवर अब्रुनुकसानाची दावा दाखल करण्याचा इशाराही त्यांनी दिला. खोत म्हणाले, ‘शेट्टी ज्या समाजात जन्माला आले. त्या समाजातील सर्व मुलींचे नवरे हे त्यांचे जावई आहेत का? शेट्टी हे कार्यकर्त्यांना कधीच जीवाभावाने ओळखू शकले नाहीत. माझ्या घरच्या सगळ्या लग्नात शेट्टी उपस्थित होते. त्यामुळे त्यांनी अभ्यास करायला हवा होता.’
कडकनाथ कोंबडी पालन प्रकल्पाच्या संचालकांनी ८ हजारांहून अधिक शेतकऱ्यांची कोट्यवधी रुपयांची फसवणूक केल्याचे समजते. गुंतवणूक केलेल्या शेतकऱ्यांच्या रक्कमा परत देवू शकत नसल्याने कोल्हापूर आणि सांगली जिल्ह्यातील कार्यालयांना टाळे लावून संचालक पसार झाले आहेत. एका वर्षात ७५ हजाराच्या मोबदल्यात १ लाख रुपये मिळणार असल्याने हजारो गुंतवणूकदार आमिषाला बळी पडले.
कडकनाथ प्रकल्पाच्या इस्लामूपर येथील कार्यालयासह कागल, राधानगरी, भुदरगड तालक्यातील शेतकऱ्यांनी पोलिस ठाण्याकडे तक्रारी दाखल केल्या आहेत. गुंतवणूकदारांनी कंपनीच्या इस्लामपूर कार्यालयाला टाळे ठोकले आहे.
कडकनाथ कोंबड्यांचे पालन करुन लाखो रुपयांचे आमिष शेतकऱ्यांना दाखविण्यात आले. त्यांना पद्धतशीरपणे गुंतवणूक करण्यास भाग पाडले. एकाच वेळी इतकी मोठी रक्कम गुंतवणूक करण्यापेक्षा दोन टप्प्यात रक्कम स्वीकारण्याची युक्ती कंपनीने राबविली. प्रकल्प सुरु करण्यासाठी ७५ हजारांची गुंतवणूक करायची. पैकी ४० हजार रुपये पक्षी घेताना आणि उर्वरित ३५ हजार रुपये तीन महिन्यानंतर असे दोन टप्प्यात ७५ हजार रुपये देण्याची योजना राबविली. ही कंपनी रक्कम गुंतवणाऱ्या शेतकऱ्याला कडकनाथ कोंबडीची पिले देत होती. या २०० पिलांसाठी लागणारे खाद्य, औषधे, खाद्याची भांडी आणि लसीकरणाचे साहित्य कंपनीकडून दिले जात होते. तीन महिन्यानंतर कंपनीचे काही लोक शेतकऱ्यांकडे १०० मादी आणि २० नर घेवून ८० मोठे झालेले पक्षी घेवून जात. चार ते पाच महिन्यानंतर अंडी द्यायला सुरुवात झाल्यानंतर पहिली दोन हजार अंडी ५० रुपये प्रति अंडे, दुसरी दोन हजार अंडी ३० रुपये प्रति अंडे आणि त्यानंतरची ३५०० हजार अंडी २० रुपये दराने खरेदी केली जात होती. या सर्व व्यवहारातून एका वर्षांत शेतकऱ्याला सुमारे पावणेदोन लाख रुपयांचे उत्पन्न मिळण्याची हमी कंपनीने दिली होती. मात्र कोट्यवधी रुपयांची रक्कम गोळा केल्यानंतर कंपनीच्या संचालकांनी सहा महिन्यातच्या कालावधीत कोल्हापूर, सांगली आणि सातारा जिल्ह्यातील काही गुंतवणूकदारांना किरकोळ रक्कम दिली. शेतकऱ्यांना हजारो आणि लाखो रुपयांच्या पावत्याही पावती तिकिटाशिवाय दिल्या. गुंतवणूकदारांचा प्रतिसाद पाहून कंपनीने तीन जिल्ह्यात एजंट नेमून योजनेची व्याप्ती वाढविली. काही ठिकाणी कॉर्पोरेट कार्यालये स्थापन केली. कडकनाथ कोंबडी आरोग्यासाठी चांगली असून तिला फाइव्ह स्टार, सेव्हन स्टार हॉटेलमध्ये मोठी मागणी असल्याचे सांग्ण्यात आले. मात्र गुंतवणूक केलेली रक्कम परत मिळत नसल्याने गुंतवणूकदार हवालदिल झाले. या योजनेत तीन जिल्ह्यातील सुमारे ५० हजारांहून अधिकजणांनी गुंतवणूक केल्याचे समजते. दरम्यान , या प्रकरणी इस्लामपूरच्या महारयत अॅग्रो कंपनीवर कारवाई करावी, अशी मागणी निवासी उपजिल्हाधिकारी संजय शिंदे यांच्याकडे शेतकऱ्यांनी केली आहे. कागल, राधानगरी, भुदरगड तालुक्यातील शेतकऱ्यांनी मुरगूड पोलिस ठाण्याला निवेदन देवून कडकनाथ कंपनीच्या बोगस कारभाराची चौकशी करण्याची मागणी केली आहे.
