अ‍ॅपशहर

धक्कादायक! आईनेच १३ दिवसांच्या बाळाला पाण्याच्या टाकीत बुडवले आणि...

Sangli Crime: मातेनेच आपल्या १३ दिवसांच्या तान्हुल्या बाळाला पाण्याच्या टाकीत बुडवून ठार मारल्याची धक्कादायक घटना सांगली जिल्ह्यातील पलूस तालुक्यात घडली आहे. याप्रकरणी संबंधित महिलेवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Authored byउद्धव गोडसे | Edited byगजानन सावंत | महाराष्ट्र टाइम्स.कॉम 5 Nov 2020, 9:24 am
सांगली: पोट साफ न होण्याच्या तक्रारीनंतर शस्त्रक्रिया करूनही बाळाला त्रास होत असल्याच्या नैराश्यातून त्याला पाण्याच्या टाकीत बुडवून मारल्याची कबुली जन्मदात्या आईने दिली. हा प्रकार बुधवारी (ता. ४) सकाळी पलूस तालुक्यातील माळवाडी येथे घडला. अज्ञात व्यक्तीने अपहरण करून बाळाला पाण्याच्या टाकीत टाकल्याचा बनाव तिने केला होता. पोलिसांच्या तपासात तीन तासात हा बनाव उघडकीस आला. ( Sangli Crime Latest Updates )
महाराष्ट्र टाइम्स.कॉम आईने तान्हुल्या बाळाला पाण्याच्या टाकीत बुडवले


वाचा: एकतर्फी प्रेम, फिल्मी गाणी आणि राडा; तरुणीने 'असा' दिला हिसका

माळवाडी-वसगडे रस्त्यालगत फिर्यादी उत्तम धोंडिराम माळी यांचा साईदीप नावाचा बंगला आहे. बुधवारी सकाळी त्यांची मुलगी ऐश्वर्या अमित माळी ही तेरा दिवसांच्या बाळासोबत बेडरूममध्ये होती. बाळाला पोट साफ न होण्याचा त्रास होता. यामुळे त्याच्यावर सांगलीतील एका खासगी रुग्णालयात शस्त्रक्रिया करून विष्टा बाहेर पडण्यासाठी नळी बसवली होती. मात्र, याचा त्रास होत असल्याने ते वारंवार रडत होते. यामुळे ऐश्वर्या निराश होती. सकाळी आई आणि वहिनी या दोघी शेतातील हौदावर धुणे धुण्यासाठी गेल्या होत्या. इतर नातेवाईक शेतात गेले होते. यावेळी ऐश्वर्याने तिच्या बाळाला गच्चीवरील पाण्याच्या टाकीत बुडवले. यानंतर तिने अज्ञाताने घरातून बाळ पळवल्याचा बनाव केला. नातेवाईकांनी शोध घेतला असता, गच्चीवरील पाण्याच्या टाकीत बाळाचा मृतदेह आढळला. या प्रकाराने खळबळ उडाली होती.

वाचा: अर्णब गोस्वामी यांना 'ती' कृती भोवणार!; मुंबईत दाखल झाला गुन्हा

ऐश्वर्याचे वडील उत्तम धोंडीराम माळी यांनी भिलवडी पोलिसात वर्दी देताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन माळी कुटुंबीयांकडे चौकशी सुरू केली. बाहेरची व्यक्ती घरात आली नसल्याने घरातीलच कोणीतरी बाळाचा खून केल्याचा संशय बळावला व पोलिसांनी ऐश्वर्याकडे अधिक चौकशी केली. पोलिसी खाक्या दाखवताच तिने गुन्ह्याची कबुली दिली. याबाबत तिच्यावर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्यात आला असून, अधिक तपास सुरू असल्याची माहिती अपर पोलीस अधीक्षक मनीषा दुबुले यांनी दिली.

वाचा: अर्णब गोस्वामी यांना १४ दिवसांची कोठडी; हायकोर्टाकडे केली 'ही' विनंती

महत्वाचे लेख

Marathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.
ताज्या बातम्यांसह अपडेट राहण्यासाठी लाइक करा Maharashtra Times फेसबुकपेज