दरम्यान, कंपनीत कोणताही गैरव्यवहार नसल्याचा दावा कंपनीचे संस्थापक अध्यक्ष सुधीर मोहिते यांनी केला आहे. त्याबाबतचे प्रसिद्धपत्रक त्यांनी गुंतवणूकादारांना दिले आहे. कंपनीचा सर्व कारभार सुरळीत सुरु असून कोणताही गैरव्यवहार झालेला नाही. पशुखाद्याची समस्या निर्माण झाली आहे, त्यावर लवकरच तोडगा निघेल. कोणत्याही अफवांवर आणि भूलथापांवर विश्वास न ठेवता शेतकऱ्यांनी कंपनीला सहकार्य करावे, असे आवाहन मोहिते यांनी केले आहे.
तर, कोंबड्याची विक्री होत नाही. पहिल्या शेतकऱ्यांच्या कोंबड्या नव्या गुंतवणूकदाराला दिल्या जात आहेत. गुंतवणूक केलेल्या रक्कम दिलेली नाही. अनेकदा कंपनीच्या कार्यालयाकडे हेलपाटे मारुनही संचालक भेट घेत नाहीत. पैसे परत देण्याचा तगादा लावल्याने कार्यालय बंद केले असल्याचा आरोप तक्रारदारांनी केला आहे.
राज्यमंत्री सदाभाऊ खोत
यांच्याशी संबधित संस्था
याबाबत स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे अध्यक्ष, माजी खासदार राजू शेट्टी म्हणाले,‘ कडकनाथ कोंबडी पालन करणारी संस्था ही कृषी राज्यमंत्री सदाभाऊ खोत यांच्याशी संबधित आहे. सांगलीतील ज्या कंपनीने ही फसवणूक केली आहे, त्याचा मालक हा राज्यमंत्री खोत यांच्या रयत क्रांती संघटनेच्या युवा संघटनेचा अध्यक्ष होता. कंपनीचे नावही ‘रयत’ या नावावरुन दिले आहे. संबधित कंपनीच्या मोहिते नावाच्या मालकाचा विवाह खोत यांच्या पुतणीशी झाला आहे. यावरुन ही कंपनी खोत यांच्याशी संबधित आहे. कृषी विभागाकडून या व्यवसायावर ५० टक्के अनुदान देण्याच्या आमिषाने फसवणूक झाली आहे.’
अन्यथा शेट्टींनी
राजकारण सोडावे
कृषी राज्यमंत्री सदाभाऊ खोत म्हणाले,‘ माझ्या जावयाने फसवणूक केली असे म्हणत असतील, तर तो माझा जावई आहे हे सिद्ध करुन दाखवावे, आपण राजकारण सोडतो. जर तो माझा जावई नसेल तर शेट्टी हे राजकारण सोडणार का, हे त्यांनी जाहीर करावे.’ याप्रकरणी शेट्टींवर अब्रुनुकसानाची दावा दाखल करण्याचा इशाराही त्यांनी दिला. खोत म्हणाले, ‘शेट्टी ज्या समाजात जन्माला आले. त्या समाजातील सर्व मुलींचे नवरे हे त्यांचे जावई आहेत का? शेट्टी हे कार्यकर्त्यांना कधीच जीवाभावाने ओळखू शकले नाहीत. माझ्या घरच्या सगळ्या लग्नात शेट्टी उपस्थित होते. त्यामुळे त्यांनी अभ्यास करायला हवा होता.’